शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

प्रदूषणविरहीत उद्योग उभारणीवर भर : राऊत

By admin | Updated: May 31, 2014 01:11 IST

आॅटोमोबाईल क्षेत्रावर आधारित उद्योग आणण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कोकणात आॅटोमोबाईल क्षेत्रावर आधारित उद्योग प्रामुख्याने आणण्याचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर कोकणात आयात सुविधाही निर्माण कराव्या लागतील. कोकणचे प्रदूषणविरहीत औद्योगिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली. विजयी मिरवणुकीसाठी रत्नागिरीत आले असता राऊत यांची पत्रकारांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे व यापुढेही राहणार आहे. आपल्या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानताना ते म्हणाले, या लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे दहशत जास्त काळ चालत नाही, हेच जनतेने दाखवून दिले. या सहाही विधानसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागा यावेळी महायुतीच जिंकणार असून, राज्यातही महायुती निर्विवाद बहुमत मिळवेल. राज्यातही सत्ता परिवर्तन होऊन विधानसभेवर भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दशकभरापेक्षा अधिक काळ कॉँग्रेस आघाडीकडे सत्ता असतानाही कोकणचे प्रश्न सुटले नाहीत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळेच कोकण विकास रखडला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्राकडून निधी आणण्यासाठी आपण जोरकस प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)