शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणामुळे माती रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:09 IST

मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर ते हातीवले या रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यालगत आहे. काही ठिकाणी डायव्हर्शनमुळे मातीचा रस्ता वापरावा लागत आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणामुळे माती रस्त्यावरपावसाळ्यात माती रस्त्यावर येणार, अपघाताची भीती अधिक

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर ते हातीवले या रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यालगत आहे. काही ठिकाणी डायव्हर्शनमुळे मातीचा रस्ता वापरावा लागत आहे.सोमवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. या मातीमुळे गाड्यांचे टायर स्लिप होत असल्याने राजापूर ते हातिवलेदरम्यान अनेक गाड्या चढावात थांबल्या होत्या. या भागात वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. मध्यरात्री उशिरापर्यंत गाड्या संथगतीने या मार्गावरून जात होत्या.गेल्याच महिन्यात अचानक कोसळलेल्या पावसामुळे लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे याठिकाणीदेखील वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या कामामुळे रस्त्यालगत ठेवण्यात आलेली माती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येण्याचा धोका आहे. रात्रीच्यावेळी ही माती रस्त्यावर आल्यास अपघाताची शक्यता अधिक आहे. रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेली माती बाजूला न केल्याने ती रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा होणार आहे.वाहने सावकाश हाकामुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिग रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले आहेत. ही माती पावसाळ्यात रस्त्यावर येण्याचा धोका आहे. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन वाहने घसरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहने सावकाश चालविणे आवश्यक आहे.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग