शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
4
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
5
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
6
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
7
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
8
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
9
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
10
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
11
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
12
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
13
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
14
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
15
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
16
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
17
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
18
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
19
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
20
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे राजापुरात एकाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:38 IST

आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरूणाचा राजापूर तालुक्यातील पाचल येथील अर्जुना धरणात बुडून मृत्यू झाला. शशी लक्ष्मण खेडेकर (२४) असे त्याचे नाव असून, तो पाचलमधीलच रहिवासी होता.

ठळक मुद्देराजापुरात एकाचा बुडून मृत्यूआठच दिवसांपूर्वी झाले होते लग्न

रत्नागिरी : आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरूणाचा राजापूर तालुक्यातील पाचल येथील अर्जुना धरणात बुडून मृत्यू झाला. शशी लक्ष्मण खेडेकर (२४) असे त्याचे नाव असून, तो पाचलमधीलच रहिवासी होता.

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात केवळ राजापूर तालुक्यातच पाऊस पडला असून, इतरत्र अजून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, सोमवारी वादळी वाऱ्यामुळे खेड आणि चिपळूण तालुक्यात सात घरांचे ४६ हजारांहून अधिक नुकसान झाले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशी लक्ष्मण खेडेकर हा पोहण्यासाठी अर्जुना धरणामध्ये गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. आठच दिवसांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात अजूनही पावसाचे आगमन झालेले नाही. सोमवारी सकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत केवळ राजापूर तालुक्यात ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतरत्र कोठेही पाऊस पडलेला नाही.

सोमवारी वादळी वाऱ्यांमुळे खेड तालुक्यात मौजे वावेतर्फ नातू येथे सावित्री कदम (१८२० रूपये), पार्वती डांगे (५९१५ रूपये), सरस्वती भांबड (९५४० रूपये) आणि मारूती डांगे (२५८० रूपये) यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात मौजे वेहळे येथे मानसिंग राजेशिर्के (९००० रूपये), सुरेश सिंगे (८७५० रूपये) आणि गोपाळ भोजने (९००० रूपये) यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी