शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण जूनपर्यंत पूर्ण होणार : संजय गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 11:52 IST

Konkan Railway Ratnagiri-कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.

ठळक मुद्दे सीआरएसच्या पाहणीनंतर गाड्या धावणार विजेवर, इंधन खर्चात बचत होण्यास मदत रोहा ते रत्नागिरी मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेड्ये, जनसंपर्क अधिकारी गिरीष करंदीकर, सचिन देसाई आदी उपस्थित होते. डिझेलवर धावणाऱ्या इंजिनच्या धुरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच इंधन खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. रोहा ते रत्नागिरी या मार्गावर विद्युतीकरणाची यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. आता रत्नागिरी ते पुढे गोवा ठोकूरपर्यंत रेल्वे मार्गावरचे विद्युतीकरण केले जाणार आहे. हे काम येत्या जूनपर्यंत मार्गी लावण्याचे प्रयत्न कोकण रेल्वेकडून सुरू असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्ग दुपदरीकरणावरही कार्यवाही सुरू आहे. तसेच चिपळूण-कऱ्हाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत अजूनही शासनस्तरावरून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी खेडदरम्यानच्या मार्गावर रो-रो मधून ट्रक कोसळून अपघाताचा प्रकार घडला होता. हा अपघात ट्रक रो-रो वर व्यवस्थित लोडिंग न झाल्यामुळे घडल्याचे चौकशीतून समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.डिंगणी - जयगड मार्गाचे काम रखडलेकोकण रेल्वे मार्गावरून जयगड येथे जिंदल कंपनीसाठी डिंगणी ते जयगड अशा रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी सुमारे १० किलोमीटर इतके रेल्वेमार्गाचे अंतर प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, जेएसडब्ल्यू कंपनी सध्या तोट्यात असल्याने या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम रखडल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.पॅसेंजर रेल्वेचा निर्णय केंद्रांकडेलॉकडाऊन काळात कोकण रेल्वेच्या वाहतुकीलाही फटका बसला आहे. अनेक पॅसेंजर गाड्या आजही बंद आहेत. या गाड्या सुरू होण्यासाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळणे अपेक्षित असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी