शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास करण्यावर भर : उद्योगमंत्री उदय सामंत

By अरुण आडिवरेकर | Updated: September 22, 2022 18:40 IST

फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी, त्याच्याशी संलग्न प्रकल्प राज्यातच असतील. त्यातून आगामी काळात राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा केला दावा.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असून, तिथल्या उद्योगधंद्यांच्या विकासाचा प्रश्नही गंभीर आहे. कोरोना काळात काही छोटे उद्योग बंद पडले आहेत. जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता विकास कसा करता येऊ शकेल, यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्ली येथे सांगितले.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासात्मक प्रश्नांसंदर्भात दिल्ली येथे विविध खात्याच्या मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वेनाक्यांवर पूलबांधणी तसेच थांब्यांच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील उद्योगांना व रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी जालन्याप्रमाणे नाशिक, जळगाव, अकोला, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, सांगली, भिवंडी, पुणे आदी जिल्ह्यांमध्येही मल्टी-लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार आहेत. दोन-तीन जिल्ह्यांसाठी मिळून एक मल्टी-लॉजिस्टिक पार्क असेल. त्यामुळे उत्पादनांच्या निर्यातीसाठी उद्योजकांना मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही. मल्टी-लॉजिस्टिक पार्कसाठी फक्त राज्याला जमीन उपलब्ध करून द्यावी लागणार असून, पार्क विकसित करण्याचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले

राजकीय वातावरण दूषित करू नयेभूमिपुत्रांना रोजगारांमध्ये प्राधान्य दिले जात नसल्याच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर, राजकीय वातावरण दूषित करण्यापेक्षा उद्योगांसाठी व राज्याच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असे मंत्री सामंत म्हणाले. फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी, त्याच्याशी संलग्न प्रकल्प राज्यातच असतील. त्यातून आगामी काळात राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होईल, असा दावा त्यांनी केला.

कोकणाच्या विकासाकडे लक्षरत्नागिरी-रायगड जिल्ह्यातील बंदरांचा व जेट्टींचा विकास केला जाईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन जेट्टी असून, तिथे जाण्यासाठी रस्त्यांचा विकास करण्याची गरज आहे. यासंदर्भात केंद्रीय वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग व रत्नागिरी-कोल्हापूर मार्गाचाही विकास केला जाणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत