शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

रत्नागिरीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच आता धुळीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 13:49 IST

रत्नागिरी शहरातील तसेच उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणके, बरगड्या निकामी होतायत की काय, अशी भीती वाहनचालकांना वाटत असतानाच हे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या लाल माती आणि खडी यामुळे आता मोठ्या प्रमाणावर धुरळा उडू लागल्याने डोळ्यांच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. दुचाकीस्वारांना या धुळीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच आता धुळीचा त्रासमणके, बरगड्यांबरोबरच आता डोळ्यांचीही समस्या, हिवाळ्याआधीच धुळीचे धुके

रत्नागिरी : शहरातील तसेच उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणके, बरगड्या निकामी होतायत की काय, अशी भीती वाहनचालकांना वाटत असतानाच हे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या लाल माती आणि खडी यामुळे आता मोठ्या प्रमाणावर धुरळा उडू लागल्याने डोळ्यांच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. दुचाकीस्वारांना या धुळीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.यावर्षी रत्नागिरीतील मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वारंवार तक्रारी होऊनही त्याकडे पालिका प्रशासनाकडून पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाऊस सुरु होण्याअगोदर शहरातील रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे असताना नगर परिषद प्रशासन मात्र निद्रीस्तच राहिले. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने हे खड्डे अधिकच वाढले. पाऊस सुरू होताच नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजविण्याची घोषणा केली. मात्र, ती केवळ घोषणाच ठरली. प्रत्यक्षात थातूरमातूर खड्डे बुजविण्याचे काम नगर परिषदेकडून करण्यात आले.गणेशोत्सवाला दोन-तीन दिवस असतानाच जांभ्या दगडाने काही ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने या बुजवलेल्या खड्ड्यांतील माती रस्त्यावर येऊन चिखल झाला. त्यातच रस्त्यावर खडीही टाकण्यात आली. मात्र, ही खडीही रस्त्यावर आल्याने रस्ता निसरडा बनला. जिल्हाधिकारी यांनी रस्त्यावर खडी टाकून त्यावर डांबर टाकण्याचे आदेश दिले. मात्र, ते आदेशही धुडकावण्यात आले.पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर नगर परिषदेतर्फे काही ठिकाणी पुन्हा एकदा जांभ्या दगडांनी खड्डे भरण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अधूनमधून या ह्यखड्डे भरणेह्ण कामाचा त्रास वाहतुकीला होतच होता. मात्र, रस्ता काही दुरूस्त झाला नाही. आता या जांभ्या दगडाच्या मातीमुळे तसेच खडीमुळे मोठ्या प्रमाणावर धुरळा निर्माण होत आहे. माळनाका तसेच आरोग्य मंदिर या भागात हा त्रास अधिक होत आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आजारात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे.

रत्नागिरी शहराच्या सर्वच भागात रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास असह्य होत असतानाच ते बुजविण्यासाठी केलेली उपाययोजनाही तेवढीच हानिकारक आहे. खड्ड्यात टाकलेल्या माती तसेच खडीमुळे होणाऱ्या धुरळ्याचा त्रास डोळ्यांना इजा करत आहे, त्याचा मीही अनुभव घेत आहे. धुरळ्यामुळे डोळ्याच्या आतील नाजूक भागाला इजा होत असल्याने पाणी येणे, डोळे लाल होणे, सतत खुपणे, डोळे सुजणे, खाज येणे आदी त्रास वाढू लागले आहेत.- डॉ. विवेक आरभावे, नेत्रतज्ज्ञ

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRatnagiriरत्नागिरी