शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

संचारबंदीच्या काळात वाढले साडेआठ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संचारबंदी करूनही अजून रुग्णसंख्या आटोक्यात आली नसल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम आहे. कोरोनाची दुसरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : संचारबंदी करूनही अजून रुग्णसंख्या आटोक्यात आली नसल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असल्याने चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या तीनपट चाचण्या दुसऱ्या पंधरवड्यात करण्यात आल्या असून, रुग्णसंख्या सुमारे चौपटीने वाढली आहे. या काळात रुग्ण बरे होण्याचा वेग मात्र दुप्पटच राहिला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, राज्य सरकारने प्रथम वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. त्याने कोणताही फरक पडत नसल्याने आणि रुग्णवाढीचा वेग अफाट वाढल्याने अखेर १५ एप्रिलपासून राज्यात सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, संचारबंदीनंतरही कोरोना रुग्णवाढीची गती थांबलेली नाही. किंबहुना, संचारबंदी सुरू झाल्यापासून रुग्णांची संख्या अधिकच वाढली आहे.

राज्यात सगळीकडेच रुग्ण वाढत असल्याने आणि लाटेत या संसर्गाची गती अधिक असल्याने रुग्ण लवकर निष्पन्न व्हावेत, यासाठी चाचण्यांवर भर देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातही ३१ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत ९,३२५ चाचण्या करण्यात आल्या. या काळात २,५७९ रुग्ण सापडले, तर याच काळात १,२२४ जण कोरोनामुक्त झाले. पुढील १५ दिवसांत म्हणजेच संचारबंदी काळात १५ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात तब्बल २७ हजार ५०८ चाचण्या झाल्या. या काळात ८,६६२ रुग्ण सापडले, तर ३,५६५ जण कोरोनामुक्त झाले.