शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावर लवकरच धावणार विजेवरील गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 17:22 IST

Konkan Railway Ratnagiri -कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता सात डब्यांची रेल्वे विजेवर चालविण्यात आली. या पथकाचा अहवाल आल्यानंतर काही दिवसातच या मार्गावरून विजेवरील गाड्या धावणार आहेत.

ठळक मुद्देसुरक्षा आयुक्तांची तपासणी, अहवालाची प्रतीक्षा रत्नागिरी ते रोहा वाहतुकीचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान रत्नागिरीतून दुपारी ३ वाजता सात डब्यांची रेल्वे विजेवर चालविण्यात आली. या पथकाचा अहवाल आल्यानंतर काही दिवसातच या मार्गावरून विजेवरील गाड्या धावणार आहेत.रोहा ते रत्नागिरी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर २५ फेब्रुवारीला पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर काही दुरुस्त्याही इंजिन चालवून करण्यात आल्या होत्या. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (कमिशनर ऑफ सेफ्टी) मालवाहतूक आणि प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी देण्यात येते.

मध्य रेल्वेचे हे सुरक्षा पथक बुधवारी रत्नागिरीत दाखल झाले. रोहा येथून सात डब्यांची गाडी डिझेल इंजिन लावून रत्नागिरी रेल्वे स्थानकात आणली गेली. रत्नागिरीतून ती दुपारी ३ वाजता विजेवर चालवत रोह्याकडे रवाना झाली. यामध्ये इलेक्ट्रिक विभागासह सुरक्षा पथकातील तज्ज्ञ अधिकारी सहभागी झालेले आहेत. गाडी रोह्याला पोहचल्यानंतर सीआरएस पथकाचा अहवाल कोकण रेल्वेला प्राप्त होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते बेंगलोर या टप्प्याच्या विद्युतीकरणासाठी केंद्र शासनाने ११०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार वेर्णा येथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. रत्नागिरी ते रोहा २०४ किलोमीटरच्या विद्युतीकरणाला डिसेंबर २०१८ मध्ये आरंभ झाला. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र यासह टनेल पूल येथून वीजवाहिन्या, विद्युत खांब उभारले आहेत. वाहिन्यांमधून करंट सोडण्याची चाचणी २२ फेब्रुवारीला झाली. त्यानंतर आता सीआरएस तपासणी केल्यामुळे प्रत्यक्षात वाहतूक सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पहिली मालगाडी धावणारकोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना महिनाभरात विजेवर गाड्या सुरु होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार कार्यवाही सुरु असून, आयुक्तांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पहिली मालगाडी चालविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी