शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

लांजा कॉंग्रेस तालुकाध्यक्षांची निवड घटनाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:10 IST

congress Ratnagiri- लांजा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्षपद काँग्रेस पक्षाच्या घटनाबाह्य असून, तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. जिल्हाध्यक्ष यांनी लोकशाही पध्दतीने तालुकाध्यक्ष यांची नियुक्ती केलेली नसल्याने हे काँग्रेस पक्षाला घातक आहे.

ठळक मुद्देलांजा कॉंग्रेस तालुकाध्यक्षांची निवड घटनाबाह्यपदाधिकाऱ्यांचा आरोप, जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या मागणीला पुन्हा जोर

लांजा : लांजा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्षपद काँग्रेस पक्षाच्या घटनाबाह्य असून, तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. जिल्हाध्यक्ष यांनी लोकशाही पध्दतीने तालुकाध्यक्ष यांची नियुक्ती केलेली नसल्याने हे काँग्रेस पक्षाला घातक आहे. जिल्हाध्यक्ष यांची मनमानी करत असल्याने त्यांना तातडीने जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे दाद मागितली जाणार आहे.यावेळी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, ज्येष्ठ नेते ॲड. सदानंद गांगण, सरचिटणीस महेश सप्रे, सुनील कानडे, शहराध्यक्ष प्रसन्न शेट्ये, खलील मणेर, नगरसेवक रफिक नेवरेकर, प्रकाश लांजेकर, आदम रखांगी, मोहन दाभोळकर, सुरेश भगते उपस्थित होते. लांजा तालुकाध्यक्षपदी दोन दिवसांपूर्वीच शांताराम गाडे यांची नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले होते.

या निवडीला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड करताना पक्षाकडून निरीक्षक पाठवला जातो. बैठक घेऊन इच्छुकांची नावे विचारात घेतली जातात. जास्त नावे असतील, तर मात्र प्रदेश कमिटीकडे नावे जाऊन प्रदेश कमिटी अंतिम निर्णय घेते. ही काँग्रेस पक्षाची निवडीची परंपरा जिल्हाध्यक्षांनी खंडित केली असून, ही निवड ठोकशाही पध्दतीने निवड केल्याचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी सांगितले.शांताराम गाडे यांच्या निवडीला आमचा विरोध नाही. मात्र, त्यांची निवड करण्यासाठी वापरलेली पध्दत ही इतर कार्यकर्ते यांच्यावर अन्यायकारक व लोकशाहीला, काँग्रेस परंपरेला धरून नाही. याला आमचा विरोध आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या असलेले जिल्हाध्यक्ष हे हुकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेत, असा आरोप सय्यद यांनी केला.

तालुक्यात पाच ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिल्या असत्या, मात्र चुकीच्या पध्दतीने केलेल्या नियुक्तीमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडून हाती येणाऱ्या ग्रामपंचायती हातातून निसटून गेल्याने याला जिल्हाध्यक्ष कारणीभूत असल्याचा ठपका तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी ठेवला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी