शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे राजापुरात एकाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:38 IST

आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरूणाचा राजापूर तालुक्यातील पाचल येथील अर्जुना धरणात बुडून मृत्यू झाला. शशी लक्ष्मण खेडेकर (२४) असे त्याचे नाव असून, तो पाचलमधीलच रहिवासी होता.

ठळक मुद्देराजापुरात एकाचा बुडून मृत्यूआठच दिवसांपूर्वी झाले होते लग्न

रत्नागिरी : आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरूणाचा राजापूर तालुक्यातील पाचल येथील अर्जुना धरणात बुडून मृत्यू झाला. शशी लक्ष्मण खेडेकर (२४) असे त्याचे नाव असून, तो पाचलमधीलच रहिवासी होता.

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात केवळ राजापूर तालुक्यातच पाऊस पडला असून, इतरत्र अजून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, सोमवारी वादळी वाऱ्यामुळे खेड आणि चिपळूण तालुक्यात सात घरांचे ४६ हजारांहून अधिक नुकसान झाले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशी लक्ष्मण खेडेकर हा पोहण्यासाठी अर्जुना धरणामध्ये गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. आठच दिवसांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात अजूनही पावसाचे आगमन झालेले नाही. सोमवारी सकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत केवळ राजापूर तालुक्यात ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतरत्र कोठेही पाऊस पडलेला नाही.

सोमवारी वादळी वाऱ्यांमुळे खेड तालुक्यात मौजे वावेतर्फ नातू येथे सावित्री कदम (१८२० रूपये), पार्वती डांगे (५९१५ रूपये), सरस्वती भांबड (९५४० रूपये) आणि मारूती डांगे (२५८० रूपये) यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात मौजे वेहळे येथे मानसिंग राजेशिर्के (९००० रूपये), सुरेश सिंगे (८७५० रूपये) आणि गोपाळ भोजने (९००० रूपये) यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी