शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

घनकचरा प्रकल्प विनाविलंब करा अन्यथा न्यायालयात जाणार, मनसेचा रत्नागिरी नगरपरिषदेला इशारा

By अरुण आडिवरेकर | Updated: January 20, 2023 19:10 IST

रत्नागिरी : शहरातील प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दांडेआडोम येथे करण्यात येणार आहे. याठिकाणी विनाविलंब घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावावा, ...

रत्नागिरी : शहरातील प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दांडेआडोम येथे करण्यात येणार आहे. याठिकाणी विनाविलंब घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावावा, असे न्यायालयाचे आदेश असतानाही अद्याप हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. हा प्रकल्प मार्गी लावावा अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन २० राेजी मनसेतर्फे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे देण्यात आले आहे.रत्नागिरी शहरातील घनकचरा नगरपरिषदेतर्फे प्रतिदिन २० ते २२ टन इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा करून तो साळवी स्टाॅप येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवला जातो. जिथे कोणत्याही प्रकारचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी तसेच प्रदूषण होत आहे. या घनकचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण ही होण्याची दाट शक्यता आहे.

डम्पिंग ग्राउंडच्याच शेजारी जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे संकलन वाढत चालले असताना रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन या अतिमहत्त्वाच्या विषयावर उदासीन आहे. हा प्रकल्प दांडेआडोम या ठिकाणी विनाविलंब व्हावा, असे सर्वाेच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तरीही नगरपरिषद प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली ही टाळाटाळ करत आहे का, असा प्रश्न मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.हा प्रकल्प दांडेआडोम येथे विनाविलंब व्हावा, अशी आग्रही मागणी मनसेतर्फे रत्नागिरी नगरपरिषदेकडे केली आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी यासंदर्भात एका महिन्याच्या कालावधीत हा प्रकल्प आपण मार्गी लावू, असे आश्वासन दिले आहे. नगरपरिषदेने एक महिन्यात हा प्रकल्प मार्गी न लावल्यास नगरपरिषद न्यायालयाचा अवमान करत आहे, असे समजून मनसे न्यायालयात जाणार असल्याचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी सांगितले.यावेळी राजू पाचकुडे, अॅड. प्रफुल्ल सावंत, जयेश दुधरे, सोम पिलणकर, शैलेश मुकादम, रूपेश चव्हाण, नैनेश कामेरकर, यश पोमेंडकर हे मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMNSमनसे