शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

आंबवलीत वडिल मुलासह पुतण्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:15 IST

उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण बालंबाल बचावला आहे. जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मयतांची नावे आहेत तर प्रसाद पांचाळ (२०) हा या दुर्घटनेतून बचावला आहे.

ठळक मुद्देआंबवलीत वडिल मुलासह पुतण्याचा बुडून मृत्यूउन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या पांचाळ कुटुंबियांवर काळाचा घाला

देवरूख : उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण बालंबाल बचावला आहे. जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मयतांची नावे आहेत तर प्रसाद पांचाळ (२०) हा या दुर्घटनेतून बचावला आहे.जनार्दन हे मुंबईत वास्तव्याला असतात. ते महापालिकेच्या एका शाळेत शिक्षकाचे काम करतात. त्यांचे मुळ घर आंबवली सुतारवाडी असून दरवर्षी मे महिन्यात काही दिवस सुट्टीनिमित्त येतात. १५ दिवसापूर्वीच हे कुटुंब आंबवलीत वास्तव्याला आले होते. सोमवारी सकाळी जनार्दन हे त्यांची पत्नी, मुलगा आणि दोन पुतण्यांसह चंद्रेश्वर येथे गेले होते. सप्तलिंगी नदीत सुमारे अर्धा तास नदीत डुबक्या मारल्यावर याठिकाणी असलेल्या खोल डोहाचा त्यांना अंदाज आला नाही.

यातच जनार्दन, रोशन, ओंकार आणि प्रसाद पाण्यात ओढले गेले. आपण बुडत आहोत याची कल्पना येताच सर्वांनी आरडाओरड सुरू केली. याच दरम्यान काठावर बसलेल्या कुटुंबियांनी जवळ असलेल्या लाकडी काठ्यांचा आधार देत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र केवळ प्रसादच काठीच्या सहाय्याने काठावर आला.उर्वरित तिघेहीजण पाण्यात बुडाले. काही मिनिटातच याची खबर गावात मिळाल्यावर असंख्य ग्रामस्थ घटनास्थळी जमले. त्यांनी या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. काही तासांनी तिघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात सापडले. पोलिस पाटील अजित गोपाळ मोहिते यांनी याची खबर देवरूख पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक राजेंद्र्र पाटील आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी तिघांचेही मृतदेह संगमेश्वरात नेण्यात आले. संध्याकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी