शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

रत्नागिरी जिल्ह्यात सरपंच निवडणुकीत शिवसेनेचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 17:44 IST

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, २१५ पैकी तब्बल ११५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्याखालोखाल गाव पॅनेलने बाजी मारली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात २१५पैकी ११५ सरपंच शिवसेनेचेकेवळ १० ठिकाणी भाजपचे सरपंच दापोली आणि चिपळूणमध्ये राष्ट्रवादीला थोडेफार यश काँग्रेसची अवस्था सर्वात दारूण

रत्नागिरी , दि. १७ :  जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, २१५ पैकी तब्बल ११५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्याखालोखाल गाव पॅनेलने बाजी मारली आहे. गावपॅनेलचे ५९, राष्ट्रवादी काँग्रेसचे २३ तर भाजपचे १० सरपंच निवडून आले आहेत. काँग्रेस सर्वात शेवटच्या क्रमांकावर असून, त्यांचे केवळ ४ सरपंच विजयी झाले आहेत.

जिल्ह्यात गेली अनेक वर्षे शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पाचपैकी तीन विधानसभा मतदार संघ, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि गावपातळीवरही शिवसेनेचे प्राबल्य आहे. या निवडणुकीतही शिवसेनेचा हा करिश्मा कायम राहिला. यावेळी सरपंच पदासाठी थेट निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तब्बल ११५ ठिकाणी शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्यात रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि दापोली या चार तालुक्यांमध्ये शिवसेना सरपंचांची संख्या अधिक आहे.

चिपळूण तालुक्यात मात्र ३२ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २० ठिकाणी गाव पॅनेलचा उमेदवार सरपंच झाला आहे. या निवडणुकीत एकूण ५९ ठिकाणी गावपॅनेलचे सरपंच निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला २३ ठिकाणीच यश मिळाले आहे. त्यात दापोली आणि चिपळूणमध्ये राष्ट्रवादीला थोडेफार यश आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून नगर परिषद निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही काहीतरी चमत्कार घडण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र २१५पैकी केवळ १० ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले आहेत.

काँग्रेसची अवस्था सर्वात दारूण झाली असून, फक्त चार सरपंचपदांवरच काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. संगमेश्वर तालुक्यात बहुजन विकास आघाडीने एक सरपंच पद मिळवले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkonkanकोकण