शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

लोकाभिमुख प्रशासकीय कामकाजावर भर : शीतल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST

राजापूर : शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाच्या प्रश्नाबरोबरच तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करणे आणि सर्वसामान्य जनतेच्या कामाचा ...

राजापूर : शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाच्या प्रश्नाबरोबरच तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करणे आणि सर्वसामान्य जनतेच्या कामाचा झटपट निपटारा करून लोकाभिमुख प्रशासकीय कामकाज करण्यावर आपला भर राहील, असे संकेत राजापूरच्या नूतन तहसीलदार शीतल जाधव यांनी दिले आहेत.

राजापूर ही आपली जन्मभूमी असल्याने इथले प्रश्न आणि समस्यांची आपणाला चांगली जाणीव आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य देताना महसूल प्रशासनाच्या कामातून त्यांना न्याय आणि समाधान देण्याचा आपण प्रयत्न करू, अशी ग्वाहीही जाधव यांनी दिली. राजापूर तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजापूर शहर आणि तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत माहिती करून घेताना भविष्यात राजापुरातील पूर संकट कमी करण्यासाठी शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाच्या प्रश्नाला प्रशासकीय पातळीवरून कशी चालना देता येईल, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राजापूर तहसीलदार कार्यालयाची इमारत जुनी असून, सध्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी त्याला गळती लागली आहे. याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शीतल जाधव यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची आणि समस्यांची आपणाला चांगली जाण आहे. त्यामुळे ते प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. पुढील दोन महिन्यात प्रशासकीय कामकाजात चांगली गती आलेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले. जनतेच्या कामासाठी आपण कायमच उपलब्ध राहणार असून, सर्वसामान्यांच्या कामाचा झटपट निपटारा करून तत्काळ न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार अशोक शेळके उपस्थित होते.