शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘आशा अभियाना’मुळे बेपत्ता ५२ जणांना दिसले पुन्हा घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : डोक्यावरचे छत जेव्हा जाते त्यावेळी आयुष्यच बदलून जाते. राग, गैरसमज किंवा कोणतीही घटना ही ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : डोक्यावरचे छत जेव्हा जाते त्यावेळी आयुष्यच बदलून जाते. राग, गैरसमज किंवा कोणतीही घटना ही क्षणिक असते. अनेकदा रागाच्या भरात किंवा काही घटनांमुळे अनेकजण आपल्या घरापासून दुरावतात. अशा दुरावलेल्यांना पुन्हा त्यांच्या घरी परत आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी १ जानेवारीपासून राबवलेल्या ‘आशा अभियान’मुळे अनेकांना आधार मिळाला आहे. सन २००३पासून हरवलेल्या १८८पैकी ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे.

अनेकदा शुल्लक कारणावरुन अनेकजण घर सोडतात किंवा काही दुर्दैवी घटनांमुळे काहींना घरापासून लांब जावे लागते. अशा अनेकांची मग फरपट होते आणि त्यांच्या नातेवाईकांचे आयुष्यच बदलून जाते. अनेकदा अशा घटना पोलीस स्थानकामध्ये बेपत्ता म्हणून नोंदवल्या जातात तर नातेवाईक नशिबावर हवाला ठेवून हरवलेल्या आपल्या माणसांची जन्मभर वाट पाहात राहतात. पोलिसांच्या दृष्टीने त्यांच्या कार्यालयात ती एक केस म्हणून राहते. परंतु, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मात्र यामध्ये विशेष लक्ष घातले.

रत्नागिरी जिल्ह्यात २००३पासून १४९ महिला तर १८ वर्षांखालील ३९ मुले-मुली हरवली होती. त्यांच्या तपासासाठी डॉ. गर्ग यांनी पुढाकार घेत १ जानेवारीपासून ७ दिवसांसाठी ‘आशा अभियान’ला सुरुवात केली होती. प्रत्येक पोलीस स्थानकातील कर्मचारी निवडून बेपत्ता झालेल्या महिला आणि १८ वर्षांखालील मुले-मुलींना शोधण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. हे अभियान केवळ ७ दिवसांपुरतेच मर्यादित न ठेवता, ते अद्यापपर्यंत सुरु ठेवण्यात आले आहे. या अभियानामुळे आतापर्यंत तब्बल ५२ जणांना पुन्हा त्यांच्या घरी जाता आले आहे.

चाैकट

डॉ. माेहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत २००३पासून बेपत्ता झालेल्या ५२ जणांना घरी परत आणण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये बेपत्ता झालेल्या १४९ महिलांपैकी ३४ महिला शोधण्यात पोलिसांना यश आले तर बेपत्ता झालेल्या १८ वर्षांखालील ३९ मुलांपैकी १२ मुली आणि ६ मुलांना घरी आणण्यात यश आले आहे. पोलिसांच्या आशा अभियानामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.