शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात रॉकेलची टंचाई

By admin | Updated: September 8, 2015 22:29 IST

गराहकांना फटका : पुरवठा शाखेचा स्वत:च्या निर्णयालाच हरताळ

चिपळूण : शासनाने रॉकेलचे रेशनिंग केल्यापासून रॉकेल सामान्य ग्राहकाला मिळणे दुरापास्त झाले आहे. मुळात रॉकेलचा तूटपुंजा कोठा तालुक्याला पुरविला जातो आणि जिल्हा पुरवठा शाखा आपल्याच निर्णयाला हरताळ फासते. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे १ जुलैचे आदेश विचारात घेऊन रॉकेल वितरणाच्या परिमाणात बदल करण्यात आला. शहरी व ग्रामीण भागासाठी वाटपाचे वेगवेगळे असलेले प्रमाण रद्द करुन बिगर गॅसधारकांसाठी नवीन प्रमाण निश्चित करण्यात आले. शिधापत्रिकेवरील एका व्यक्तिला २ लीटर, तर २ व्यक्तिंना ३ लीटर, ३ व त्याहून अधिक व्यक्तिंसाठी ४ लीटर रॉकेल देण्याचे पत्र जिल्हा पुरवठा विभागाने २४ आॅगस्ट रोजी दुकानदारांना दिले. पण याच महिन्यात तालुक्याला केवळ २८ टक्के कोठाच दिला. मग हे प्रमाण दुकानदार राखणार कसे? असा प्रश्न आहे. पुरवठा खाते पुरेसा कोठा देत नाही. त्यामुळे पुरेसे रॉकेल ग्राहकाला पुरविणे अवघड होते. मग दुकानदाराबरोबर वाद होतात. तक्रारी केल्या जातात व रॉकेलचा काळाबाजार केला जातो, असे बोलले जाते. दुकानदारांना जो तूटपुंजा साठा मिळतो, त्यातून दुकानदार काळाबाजार करतो. त्याशिवाय त्याला दुकान चालविणे अवघड असते. पण, ग्राहकांना रॉकेल न देताच काही दुकानदार काळा बाजार करतात. अशा दुकानदारांवर कोणी कारवाई करत नाही. रावतळे येथे काही महिन्यांपूर्वी निवासी नायब तहसीलदारांनी तलाठी नामक दुकानदाराला रंगेहात पकडले. त्याच्यावर कोणती कारवाई झाली, ते पुरवठा विभागाने आजअखेर सांगितले नाही. मुर्तवडे गावी कातळवाडीतील दुकानदाराने काळाबाजार केल्याची तक्रार उपसरपंच विजय नेवरेकर यांनी केली, त्याचे पुढे काय झाले, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. मुळात दुकानदारांना रॉकेलचा कोठाच तूटपुंजा दिल्यावर सामान्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. आतातर गॅस सिलिंडरधारकांना रॉकेल पुरवठा बंद झाल्याने चालू महिन्याचे रॉकेलचे नियतनही आले नाही. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ग्राहकांना रॉकेल मिळणे अवघड होणार आहे. ग्रामीण भागात अजूनही रॉकेलचा वापर होत असल्याने महिलांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून रॉकेल वाटपात सुसूत्रता आणावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) अपुरा कोटा...रॉकेल वाटपाबाबत तालुक्यात सर्वत्र बोंबाबोंब आहे. याला दुकानदार जबाबदार नाहीत. मुळात कोटाच पुरेसा उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना रॉकेल देणार कसे? शिवाय काही वेळा कोटा अगदीच कमी येतो, त्याचे वाटप करणेही अवघड होते. याचा दुकानदाराला त्रास होतो. यामुळे ग्रामीण भागात नाहक गैरसमज होतात, वाद वाढतात. हे आता थांबायला हवे, असे जिल्हा रास्तदर धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी सांगितले.