शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

धरणसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात

By admin | Updated: March 30, 2016 23:59 IST

रत्नागिरी एमआयडीसी : अनेक नळपाणी योजनांचे भवितव्य निसर्गाच्या हाती...

 रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरातील सात ग्रामपंचायतींना पूर्णत: आणि नगरपरिषदेला अंशत: पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या पाचपैकी घाटीवळे धरणातील पाणी आटले आहे, तर नादुरुस्तीमुळे असोडे धरणात पाणीसाठा अल्प आहे. उर्वरित तीन धरणात जूनच्या पूर्वार्धापर्यंत पुरेलएवढा साठा असला तरी वाढलेल्या तापमानामुळे हा पाणीसाठा बाष्पीभवनाच्या कचाट्यात सापडल्यास या सर्व ग्रामपंचायतींना टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यापासून रत्नागिरीचा पारा ३६ अंशांच्यावर गेला आहे. पारा उतरत नसल्याने तापमानातील वाढ स्थिर आहे. उन्हामुळे काहिली होत असताना धरणात असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. तापमान असेच वाढत राहिले, तर बाष्पीभवनाच्या संकटात पाणीसाठा सापडेल व टंचाई अधिक भीषण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे मिरजोळे औद्योगिक क्षेत्रासह मिरजोळे गाव, कुवारबाव, नाचणे, कर्ला, शिरगाव, मिऱ्या, शिरगाव या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच रत्नागिरी नगरपरिषदेला दररोज १५०० घनमीटर पाणीपुरवठा होतो. या ७ ग्रामपंचायती एमआयडीसीच्या पाण्यावर पूर्णत: अवलंबूून आहेत. या ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठ्याचा दुसरा पर्याय अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या पाणी साठ्यात कपात झाली की, वितरणात कपात करणे भाग पडते. तशी शक्यता सध्यातरी दिसून येत नाही, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, तापमानातील वाढ अशीच राहिली वा त्यापेक्षा वाढ झाली तर बाष्पीभवनाचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. सन २०१३मध्ये एमआयडीसीच्या धरणांतील पाणीसाठाच मार्चमध्ये संपला होता. त्यामुळे या सातही ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांवर विपरित परिणाम झाला होता. कुवारबावमध्ये तर आठवड्याने नळाला पाणी सोडले जात होते. २०१४मध्येही कुवारबावमध्ये जलवाहिनी फुटल्याने व ती दुरुस्त करण्यात १५ दिवस वाया गेल्याने कुवारबाववासीयांची पाण्यासाठी फरपट झाली होती. २०१५मध्ये तसा त्रास झाला नाही. मात्र, यावर्षी घाटीवळे धरणातील पाणीसाठा संपला आहे. असोडे धरण बऱ्याच काळापासून नादुरुस्त आहे. त्याची डागडुजी केलेली नाही. या धरणाची डागडुजी झाली असती तर त्यात चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला असता, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या धरणात पाणीसाठा अल्प आहे. आंजणारी, निवसर व हरचेरी या तीन कोल्हापूर पध्दतीच्या धरण प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. हा साठा येत्या जून मध्यापर्यंत पुरेल असा एमआयडीसीचा अंदाज आहे. मात्र तापमानातील वाढ कशी राहणार यावर धरणांमधील पाणी साठ्याची पातळी अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी) पाणी अडवण्यासाठी एमआयडीसीने बांधलेले हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे जुने आहेत. अनेक वर्षांपूर्वी ते बांधण्यात आले होते. हरचेरी १९७२, निवसर १९९५, असोडे १९८२, अंजणारी २००१, घाटीवळे १९९२ या साली उभारलेले ्रबंधारे आहेत. त्यांची दुरुस्ती व देखभालही करावी लागते.