शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

लांजा कॉंग्रेस तालुकाध्यक्षांची निवड घटनाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:10 IST

congress Ratnagiri- लांजा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्षपद काँग्रेस पक्षाच्या घटनाबाह्य असून, तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. जिल्हाध्यक्ष यांनी लोकशाही पध्दतीने तालुकाध्यक्ष यांची नियुक्ती केलेली नसल्याने हे काँग्रेस पक्षाला घातक आहे.

ठळक मुद्देलांजा कॉंग्रेस तालुकाध्यक्षांची निवड घटनाबाह्यपदाधिकाऱ्यांचा आरोप, जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या मागणीला पुन्हा जोर

लांजा : लांजा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्षपद काँग्रेस पक्षाच्या घटनाबाह्य असून, तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. जिल्हाध्यक्ष यांनी लोकशाही पध्दतीने तालुकाध्यक्ष यांची नियुक्ती केलेली नसल्याने हे काँग्रेस पक्षाला घातक आहे. जिल्हाध्यक्ष यांची मनमानी करत असल्याने त्यांना तातडीने जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे दाद मागितली जाणार आहे.यावेळी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, ज्येष्ठ नेते ॲड. सदानंद गांगण, सरचिटणीस महेश सप्रे, सुनील कानडे, शहराध्यक्ष प्रसन्न शेट्ये, खलील मणेर, नगरसेवक रफिक नेवरेकर, प्रकाश लांजेकर, आदम रखांगी, मोहन दाभोळकर, सुरेश भगते उपस्थित होते. लांजा तालुकाध्यक्षपदी दोन दिवसांपूर्वीच शांताराम गाडे यांची नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले होते.

या निवडीला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड करताना पक्षाकडून निरीक्षक पाठवला जातो. बैठक घेऊन इच्छुकांची नावे विचारात घेतली जातात. जास्त नावे असतील, तर मात्र प्रदेश कमिटीकडे नावे जाऊन प्रदेश कमिटी अंतिम निर्णय घेते. ही काँग्रेस पक्षाची निवडीची परंपरा जिल्हाध्यक्षांनी खंडित केली असून, ही निवड ठोकशाही पध्दतीने निवड केल्याचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी सांगितले.शांताराम गाडे यांच्या निवडीला आमचा विरोध नाही. मात्र, त्यांची निवड करण्यासाठी वापरलेली पध्दत ही इतर कार्यकर्ते यांच्यावर अन्यायकारक व लोकशाहीला, काँग्रेस परंपरेला धरून नाही. याला आमचा विरोध आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या असलेले जिल्हाध्यक्ष हे हुकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेत, असा आरोप सय्यद यांनी केला.

तालुक्यात पाच ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिल्या असत्या, मात्र चुकीच्या पध्दतीने केलेल्या नियुक्तीमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडून हाती येणाऱ्या ग्रामपंचायती हातातून निसटून गेल्याने याला जिल्हाध्यक्ष कारणीभूत असल्याचा ठपका तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी ठेवला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी