शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दरडीमुळे राजधानीचे इंजिन घसरले, अवघ्या पावणेचार तासात रेल्वे रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 14:37 IST

KonkanRailway Ratnagiri : रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीला आपटून राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याची घटना शनिवारी पहाटे रत्नागिरी ते संगमेश्वरदरम्यानच्या उक्षी येथे बोगद्यात घडली. रेल्वेच्या लोको पायलटने गाडीचा वेग कमी केल्यामुळे केवळ इंजिनच रुळावरुन खाली उतरले. यात कोणीही जखमी झालेले नाही. रेल्वेच्या ६० जणांच्या पथकाने वेगाने केलेल्या हालचालींमुळे अवघ्या पावणेचार तासात वाहतूक पूर्ववत झाली.

ठळक मुद्देदरडीमुळे राजधानीचे इंजिन घसरलेअवघ्या पावणेचार तासात रेल्वे रुळावर

रत्नागिरी : रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीला आपटून राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याची घटना शनिवारी पहाटे रत्नागिरी ते संगमेश्वरदरम्यानच्या करबुडे येथे बोगद्यात घडली. रेल्वेच्या लोको पायलटने गाडीचा वेग कमी केल्यामुळे केवळ इंजिनच रुळावरुन खाली उतरले. यात कोणीही जखमी झालेले नाही. रेल्वेच्या ६० जणांच्या पथकाने वेगाने केलेल्या हालचालींमुळे अवघ्या पावणेचार तासात वाहतूक पूर्ववत झाली.गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे करबुडे (ता. रत्नागिरी) बोगद्यात एक दरड कोसळून ट्रॅकवर आली होती. शनिवारी पहाटे ४.१५ वाजता राजधानी एक्स्प्रेस तेथे आली. ट्रॅकवर दरड पडल्याचे लोको पायलटच्या (चालकाच्या) लक्षात आले. त्याने तातडीने गाडीचा वेग कमी केला. गाडीचे इंजिन या दरडीवर आपटले. या दणक्यामुळे इंजिन रुळावरुन खाली उतरले.या घटनेची माहिती मिळताच रेल्वेची एआरएमव्ही (ॲक्सिडेंट रिलिफ अँड मेंटेनन्स व्हॅन) अक्षरश: १५ मिनिटात घटनास्थळी पोहोचली. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांच्यासह अभियंते, अधिकारी, कामगार असे ६० जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने काम सुरू करून रेल्वे परत रुळावर आणली. चाके घसरल्याने रुळांचे काही नुकसान झाले आहे का, याची तपासणी करण्यात आली. सात वाजता मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आणि राजधानी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली.वैद्यकीय पथकही हजरकोकण रेल्वेचे वैद्यकीय पथकही घटनास्थळी हजर होते. या पथकाने प्रत्येक डब्यात जाऊन प्रवाशांशी चर्चा केली आणि त्यांना धीर दिला. नेमका काय प्रकार झाला आहे, याची माहितीही प्रवाशांना देण्यात आली. कोणीही प्रवासी जखमी झालेला नसल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.मोठा अनर्थ टळलागाडीचा वेग कमी झाल्याने केवळ इंजिनच रुळावरुन खाली उतरले. जर वेग अधिक असता तर पुढच्या काही डब्यांनाही हा दणका बसला असला आणि गाडी बोगद्यात असल्याने मोठा अनर्थ घडला असता.

 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी