शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

धरणसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात

By admin | Updated: March 30, 2016 23:59 IST

रत्नागिरी एमआयडीसी : अनेक नळपाणी योजनांचे भवितव्य निसर्गाच्या हाती...

 रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरातील सात ग्रामपंचायतींना पूर्णत: आणि नगरपरिषदेला अंशत: पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या पाचपैकी घाटीवळे धरणातील पाणी आटले आहे, तर नादुरुस्तीमुळे असोडे धरणात पाणीसाठा अल्प आहे. उर्वरित तीन धरणात जूनच्या पूर्वार्धापर्यंत पुरेलएवढा साठा असला तरी वाढलेल्या तापमानामुळे हा पाणीसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात सापडल्यास या सर्व ग्रामपंचायतींना टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यापासून रत्नागिरीचा पारा ३६ अंशांच्यावर गेला आहे. पारा उतरत नसल्याने तापमानातील वाढ स्थिर आहे. उन्हामुळे काहिली होत असताना धरणात असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. तापमान असेच वाढत राहिले, तर बाष्पीभवनाच्या संकटात पाणीसाठा सापडेल व टंचाई अधिक भीषण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे मिरजोळे औद्योगिक क्षेत्रासह मिरजोळे गाव, कुवारबाव, नाचणे, कर्ला, शिरगाव, मिऱ्या, शिरगाव या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच रत्नागिरी नगरपरिषदेला दररोज १५०० घनमीटर पाणीपुरवठा होतो. या ७ ग्रामपंचायती एमआयडीसीच्या पाण्यावर पूर्णत: अवलंबूून आहेत. या ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठ्याचा दुसरा पर्याय अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या पाणी साठ्यात कपात झाली की, वितरणात कपात करणे भाग पडते. तशी शक्यता सध्यातरी दिसून येत नाही, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, तापमानातील वाढ अशीच राहिली वा त्यापेक्षा वाढ झाली तर बाष्पीभवनाचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. सन २०१३मध्ये एमआयडीसीच्या धरणांतील पाणीसाठाच मार्चमध्ये संपला होता. त्यामुळे या सातही ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांवर विपरित परिणाम झाला होता. कुवारबावमध्ये तर आठवड्याने नळाला पाणी सोडले जात होते. २०१४मध्येही कुवारबावमध्ये जलवाहिनी फुटल्याने व ती दुरुस्त करण्यात १५ दिवस वाया गेल्याने कुवारबाववासीयांची पाण्यासाठी फरपट झाली होती. २०१५मध्ये तसा त्रास झाला नाही. मात्र, यावर्षी घाटीवळे धरणातील पाणीसाठा संपला आहे. असोडे धरण बऱ्याच काळापासून नादुरुस्त आहे. त्याची डागडुजी केलेली नाही. या धरणाची डागडुजी झाली असती तर त्यात चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला असता, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या धरणात पाणीसाठा अल्प आहे. आंजणारी, निवसर व हरचेरी या तीन कोल्हापूर पध्दतीच्या धरण प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. हा साठा येत्या जून मध्यापर्यंत पुरेल असा एमआयडीसीचा अंदाज आहे. मात्र तापमानातील वाढ कशी राहणार यावर धरणांमधील पाणी साठ्याची पातळी अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी) पाणी अडवण्यासाठी एमआयडीसीने बांधलेले हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे जुने आहेत. अनेक वर्षांपूर्वी ते बांधण्यात आले होते. हरचेरी १९७२, निवसर १९९५, असोडे १९८२, अंजणारी २००१, घाटीवळे १९९२ या साली उभारलेले ्रबंधारे आहेत. त्यांची दुरुस्ती व देखभालही करावी लागते.