शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

चिपळुणात रॉकेलची टंचाई

By admin | Updated: September 8, 2015 22:29 IST

गराहकांना फटका : पुरवठा शाखेचा स्वत:च्या निर्णयालाच हरताळ

चिपळूण : शासनाने रॉकेलचे रेशनिंग केल्यापासून रॉकेल सामान्य ग्राहकाला मिळणे दुरापास्त झाले आहे. मुळात रॉकेलचा तूटपुंजा कोठा तालुक्याला पुरविला जातो आणि जिल्हा पुरवठा शाखा आपल्याच निर्णयाला हरताळ फासते. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे १ जुलैचे आदेश विचारात घेऊन रॉकेल वितरणाच्या परिमाणात बदल करण्यात आला. शहरी व ग्रामीण भागासाठी वाटपाचे वेगवेगळे असलेले प्रमाण रद्द करुन बिगर गॅसधारकांसाठी नवीन प्रमाण निश्चित करण्यात आले. शिधापत्रिकेवरील एका व्यक्तिला २ लीटर, तर २ व्यक्तिंना ३ लीटर, ३ व त्याहून अधिक व्यक्तिंसाठी ४ लीटर रॉकेल देण्याचे पत्र जिल्हा पुरवठा विभागाने २४ आॅगस्ट रोजी दुकानदारांना दिले. पण याच महिन्यात तालुक्याला केवळ २८ टक्के कोठाच दिला. मग हे प्रमाण दुकानदार राखणार कसे? असा प्रश्न आहे. पुरवठा खाते पुरेसा कोठा देत नाही. त्यामुळे पुरेसे रॉकेल ग्राहकाला पुरविणे अवघड होते. मग दुकानदाराबरोबर वाद होतात. तक्रारी केल्या जातात व रॉकेलचा काळाबाजार केला जातो, असे बोलले जाते. दुकानदारांना जो तूटपुंजा साठा मिळतो, त्यातून दुकानदार काळाबाजार करतो. त्याशिवाय त्याला दुकान चालविणे अवघड असते. पण, ग्राहकांना रॉकेल न देताच काही दुकानदार काळा बाजार करतात. अशा दुकानदारांवर कोणी कारवाई करत नाही. रावतळे येथे काही महिन्यांपूर्वी निवासी नायब तहसीलदारांनी तलाठी नामक दुकानदाराला रंगेहात पकडले. त्याच्यावर कोणती कारवाई झाली, ते पुरवठा विभागाने आजअखेर सांगितले नाही. मुर्तवडे गावी कातळवाडीतील दुकानदाराने काळाबाजार केल्याची तक्रार उपसरपंच विजय नेवरेकर यांनी केली, त्याचे पुढे काय झाले, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. मुळात दुकानदारांना रॉकेलचा कोठाच तूटपुंजा दिल्यावर सामान्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. आतातर गॅस सिलिंडरधारकांना रॉकेल पुरवठा बंद झाल्याने चालू महिन्याचे रॉकेलचे नियतनही आले नाही. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ग्राहकांना रॉकेल मिळणे अवघड होणार आहे. ग्रामीण भागात अजूनही रॉकेलचा वापर होत असल्याने महिलांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून रॉकेल वाटपात सुसूत्रता आणावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) अपुरा कोटा...रॉकेल वाटपाबाबत तालुक्यात सर्वत्र बोंबाबोंब आहे. याला दुकानदार जबाबदार नाहीत. मुळात कोटाच पुरेसा उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना रॉकेल देणार कसे? शिवाय काही वेळा कोटा अगदीच कमी येतो, त्याचे वाटप करणेही अवघड होते. याचा दुकानदाराला त्रास होतो. यामुळे ग्रामीण भागात नाहक गैरसमज होतात, वाद वाढतात. हे आता थांबायला हवे, असे जिल्हा रास्तदर धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी सांगितले.