शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

ठोस कारणाशिवाय मुंबईतून येऊ नका, जिल्हाधिकारी यांचे चाकरमान्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 14:40 IST

CoronaVIrus Ratnagiri : सध्या रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या या भयावह स्थितीचा विचार करून मुंबईकरांनी कारण नसेल तर गावाला येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक सीमांवर पोलीस बंदोबस्त तैनात वाहनांची कसून तपासणी, पॉझिटिव्ह येणाऱ्यांना गृह अलगीकरण

रत्नागिरी : सध्या रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या या भयावह स्थितीचा विचार करून मुंबईकरांनी कारण नसेल तर गावाला येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर मे महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईकर मोठ्या संख्येने गावी परतल्याने मे महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यानंतर गणपती उत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातही पुन्हा संख्या दुपटीपेक्षाही अधिक झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या कमी झाली.मात्र, मध्यंतरीच्या काळात लोकांनी दाखविलेली बेफिकिरी तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा टाळलेला वापर, सोशल डिस्टन्सिंगचा विसर यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू लागला आहे. त्यात भर पडली ती मार्च महिन्यातील शिमगोत्सवासाठी आलेल्या मुंबइकरांची कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई-पुण्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याने मार्चपासून ही संख्या वाढू लागली आहे.जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्ह्यात येणाऱ्या मुंबईकरांमुळे संसर्ग वेगाने वाढत आहे. भविष्यात ही संख्या सध्याच्या चौपट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी मुंबईहून येणाऱ्यांनी महत्त्वाचे कारण असेल तरच यावे, अन्यथा सध्या येणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मुंबईसह अन्य भागातून येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी प्रत्येक नाक्यावर होणार असून, व्यक्तींचीही तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.तीन हजारचा टप्पा पार१ ते १५ मार्च २६७ रुग्ण तर १६ ते ३१ मार्च या काळात तब्बल ७८८ रुग्ण सापडले. १ ते १५ एप्रिल या कालावधीत रुग्ण संख्येने तब्बल ३ हजारांचा टप्पा ओलांडला असून ही संख्या ३००९ वर पोहोचली आहे. तर या पंधरवड्यात मृत्यूची संख्या ३४ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या ही जिल्ह्यासाठी चिंताजनक असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी