शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अतिक्रमण कारवाई : रत्नागिरी शहरातील अतिक्रमणांवर येणार टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:53 IST

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर क्रीडांगणाच्या पुढील बाजूस बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्याच्या विषयावरून गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा शिवसेना व स्वाभिमान असा संघर्ष झाला. मारुती मंदिर येथील क्रीडांगणासमोरील परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. अखेर भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार संपूर्ण शहरात शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर मारूती मंदिर येथील तणाव गुरुवारी निवळला

ठळक मुद्देअतिक्रमण कारवाई : रत्नागिरी शहरातील अतिक्रमणांवर येणार टाचशिवसेना-स्वाभिमानमध्ये संघर्ष सुरुच

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर क्रीडांगणाच्या पुढील बाजूस बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटविण्याच्या विषयावरून गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा शिवसेना व स्वाभिमान असा संघर्ष झाला. मारुती मंदिर येथील क्रीडांगणासमोरील परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. अखेर भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार संपूर्ण शहरात शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर मारूती मंदिर येथील तणाव गुरुवारी निवळला.मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या महिलांना महिनाभरापूर्वीच क्रीडांगणामागील नगर परिषदेच्या इमारतीत भाजी विक्रीसाठी जागा, गाळे उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र तेथे ग्राहकच येत नाहीत. तसेच क्रीडांगणासमोरील रस्त्यालगत अन्य भाजी विक्रेते व्यवसाय करतात, अशी भाजी विक्रेत्यांची तक्रार होती.

अतिक्रमण कारवाई : रत्नागिरी शहरातील अतिक्रमणांवर येणार टाच

जोपर्यंत सर्वांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मूळ जागेवरच या भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत स्वाभिमान पक्षाने या भाजी विक्रेत्यांना पाठींबा दिला होता. स्वाभिमान पक्षाचा जयजयकार करणाऱ्या घोषणाही यावेळी भाजी विक्रेत्यांनी दिल्या.मारूती मंदिर रस्त्यालगत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तेथे वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी पर्यायी जागा या भाजी विक्रेत्यांना दिली होती. तरीही पुन्हा त्याच जागेवर भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने त्यांना हटविण्यासाठी गुरुवारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मात्र आम्ही केव्हाही ही जागा मोकळी करून देण्यास तयार आहोत. मात्र सर्वांना एक नियम लावा. शहरातही अतिक्रमणे हटवा. आम्ही येथून पर्यायी जागेत स्वत:हून जाण्यास तयार असल्याचे भाजी विक्रेत्या महिलांनी नगर परिषद अधिकारी तसेच पोलिसांनाही सांगितले.मारूती मंदिर येथील या भाजी विक्रेत्या महिलांनी रस्त्यालगतच ठाण मांडले. नगर परिषद अधिकारी मुकेश शेट्ये व अन्य अधिकाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांना समजावले. त्यानंतर पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनीही तेथे येऊन परिस्थितीची माहिती घेतली.

त्यानंतर नगराध्यक्षांशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी संपूर्ण शहरात अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्याची घोषणा नगराध्यक्ष साळवी यांनी केली आहे. ही मोहीम पोलीस बंदोबस्तामध्ये राबवली जाणार आहे. शहरातील रस्त्यांवर जागा अडविणारे भाजी, फळ विक्रेते व अन्य व्यावसायिक, पदपथांवरील व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांचा त्यात समावेश आहे.पर्यायी जागा देणाररत्नागिरी शहरातील रस्ते व पदपथ हे फिरते विक्रेते, स्टॉल्स, भाजी व फळ विक्रेते यांनी अडविले आहेत. त्यामुळे शहरातील ज्या भागात वाहतूकीला अडथळा येत आहे तेथे रस्ते व पादचाऱ्यांसाठी पदपथावरील ही अतिक्रमणे हटविण्याची भूमिका नगर परिषदेने घेतली आहे. अतिक्रमणे हटविताना भाजी, फळ विक्रेत्यांना पर्यायी जागाही नगर परिषद देणार असल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी