शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात वाढले साडेआठ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संचारबंदी करूनही अजून रुग्णसंख्या आटोक्यात आली नसल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम आहे. कोरोनाची दुसरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : संचारबंदी करूनही अजून रुग्णसंख्या आटोक्यात आली नसल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असल्याने चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या तीनपट चाचण्या दुसऱ्या पंधरवड्यात करण्यात आल्या असून, रुग्णसंख्या सुमारे चौपटीने वाढली आहे. या काळात रुग्ण बरे होण्याचा वेग मात्र दुप्पटच राहिला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, राज्य सरकारने प्रथम वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. त्याने कोणताही फरक पडत नसल्याने आणि रुग्णवाढीचा वेग अफाट वाढल्याने अखेर १५ एप्रिलपासून राज्यात सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, संचारबंदीनंतरही कोरोना रुग्णवाढीची गती थांबलेली नाही. किंबहुना, संचारबंदी सुरू झाल्यापासून रुग्णांची संख्या अधिकच वाढली आहे.

राज्यात सगळीकडेच रुग्ण वाढत असल्याने आणि लाटेत या संसर्गाची गती अधिक असल्याने रुग्ण लवकर निष्पन्न व्हावेत, यासाठी चाचण्यांवर भर देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातही ३१ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत ९,३२५ चाचण्या करण्यात आल्या. या काळात २,५७९ रुग्ण सापडले, तर याच काळात १,२२४ जण कोरोनामुक्त झाले. पुढील १५ दिवसांत म्हणजेच संचारबंदी काळात १५ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात तब्बल २७ हजार ५०८ चाचण्या झाल्या. या काळात ८,६६२ रुग्ण सापडले, तर ३,५६५ जण कोरोनामुक्त झाले.