शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोरोना काळात जिल्ह्यात झाली ४०४१ बेरोजगारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 15:45 IST

RatnagiriNews- कौशल्य विकासातून तरूणांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य वाढवून रोजगार संधी मिळवून दिली जात आहे. मात्र अलिकडे बेरोजगारांची संख्या वाढली असून, कोरोना काळात तब्बल ४०४१ जणांनी नावनोंदणी केली आहे.

ठळक मुद्देकोरोना काळात जिल्ह्यात झाली ४०४१ बेरोजगारांची नोंदणीकौशल्य विकास कार्यक्रमातून १०९४ जणांपैकी ५०५ जणांना रोजगार संधी

शोभना कांबळेरत्नागिरी : पूर्वी बेरोजगारांची नावनोंदणी करून त्यांना रोजगार मिळवून देणाऱ्या सेवायोजन कार्यालयाचे नाव तिसऱ्यांदा बदलून आता कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र असे करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासातून तरूणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे ज्यांच्यात कुठल्याही व्यवसायाचे कौशल्य नाही किंवा अपुऱ्या प्रमाणात आहे, अशांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य वाढवून रोजगार संधी मिळवून दिली जात आहे. मात्र अलिकडे बेरोजगारांची संख्या वाढली असून, कोरोना काळात तब्बल ४०४१ जणांनी नावनोंदणी केली आहे.येथील कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे लॉकडाऊन काळात खासगी कंपन्यांचे ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात आले. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१७ सालापासून १,०९४ बेरोजगारांना प्रशिक्षण मिळाले. त्यातून ४२४ जणांना रोजगार मिळाला तर ८१ जणांनी स्वयंरोजगार सुरू केले.रोजगार मेळाव्यांना जेमतेम प्रतिसादरत्नागिरी शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनजिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा कार्यालय आहे. या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चा. द. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते.

रत्नागिरीत उद्योग कमी असल्याने, मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची मागणी होत नाही. त्यामुळे बाहेरच्या कंपन्यांना आवश्यक असलेल्या पदांनुसार मेळावे आयोजित केले जातात. यावर्षी खासगी कंपन्यांमधील भरतीसाठी पाच मेळावे घेण्यात आले. या मेळाव्याला उपस्थित ५७७पैकी १११ जणांची प्राथमिक स्तरावर निवड झाली आहे.रोजगाराचा लाभ घ्या

कौशल्य विकास कार्यक्रमात बेरोजगारांना त्यांच्या आवड आणि गरजेनुसार प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शासकीय नोकरीच्या संधी आता फारशा उपलब्ध नाहीत, तसेच खासगी क्षेत्रातही मर्यादीत संधी आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी त्यावर विसंबून न राहता शासनाच्या या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेऊन रोजगार संधीचाही लाभ घ्यावा.- गणेश बिटोडे, अधिकारी, कौशल्यविकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र

कौशल्य विकास कार्यक्रमातून मला विनामूल्य प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणाचा लाभ घेत मी माझे स्वत:चे घरबसल्या ब्युटी पार्लर सुरू केले आहे. त्यामुळे मी माझे महिन्याचे उत्पन्न मिळवत असून, स्वत:च्या पायावर उभी राहिले आहे.- मीरा चव्हाण, ब्युटीशियन

शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा फायदा बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे त्यांच्यात नवीन कौशल्ये निर्माण होऊन किंवा जी आहेत ती अधिक विकसित होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.- कोमल सोळंखी, मंडणगड

कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून मी ह्यबँकिंग ॲण्ड अकौटिंगह्ण या विषयाचे प्रशिक्षण घेतले. यातून रोजगाराची संधी मिळणार आहे. अन्य सुशिक्षित युवक - युवतींनीही नोकरीची अपेक्षा न करता, या विविध प्रकारच्या प्रशिक्षणांचा लाभ घेऊन स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे.- स्वप्नाली साळवी, चिपळूण

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारRatnagiriरत्नागिरीEmployeeकर्मचारी