शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

प्रदूषणविरहीत उद्योग उभारणीवर भर : राऊत

By admin | Updated: May 31, 2014 01:11 IST

आॅटोमोबाईल क्षेत्रावर आधारित उद्योग आणण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कोकणात आॅटोमोबाईल क्षेत्रावर आधारित उद्योग प्रामुख्याने आणण्याचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर कोकणात आयात सुविधाही निर्माण कराव्या लागतील. कोकणचे प्रदूषणविरहीत औद्योगिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली. विजयी मिरवणुकीसाठी रत्नागिरीत आले असता राऊत यांची पत्रकारांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे व यापुढेही राहणार आहे. आपल्या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानताना ते म्हणाले, या लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे दहशत जास्त काळ चालत नाही, हेच जनतेने दाखवून दिले. या सहाही विधानसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागा यावेळी महायुतीच जिंकणार असून, राज्यातही महायुती निर्विवाद बहुमत मिळवेल. राज्यातही सत्ता परिवर्तन होऊन विधानसभेवर भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दशकभरापेक्षा अधिक काळ कॉँग्रेस आघाडीकडे सत्ता असतानाही कोकणचे प्रश्न सुटले नाहीत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळेच कोकण विकास रखडला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्राकडून निधी आणण्यासाठी आपण जोरकस प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)