शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास करण्यावर भर : उद्योगमंत्री उदय सामंत

By अरुण आडिवरेकर | Updated: September 22, 2022 18:40 IST

फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी, त्याच्याशी संलग्न प्रकल्प राज्यातच असतील. त्यातून आगामी काळात राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा केला दावा.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असून, तिथल्या उद्योगधंद्यांच्या विकासाचा प्रश्नही गंभीर आहे. कोरोना काळात काही छोटे उद्योग बंद पडले आहेत. जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास कसा करता येऊ शकेल, यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्ली येथे सांगितले.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासात्मक प्रश्नांसंदर्भात दिल्ली येथे विविध खात्याच्या मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वेनाक्यांवर पूलबांधणी तसेच थांब्यांच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील उद्योगांना व रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी जालन्याप्रमाणे नाशिक, जळगाव, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, सांगली, भिवंडी, पुणे आदी जिल्ह्यांमध्येही मल्टी-लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार आहेत. दोन-तीन जिल्ह्यांसाठी मिळून एक मल्टी-लॉजिस्टिक पार्क असेल. त्यामुळे उत्पादनांच्या निर्यातीसाठी उद्योजकांना मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही. मल्टी-लॉजिस्टिक पार्कसाठी फक्त राज्याला जमीन उपलब्ध करून द्यावी लागणार असून, पार्क विकसित करण्याचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले

राजकीय वातावरण दूषित करू नयेभूमिपुत्रांना रोजगारांमध्ये प्राधान्य दिले जात नसल्याच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर, राजकीय वातावरण दूषित करण्यापेक्षा उद्योगांसाठी व राज्याच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असे मंत्री सामंत म्हणाले. फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी, त्याच्याशी संलग्न प्रकल्प राज्यातच असतील. त्यातून आगामी काळात राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा दावा त्यांनी केला.

कोकणाच्या विकासाकडे लक्षरत्नागिरी-रायगड जिल्ह्यातील बंदरांचा व जेट्टींचा विकास केला जाईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन जेट्टी असून, तिथे जाण्यासाठी रस्त्यांचा विकास करण्याची गरज आहे. यासंदर्भात केंद्रीय वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग व रत्नागिरी-कोल्हापूर मार्गाचाही विकास केला जाणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत