शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणामुळे माती रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:09 IST

मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर ते हातीवले या रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यालगत आहे. काही ठिकाणी डायव्हर्शनमुळे मातीचा रस्ता वापरावा लागत आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणामुळे माती रस्त्यावरपावसाळ्यात माती रस्त्यावर येणार, अपघाताची भीती अधिक

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर ते हातीवले या रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यालगत आहे. काही ठिकाणी डायव्हर्शनमुळे मातीचा रस्ता वापरावा लागत आहे.सोमवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. या मातीमुळे गाड्यांचे टायर स्लिप होत असल्याने राजापूर ते हातिवलेदरम्यान अनेक गाड्या चढावात थांबल्या होत्या. या भागात वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. मध्यरात्री उशिरापर्यंत गाड्या संथगतीने या मार्गावरून जात होत्या.गेल्याच महिन्यात अचानक कोसळलेल्या पावसामुळे लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे याठिकाणीदेखील वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या कामामुळे रस्त्यालगत ठेवण्यात आलेली माती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येण्याचा धोका आहे. रात्रीच्यावेळी ही माती रस्त्यावर आल्यास अपघाताची शक्यता अधिक आहे. रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेली माती बाजूला न केल्याने ती रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा होणार आहे.वाहने सावकाश हाकामुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिग रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले आहेत. ही माती पावसाळ्यात रस्त्यावर येण्याचा धोका आहे. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन वाहने घसरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहने सावकाश चालविणे आवश्यक आहे.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग