शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीचे नुकसान, बोटींनी टाकला बंदरात नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 13:44 IST

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत

ठळक मुद्देहर्णे - बुरोंडी या बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत अनेक बोटीने टाकला नांगर समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट पुढील दोन दिवस वादळाचा धोका कायम

रत्नागिरी, दि. ४  : रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट आहे,  समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने  पुढील दोन दिवस सतर्कता बाळगण्याच्या इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील हर्णे - बुरोंडी बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या असून अनेक बोटी जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत नांगर टाकून उभ्या आहेत.दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यांवर मध्यरात्री मोठी भरती आल्याने समुद्र किनाऱ्यांवरील अनेक   दुकाने समुद्रात वाहून गेली.  दक्षिणेकडे समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत.

कोकण किनारपट्टीवर रात्री उशिरा आलेल्या मोठ्या भरतीत ठिकठिकाणी नुकसान झाले असून मुरुड, हर्णे समुद्र किनाऱ्यांवरील दुकाने व छोट्या होडींचे मोठे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट मारत असून पुढील दोन दिवस वादळाचा धोका कायम असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, दापोली तालुक्यातील हर्णे - बुरोंडी या बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या असून अनेक बोटीने जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत नांगर टाकला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी