शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ऊर्जा विकास कार्यक्रम- सौर ऊर्जेमुळे होणार १५ लाखांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:17 IST

Zp Ratnagiri- रत्नागिरी जिल्हा परिषद भवनात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातून १३० कि.वॅ. ऊर्जेची निर्मिती होणार असून संपूर्ण परिषद भवनाला या ऊर्जेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे वर्षाला सुमारे १५ लाख रुपये वीजबिलापोटी वाचणार आहेत.

ठळक मुद्देयंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात अविरत वीज मिळण्यास मोलाची मदत

रत्नागिरी : रत्नागिरीजिल्हा परिषद भवनात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातून १३० कि.वॅ. ऊर्जेची निर्मिती होणार असून संपूर्ण परिषद भवनाला या ऊर्जेचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे वर्षाला सुमारे १५ लाख रुपये वीजबिलापोटी वाचणार आहेत.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ऊर्जा विकास कार्यक्रमातून ही वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी ८७ लाख ६९ हजार ८५२ रुपये निधी मंजूर झाला आहे. या कार्यालयातील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सौरऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले आहे.

जिल्हा परिषद इमारतीला वर्षाला सुमारे २ लाख १९ हजार ८३२ युनिट विजेची गरज लागते. प्रमुख पदाधिकारी, खातेप्रमुख, पदाधिकारी यांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा, पंख्यांचा वापर सर्वाधिक होतो. त्यांचे वार्षिक वीजबिल सुमारे १५ लाख रुपये येते. त्यासाठी सौरऊर्जा वीजनिर्मितीला आता प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वीजबिलाच्या सुमारे १५ लाख रुपयांची बचत होणार आहे.या सौरऊर्जेतून परिषद भवनाला अविरत वीज मिळण्यास मोलाची मदत होणार आहे. या प्रकल्पातून परिषद भवनाच्या इमारतीच्या वरच्या छतावर सौर पॅनल लावण्याचे काम सुरू आहे.

प्रकल्प राबवल्यानंतर त्याला अनुदानापोटी मेडाकडून रक्कमही मिळण्यास मदत करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० च्या ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौर उपकरणे बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्या प्रस्तावानुसार एकूण ८७ लाख ६९ हजार ८५२ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या ८ ते १० दिवसांत परिषद भवन सौरऊर्जेवर चालणार आहे.चार पंचायत समितीतहीजिल्हा परिषदेनंतर मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर या चार पंचायत समिती कार्यालयांच्या इमारतींसाठीही रुफ टॉप नेट मीटरिंग सौर विद्युत संच बसविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी