शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोकण रेल्वे मार्गावर लवकरच धावणार विजेवरील गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 17:22 IST

Konkan Railway Ratnagiri -कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता सात डब्यांची रेल्वे विजेवर चालविण्यात आली. या पथकाचा अहवाल आल्यानंतर काही दिवसातच या मार्गावरून विजेवरील गाड्या धावणार आहेत.

ठळक मुद्देसुरक्षा आयुक्तांची तपासणी, अहवालाची प्रतीक्षा रत्नागिरी ते रोहा वाहतुकीचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता सात डब्यांची रेल्वे विजेवर चालविण्यात आली. या पथकाचा अहवाल आल्यानंतर काही दिवसातच या मार्गावरून विजेवरील गाड्या धावणार आहेत.रोहा ते रत्नागिरी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर २५ फेब्रुवारीला पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर काही दुरुस्त्याही इंजिन चालवून करण्यात आल्या होत्या. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (कमिशनर ऑफ सेफ्टी) मालवाहतूक आणि प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी देण्यात येते.

मध्य रेल्वेचे हे सुरक्षा पथक बुधवारी रत्नागिरीत दाखल झाले. रोहा येथून सात डब्यांची गाडी डिझेल इंजिन लावून रत्नागिरी रेल्वे स्थानकात आणली गेली. रत्नागिरीतून ती दुपारी ३ वाजता विजेवर चालवत रोह्याकडे रवाना झाली. यामध्ये इलेक्ट्रिक विभागासह सुरक्षा पथकातील तज्ज्ञ अधिकारी सहभागी झालेले आहेत. गाडी रोह्याला पोहचल्यानंतर सीआरएस पथकाचा अहवाल कोकण रेल्वेला प्राप्त होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते बेंगलोर या टप्प्याच्या विद्युतीकरणासाठी केंद्र शासनाने ११०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार वेर्णा येथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. रत्नागिरी ते रोहा २०४ किलोमीटरच्या विद्युतीकरणाला डिसेंबर २०१८ मध्ये आरंभ झाला. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र यासह टनेल पूल येथून वीजवाहिन्या, विद्युत खांब उभारले आहेत. वाहिन्यांमधून करंट सोडण्याची चाचणी २२ फेब्रुवारीला झाली. त्यानंतर आता सीआरएस तपासणी केल्यामुळे प्रत्यक्षात वाहतूक सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पहिली मालगाडी धावणारकोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना महिनाभरात विजेवर गाड्या सुरु होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार कार्यवाही सुरु असून, आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पहिली मालगाडी चालविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी