शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

आंबवलीत वडिल मुलासह पुतण्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:15 IST

उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण बालंबाल बचावला आहे. जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मयतांची नावे आहेत तर प्रसाद पांचाळ (२०) हा या दुर्घटनेतून बचावला आहे.

ठळक मुद्देआंबवलीत वडिल मुलासह पुतण्याचा बुडून मृत्यूउन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या पांचाळ कुटुंबियांवर काळाचा घाला

देवरूख : उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण बालंबाल बचावला आहे. जनार्दन संभाजी पांचाळ (४४), रोशन जनार्दन पांचाळ (१४), ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मयतांची नावे आहेत तर प्रसाद पांचाळ (२०) हा या दुर्घटनेतून बचावला आहे.जनार्दन हे मुंबईत वास्तव्याला असतात. ते महापालिकेच्या एका शाळेत शिक्षकाचे काम करतात. त्यांचे मुळ घर आंबवली सुतारवाडी असून दरवर्षी मे महिन्यात काही दिवस सुट्टीनिमित्त येतात. १५ दिवसापूर्वीच हे कुटुंब आंबवलीत वास्तव्याला आले होते. सोमवारी सकाळी जनार्दन हे त्यांची पत्नी, मुलगा आणि दोन पुतण्यांसह चंद्रेश्वर येथे गेले होते. सप्तलिंगी नदीत सुमारे अर्धा तास नदीत डुबक्या मारल्यावर याठिकाणी असलेल्या खोल डोहाचा त्यांना अंदाज आला नाही.

यातच जनार्दन, रोशन, ओंकार आणि प्रसाद पाण्यात ओढले गेले. आपण बुडत आहोत याची कल्पना येताच सर्वांनी आरडाओरड सुरू केली. याच दरम्यान काठावर बसलेल्या कुटुंबियांनी जवळ असलेल्या लाकडी काठ्यांचा आधार देत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र केवळ प्रसादच काठीच्या सहाय्याने काठावर आला.उर्वरित तिघेहीजण पाण्यात बुडाले. काही मिनिटातच याची खबर गावात मिळाल्यावर असंख्य ग्रामस्थ घटनास्थळी जमले. त्यांनी या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. काही तासांनी तिघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात सापडले. पोलिस पाटील अजित गोपाळ मोहिते यांनी याची खबर देवरूख पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक राजेंद्र्र पाटील आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी तिघांचेही मृतदेह संगमेश्वरात नेण्यात आले. संध्याकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी