शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण जूनपर्यंत पूर्ण होणार : संजय गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 11:52 IST

Konkan Railway Ratnagiri-कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.

ठळक मुद्दे सीआरएसच्या पाहणीनंतर गाड्या धावणार विजेवर, इंधन खर्चात बचत होण्यास मदत रोहा ते रत्नागिरी मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेड्ये, जनसंपर्क अधिकारी गिरीष करंदीकर, सचिन देसाई आदी उपस्थित होते. डिझेलवर धावणाऱ्या इंजिनच्या धुरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच इंधन खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. रोहा ते रत्नागिरी या मार्गावर विद्युतीकरणाची यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. आता रत्नागिरी ते पुढे गोवा ठोकूरपर्यंत रेल्वे मार्गावरचे विद्युतीकरण केले जाणार आहे. हे काम येत्या जूनपर्यंत मार्गी लावण्याचे प्रयत्न कोकण रेल्वेकडून सुरू असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्ग दुपदरीकरणावरही कार्यवाही सुरू आहे. तसेच चिपळूण-कऱ्हाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत अजूनही शासनस्तरावरून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी खेडदरम्यानच्या मार्गावर रो-रो मधून ट्रक कोसळून अपघाताचा प्रकार घडला होता. हा अपघात ट्रक रो-रो वर व्यवस्थित लोडिंग न झाल्यामुळे घडल्याचे चौकशीतून समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.डिंगणी - जयगड मार्गाचे काम रखडलेकोकण रेल्वे मार्गावरून जयगड येथे जिंदल कंपनीसाठी डिंगणी ते जयगड अशा रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी सुमारे १० किलोमीटर इतके रेल्वेमार्गाचे अंतर प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, जेएसडब्ल्यू कंपनी सध्या तोट्यात असल्याने या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम रखडल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.पॅसेंजर रेल्वेचा निर्णय केंद्रांकडेलॉकडाऊन काळात कोकण रेल्वेच्या वाहतुकीलाही फटका बसला आहे. अनेक पॅसेंजर गाड्या आजही बंद आहेत. या गाड्या सुरू होण्यासाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळणे अपेक्षित असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी