शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ठोस कारणाशिवाय मुंबईतून येऊ नका, जिल्हाधिकारी यांचे चाकरमान्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 14:40 IST

CoronaVIrus Ratnagiri : सध्या रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या या भयावह स्थितीचा विचार करून मुंबईकरांनी कारण नसेल तर गावाला येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक सीमांवर पोलीस बंदोबस्त तैनात वाहनांची कसून तपासणी, पॉझिटिव्ह येणाऱ्यांना गृह अलगीकरण

रत्नागिरी : सध्या रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या या भयावह स्थितीचा विचार करून मुंबईकरांनी कारण नसेल तर गावाला येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर मे महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईकर मोठ्या संख्येने गावी परतल्याने मे महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यानंतर गणपती उत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातही पुन्हा संख्या दुपटीपेक्षाही अधिक झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या कमी झाली.मात्र, मध्यंतरीच्या काळात लोकांनी दाखविलेली बेफिकिरी तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा टाळलेला वापर, सोशल डिस्टन्सिंगचा विसर यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू लागला आहे. त्यात भर पडली ती मार्च महिन्यातील शिमगोत्सवासाठी आलेल्या मुंबइकरांची कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई-पुण्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याने मार्चपासून ही संख्या वाढू लागली आहे.जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्ह्यात येणाऱ्या मुंबईकरांमुळे संसर्ग वेगाने वाढत आहे. भविष्यात ही संख्या सध्याच्या चौपट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी मुंबईहून येणाऱ्यांनी महत्त्वाचे कारण असेल तरच यावे, अन्यथा सध्या येणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मुंबईसह अन्य भागातून येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी प्रत्येक नाक्यावर होणार असून, व्यक्तींचीही तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.तीन हजारचा टप्पा पार१ ते १५ मार्च २६७ रुग्ण तर १६ ते ३१ मार्च या काळात तब्बल ७८८ रुग्ण सापडले. १ ते १५ एप्रिल या कालावधीत रुग्ण संख्येने तब्बल ३ हजारांचा टप्पा ओलांडला असून ही संख्या ३००९ वर पोहोचली आहे. तर या पंधरवड्यात मृत्यूची संख्या ३४ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या ही जिल्ह्यासाठी चिंताजनक असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी