शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

३५ कोटींची कमाई;अर्थसंकल्प ९३ कोटींचा

By admin | Updated: February 23, 2016 00:17 IST

फुगलेले आकडे : रत्नागिरी नगरपरिषदेची उड्डाणे फसवी?

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाची कोटींची उड्डाणे ही केवळ कागदपत्रावरच राहतात आणि प्रत्यक्षात अर्थसंकल्पाच्या रकमेच्या ३० टक्केच निधी उपलब्ध होतो व खर्च होतो. २०१५-१६ चा नगरपरिषदेचा अर्थसंकल्प १०९ कोटींचा असूनही प्रत्यक्षात वर्षभरात झालेला खर्च हा ३० कोटींच्या जवळपास असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१६-१७ चा अर्थसंकल्पही ९३ कोटींचा असून, प्रत्यक्ष अपेक्षित खर्च ८६ कोटी ६० लाख ५८ हजार दाखविण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील हा फुगवटा रत्नागिरीकरांची दिशाभूल करणारा असल्याची टीका आता नागरिकांतूनही सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प हा २५ ते ३० कोटींपर्यंत होता. त्यानंतर अर्थसंकल्पाचा आकडा जादुई झाला आहे. गेल्यावर्षी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प १०९ कोटींवर गेला होता. त्यामुळे रत्नागिरी शहरात पैशांचा पाऊस पडणार, विकासकामांचा धडका लागणार असे वातावरण होते. मात्र, अर्थसंकल्पातील अपेक्षित १०९ कोटी काही जमा झालेच नाहीत. ३० कोटी रुपयांपर्यंतच जमा झाले व त्यातून विकासावर खर्च करण्यात आला. मूळ अर्थसंकल्पाच्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ३० ते ३५ टक्केच निधी उपलब्ध झाला. यावर्षीच्या नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पालाही अपेक्षांचा मोठा फुगवटा आला आहे. पालिकेच्या आर्थिक जमेच्या बाजूंचा अभ्यास केला असता, २०१६-१७ मध्येही जमा होणारी रक्कम ही ३५ कोटींपेक्षा अधिक नाही, असे चित्र आहे. नगरपरिषदेला जकातीपोटी शासनाकडून मिळणारे सुमारे १६ कोटींचे अनुदान, करवसुलीतून ६ कोटी, पाणीकर २ कोटी, मालमत्ता भाडे, भूईभाडे उत्पन्न ६० लाख, अनुदान, नोंदणी, करमणूक कर १ कोटी, विकास कर व प्रिमियम, परवानगी, रेखांकन ५ कोटी, नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, दलित वस्ती निधीतून सुमारे ५ कोटी या उत्पन्नाच्या बाजू लक्षात घेतल्या तर ३५ कोटींची मर्यादा आहेत. त्यामुुळे गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाला १०० कोटींपर्यंत फुगवटा येण्यामागे काय गुपित आहे, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. भविष्यात मिळणारे उत्पन्न हे अपेक्षित धरताना निश्चितपणे काही प्रमाणात अधिक धरावे यात संशय नाही. जमा होणाऱ्या रकमेच्या तिप्पट अपेक्षा ठेवणारा अर्थसंकल्प ही काय संकल्पना आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (प्रतिनिधी) दिशाभूल ! : गतवर्षी ३० कोटींचीच कामे ? भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजना सुधारणेसाठी १०१ कोटी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, त्याचे प्रस्ताव पाठविले नसल्याने ही रक्कम अर्थसंकल्पात नाही. अन्यथा हा अर्थसंकल्प आणखी १०१ कोटींनी वाढला असता अशी चर्चा आहे