शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

थंडीअभावी अजूनही पालवीचे प्रमाण सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 5:20 PM

Mango, Winter Session Maharashtra, ratnagirinews डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप थंडी गायब आहे. शिवाय मतलई वारही वाहात नसल्याने थंडीसाठी पोषक वातावरण नाही. जिल्ह्यात ९५ टक्के झाडांना पालवी आली आहे. मात्र, समुद्र किनारपट्टीलगत काही झाडांना दोन ते पाच टक्के मोहोर सुरू झाला आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर मोठ्या प्रमाणावर तुडतुडा असल्याने तो नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.

ठळक मुद्देथंडीअभावी अजूनही पालवीचे प्रमाण सर्वाधिक

रत्नागिरी : डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप थंडी गायब आहे. शिवाय मतलई वारही वाहात नसल्याने थंडीसाठी पोषक वातावरण नाही. जिल्ह्यात ९५ टक्के झाडांना पालवी आली आहे. मात्र, समुद्र किनारपट्टीलगत काही झाडांना दोन ते पाच टक्के मोहोर सुरू झाला आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर मोठ्या प्रमाणावर तुडतुडा असल्याने तो नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.अद्यापही ऑक्टोबर हिटप्रमाणे उष्मा जाणवत असून पाहिजे त्या प्रमाणात थंडी सुरू झालेली नाही. सर्वत्र पालवीचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होण्यास सव्वा ते दीड महिन्याचा अवधी लागत असल्याने मोहोर प्रक्रियेस उशीर होण्याची शक्यता आहे.

पालवीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव असल्याने कीटकनाशकांची फवारणीही वेळोवेळी करावी लागत आहे. काही ठिकाणी झाडांना किरकोळ मोहोर आला असून, तो जपण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागत आहे. अद्याप ३० ते ३२ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. आंब्याला मोहोर येण्यासाठी २६ ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता आहे.जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये थंडीचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे नीचांकी तापमानात येणाऱ्या मोहोराला फळधारणा अत्यल्प होते, त्याचवेळी पुनर्मोहोराचा धोका असल्याने एकूणच लहरी हवामानामुळे शेतकरी आतापासूनच धास्तावले आहेत.

पालवी सर्वाधिक असल्याने आंबा हंगाम लांबणार आहे, यात शंका नाही. मात्र, गतवर्षी फळधारणा न झालेल्या झाडांना मोहोर आला असून, त्याचे प्रमाण २ ते ५ टक्के इतकेच आहे. पालवीवर तुडतुडा मोठ्या प्रमाणावर असल्याने पालवीबरोबर मोहोर जपणे गरजेचे आहे.- राजन कदम, बागायतदार

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन