शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण जूनपर्यंत पूर्ण होणार : संजय गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 11:52 IST

Konkan Railway Ratnagiri-कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.

ठळक मुद्दे सीआरएसच्या पाहणीनंतर गाड्या धावणार विजेवर, इंधन खर्चात बचत होण्यास मदत रोहा ते रत्नागिरी मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेड्ये, जनसंपर्क अधिकारी गिरीष करंदीकर, सचिन देसाई आदी उपस्थित होते. डिझेलवर धावणाऱ्या इंजिनच्या धुरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच इंधन खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. रोहा ते रत्नागिरी या मार्गावर विद्युतीकरणाची यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. आता रत्नागिरी ते पुढे गोवा ठोकूरपर्यंत रेल्वे मार्गावरचे विद्युतीकरण केले जाणार आहे. हे काम येत्या जूनपर्यंत मार्गी लावण्याचे प्रयत्न कोकण रेल्वेकडून सुरू असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्ग दुपदरीकरणावरही कार्यवाही सुरू आहे. तसेच चिपळूण-कऱ्हाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत अजूनही शासनस्तरावरून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी खेडदरम्यानच्या मार्गावर रो-रो मधून ट्रक कोसळून अपघाताचा प्रकार घडला होता. हा अपघात ट्रक रो-रो वर व्यवस्थित लोडिंग न झाल्यामुळे घडल्याचे चौकशीतून समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.डिंगणी - जयगड मार्गाचे काम रखडलेकोकण रेल्वे मार्गावरून जयगड येथे जिंदल कंपनीसाठी डिंगणी ते जयगड अशा रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी सुमारे १० किलोमीटर इतके रेल्वेमार्गाचे अंतर प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, जेएसडब्ल्यू कंपनी सध्या तोट्यात असल्याने या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम रखडल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.पॅसेंजर रेल्वेचा निर्णय केंद्रांकडेलॉकडाऊन काळात कोकण रेल्वेच्या वाहतुकीलाही फटका बसला आहे. अनेक पॅसेंजर गाड्या आजही बंद आहेत. या गाड्या सुरू होण्यासाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळणे अपेक्षित असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी