शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वीजपुरवठा नियमित होण्यासाठी कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 14:35 IST

वीज गेली की, पहिला आधी तोंडात येतो तो अपशब्दच! पावसाळ्याच्या काळात तर जर वीज खंडित झाली की, अनेकांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो.

- अरुण आडिवरेकर रत्नागिरी : वीज गेली की, पहिला आधी तोंडात येतो तो अपशब्दच! पावसाळ्याच्या काळात तर जर वीज खंडित झाली की, अनेकांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो. पण ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करत महावितरणचे कर्मचारी वीज सुरळीत राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. गुहागर तालुक्यातील पालशेत गावातील वीज सुरळीत करण्यासाठी चक्क महावितरणचा कर्मचारी तारेवरची कसरत करत होता.

पावसाळ्याचे दिवस असल्याने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण जास्त असते. या काळात तारा तुटून पडणे, झाड तारांवर कोसळणे, वीजखांब कोसळून वीज जाणे यासारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे अनेकवेळा वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात. काहीवेळेला काही तास विजेची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, याही परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू असतात. वीज खंडित होऊन जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत असतात.

गुहागर तालुक्यातील पालशेत भागात पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी त्याठिकाणी पोहाचले. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे नदीच्या पलिकडे जाऊन काम करणे कठीण बनले होते. आजूबाजूला असणाऱ्या झाडांमधील विजेच्या तारा मोकळ्या केल्याशिवाय वीज सुरळीत करणे कठीण होते. त्यातच सोसाट्याचा वारा सुटल्याने काम करणे अवघड होते.

अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्याने रस्सीचा आधार घेत नदीच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तुफान वेगाने जाणारा पाण्याचा लोंढा, सोसाट्याचा वारा आणि त्याही परिस्थितीत रस्सीच्या आधाराने नदीपलिकडे जाऊन काम करण्याची जिद्द होती. आपल्या जीवावर उदार होऊन हा कर्मचारी केवळ त्या भागातील वीज सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत होता. रस्सीच्या आधारावर हा कर्मचारी झाडांमध्ये अडकलेल्या विजेच्या तारा मोकळा करण्यासाठी जीवाशी खेळत होता.