शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीचे नुकसान, बोटींनी टाकला बंदरात नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 13:44 IST

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत

ठळक मुद्देहर्णे - बुरोंडी या बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत अनेक बोटीने टाकला नांगर समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट पुढील दोन दिवस वादळाचा धोका कायम

रत्नागिरी, दि. ४  : रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट आहे,  समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने  पुढील दोन दिवस सतर्कता बाळगण्याच्या इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील हर्णे - बुरोंडी बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या असून अनेक बोटी जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत नांगर टाकून उभ्या आहेत.दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यांवर मध्यरात्री मोठी भरती आल्याने समुद्र किनाऱ्यांवरील अनेक   दुकाने समुद्रात वाहून गेली.  दक्षिणेकडे समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत.

कोकण किनारपट्टीवर रात्री उशिरा आलेल्या मोठ्या भरतीत ठिकठिकाणी नुकसान झाले असून मुरुड, हर्णे समुद्र किनाऱ्यांवरील दुकाने व छोट्या होडींचे मोठे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट मारत असून पुढील दोन दिवस वादळाचा धोका कायम असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, दापोली तालुक्यातील हर्णे - बुरोंडी या बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या असून अनेक बोटीने जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत नांगर टाकला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी