शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टयांमुळे पर्यटनस्थळे फुलली, गणपतीपुळेत पर्यटकांची गर्दी

By मेहरून नाकाडे | Updated: November 18, 2023 18:12 IST

रत्नागिरी : दिपावलीचा सण साजरा करून पर्यटकांचे जिल्ह्यात आगमन सुरू झाले आहे. हिवाळी सुट्ट्या असल्याने गेल्या दोन दिवसापासून पयर्टनस्थळे ...

रत्नागिरी : दिपावलीचा सण साजरा करून पर्यटकांचे जिल्ह्यात आगमन सुरू झाले आहे. हिवाळी सुट्ट्या असल्याने गेल्या दोन दिवसापासून पयर्टनस्थळे गर्दीने फुलली आहेत. समुद्रकिनाऱ्याचे आकर्षक जास्त असल्याने पर्यटक बीचेसवर गर्दी करत आहेत. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिवसाला २० ते २५ हजार पर्यटक येत असल्याने मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे.दिवाळी सणाचा आनंद घेवून परजिल्ह्यासह, राज्यातील पर्यटक जिल्ह्यात येत आहेत. याशिवाय विदेशी पर्यटकांचे आगमन सुरू झाले आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने कुटूंबासह देवदर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महाविद्यालयीन युवक तर ग्रुपने दुचाकीवर स्वार होत ट्रीप काढत आहेत. याशिवाय रिक्षा, कार, जीप, टेंम्पो ट्रॅव्हलर, खासगी बसेसमधून पर्यटक येत आहेत. परजिल्ह्यातील काही भागातून युवक पदयात्रेने गणपतीपुळेत दर्शनासाठी येत आहेत.देवदर्शनासह आसपासच्या पर्यटनस्थळाचा आनंद घेतला जात आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. समुद्रस्नानासह, वाॅटरस्पोर्टस्, घोडा, उंट सवारी केली जात आहे. पर्यटकांमुळे खाद्यपदार्थ, खेळणी विक्रीसह छोट्या मोठ्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत गर्दी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातून भाविक गणपतीपुळेत येत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिल्याने महिला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ७५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात १०० टक्के सवलत देण्यात येत असल्याने समवयस्क ग्रुप सहलींचे प्रमाण वाढले आहे.येणाऱ्या पर्यटकांपैकी अनेक पर्यटक एका दिवसात परत फिरतात. तर काही पर्यटक निवासासाठी थांबतात. गणपतीपुळेसह मालगुंड, नेवरे, भगवतीबंदर, आरेवारे येथील निवासव्यवस्थेचा आसरा घेत आहेत. गणपुतीपुळेसह काजीरभाटी, मालगुंड, आरेवारे, मांडवी, भाट्ये, गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे.

गणपतीपुळेतील श्री गणेशमंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत असून दररोज १८ ते २० हजार भाविक दर्शन घेत आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन