शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लांजा कॉंग्रेस तालुकाध्यक्षांची निवड घटनाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:10 IST

congress Ratnagiri- लांजा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्षपद काँग्रेस पक्षाच्या घटनाबाह्य असून, तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. जिल्हाध्यक्ष यांनी लोकशाही पध्दतीने तालुकाध्यक्ष यांची नियुक्ती केलेली नसल्याने हे काँग्रेस पक्षाला घातक आहे.

ठळक मुद्देलांजा कॉंग्रेस तालुकाध्यक्षांची निवड घटनाबाह्यपदाधिकाऱ्यांचा आरोप, जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या मागणीला पुन्हा जोर

लांजा : लांजा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्षपद काँग्रेस पक्षाच्या घटनाबाह्य असून, तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. जिल्हाध्यक्ष यांनी लोकशाही पध्दतीने तालुकाध्यक्ष यांची नियुक्ती केलेली नसल्याने हे काँग्रेस पक्षाला घातक आहे. जिल्हाध्यक्ष यांची मनमानी करत असल्याने त्यांना तातडीने जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे दाद मागितली जाणार आहे.यावेळी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, ज्येष्ठ नेते ॲड. सदानंद गांगण, सरचिटणीस महेश सप्रे, सुनील कानडे, शहराध्यक्ष प्रसन्न शेट्ये, खलील मणेर, नगरसेवक रफिक नेवरेकर, प्रकाश लांजेकर, आदम रखांगी, मोहन दाभोळकर, सुरेश भगते उपस्थित होते. लांजा तालुकाध्यक्षपदी दोन दिवसांपूर्वीच शांताराम गाडे यांची नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले होते.

या निवडीला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड करताना पक्षाकडून निरीक्षक पाठवला जातो. बैठक घेऊन इच्छुकांची नावे विचारात घेतली जातात. जास्त नावे असतील, तर मात्र प्रदेश कमिटीकडे नावे जाऊन प्रदेश कमिटी अंतिम निर्णय घेते. ही काँग्रेस पक्षाची निवडीची परंपरा जिल्हाध्यक्षांनी खंडित केली असून, ही निवड ठोकशाही पध्दतीने निवड केल्याचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी सांगितले.शांताराम गाडे यांच्या निवडीला आमचा विरोध नाही. मात्र, त्यांची निवड करण्यासाठी वापरलेली पध्दत ही इतर कार्यकर्ते यांच्यावर अन्यायकारक व लोकशाहीला, काँग्रेस परंपरेला धरून नाही. याला आमचा विरोध आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या असलेले जिल्हाध्यक्ष हे हुकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेत, असा आरोप सय्यद यांनी केला.

तालुक्यात पाच ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिल्या असत्या, मात्र चुकीच्या पध्दतीने केलेल्या नियुक्तीमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडून हाती येणाऱ्या ग्रामपंचायती हातातून निसटून गेल्याने याला जिल्हाध्यक्ष कारणीभूत असल्याचा ठपका तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी ठेवला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी