शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

३५ कोटींची कमाई;अर्थसंकल्प ९३ कोटींचा

By admin | Updated: February 23, 2016 00:17 IST

फुगलेले आकडे : रत्नागिरी नगरपरिषदेची उड्डाणे फसवी?

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाची कोटींची उड्डाणे ही केवळ कागदपत्रावरच राहतात आणि प्रत्यक्षात अर्थसंकल्पाच्या रकमेच्या ३० टक्केच निधी उपलब्ध होतो व खर्च होतो. २०१५-१६ चा नगरपरिषदेचा अर्थसंकल्प १०९ कोटींचा असूनही प्रत्यक्षात वर्षभरात झालेला खर्च हा ३० कोटींच्या जवळपास असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१६-१७ चा अर्थसंकल्पही ९३ कोटींचा असून, प्रत्यक्ष अपेक्षित खर्च ८६ कोटी ६० लाख ५८ हजार दाखविण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील हा फुगवटा रत्नागिरीकरांची दिशाभूल करणारा असल्याची टीका आता नागरिकांतूनही सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प हा २५ ते ३० कोटींपर्यंत होता. त्यानंतर अर्थसंकल्पाचा आकडा जादुई झाला आहे. गेल्यावर्षी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प १०९ कोटींवर गेला होता. त्यामुळे रत्नागिरी शहरात पैशांचा पाऊस पडणार, विकासकामांचा धडका लागणार असे वातावरण होते. मात्र, अर्थसंकल्पातील अपेक्षित १०९ कोटी काही जमा झालेच नाहीत. ३० कोटी रुपयांपर्यंतच जमा झाले व त्यातून विकासावर खर्च करण्यात आला. मूळ अर्थसंकल्पाच्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ३० ते ३५ टक्केच निधी उपलब्ध झाला. यावर्षीच्या नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पालाही अपेक्षांचा मोठा फुगवटा आला आहे. पालिकेच्या आर्थिक जमेच्या बाजूंचा अभ्यास केला असता, २०१६-१७ मध्येही जमा होणारी रक्कम ही ३५ कोटींपेक्षा अधिक नाही, असे चित्र आहे. नगरपरिषदेला जकातीपोटी शासनाकडून मिळणारे सुमारे १६ कोटींचे अनुदान, करवसुलीतून ६ कोटी, पाणीकर २ कोटी, मालमत्ता भाडे, भूईभाडे उत्पन्न ६० लाख, अनुदान, नोंदणी, करमणूक कर १ कोटी, विकास कर व प्रिमियम, परवानगी, रेखांकन ५ कोटी, नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, दलित वस्ती निधीतून सुमारे ५ कोटी या उत्पन्नाच्या बाजू लक्षात घेतल्या तर ३५ कोटींची मर्यादा आहेत. त्यामुुळे गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाला १०० कोटींपर्यंत फुगवटा येण्यामागे काय गुपित आहे, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. भविष्यात मिळणारे उत्पन्न हे अपेक्षित धरताना निश्चितपणे काही प्रमाणात अधिक धरावे यात संशय नाही. जमा होणाऱ्या रकमेच्या तिप्पट अपेक्षा ठेवणारा अर्थसंकल्प ही काय संकल्पना आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (प्रतिनिधी) दिशाभूल ! : गतवर्षी ३० कोटींचीच कामे ? भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजना सुधारणेसाठी १०१ कोटी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, त्याचे प्रस्ताव पाठविले नसल्याने ही रक्कम अर्थसंकल्पात नाही. अन्यथा हा अर्थसंकल्प आणखी १०१ कोटींनी वाढला असता अशी चर्चा आहे