शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

संचारबंदीच्या काळात वाढले साडेआठ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संचारबंदी करूनही अजून रुग्णसंख्या आटोक्यात आली नसल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम आहे. कोरोनाची दुसरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : संचारबंदी करूनही अजून रुग्णसंख्या आटोक्यात आली नसल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असल्याने चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या तीनपट चाचण्या दुसऱ्या पंधरवड्यात करण्यात आल्या असून, रुग्णसंख्या सुमारे चौपटीने वाढली आहे. या काळात रुग्ण बरे होण्याचा वेग मात्र दुप्पटच राहिला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, राज्य सरकारने प्रथम वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. त्याने कोणताही फरक पडत नसल्याने आणि रुग्णवाढीचा वेग अफाट वाढल्याने अखेर १५ एप्रिलपासून राज्यात सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, संचारबंदीनंतरही कोरोना रुग्णवाढीची गती थांबलेली नाही. किंबहुना, संचारबंदी सुरू झाल्यापासून रुग्णांची संख्या अधिकच वाढली आहे.

राज्यात सगळीकडेच रुग्ण वाढत असल्याने आणि लाटेत या संसर्गाची गती अधिक असल्याने रुग्ण लवकर निष्पन्न व्हावेत, यासाठी चाचण्यांवर भर देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातही ३१ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत ९,३२५ चाचण्या करण्यात आल्या. या काळात २,५७९ रुग्ण सापडले, तर याच काळात १,२२४ जण कोरोनामुक्त झाले. पुढील १५ दिवसांत म्हणजेच संचारबंदी काळात १५ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात तब्बल २७ हजार ५०८ चाचण्या झाल्या. या काळात ८,६६२ रुग्ण सापडले, तर ३,५६५ जण कोरोनामुक्त झाले.