शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी १३२ वर्षात प्रथमच शासकीय जयंती

By अरुण आडिवरेकर | Updated: April 14, 2023 14:28 IST

आंबडवे येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

अरुण आडिवरेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, मंडणगड: भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती त्यांचे मूळगाव आंबडवे (ता. मंडणगड) येथे शुक्रवारी (१४ एप्रिल) साजरी करण्यात आली. तब्बल १३२ वर्षात प्रथमच त्यांच्या मूळगावी शासकीय जयंती साजरी करण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. प्रथमच शासकीय यंत्रणेमार्फत जयंती साजरी केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबडवे येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लाेटला हाेता. पालकमंत्री उदय सामंत यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी आमदार याेगेश कदम, सुदर्शन सकपाळ, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह समाजबांधव उपस्थित हाेते.

यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आंबडवे गावात शासकीय साजरी हाेत असल्याचा पालकमंत्री म्हणून मला समाधान आहे. आमदार याेगेश कदम आणि मी गतवर्षी याठिकाणी शासकीय जयंती साजरी झाली पाहिजे, असा निर्णय घेतला हाेता. हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव आहे. याठिकाणी शासकीय यंत्रणेने सर्व समारंभ साजरे केले पाहिजेत, असे ठरविले हाेते. त्यात आम्हाला यश आले आहे. पहिल्यांदाच याठिकाणी आपण शासकीय जयंती साजरी करताेय, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

याठिकाणच्या स्मारकाचा प्रश्न आहे. स्मारकाचा आराखडा तयार हाेताेय. सामाजिक न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री यांनी आमदार याेगेश कदम यांच्या पाठपुराव्याने अनेक संकल्प याठिकाणी केले आहेत. याठिकाणी काही जागेचे प्रश्न आहेत. त्याबाबत बैठक लावून तेही आपण साेडविणार आहाेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आज लाेकांपर्यंत पाेहाेचविण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागत ही माेहीमदेखील आपल्याला उघडणे गरजेचे आहे. त्यासाठी सगळ्याच लाेकांचे सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती