शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

कोकोबद्दल विद्यापीठाने संशोधन करावे

By admin | Updated: February 20, 2016 00:39 IST

दीपक केसरकर : वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात काजूपिक विकासासंदर्भात राष्ट्रीय परिषद

सिंधुदुर्गनगरी : कोकणात उत्पादन होत असलेले काजू-बोंडू आज वाया जात आहेत. त्यासाठी काजू बोंडांवर प्रक्रिया करुन बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोकणात कोकोचे चांगले उत्पादन होते. त्यामुळे येथील नारळ, सुपारी बागेत आंतरपिक म्हणून कोकोची लागवड करण्याबाबत विद्यापीठाने संशोधन हाती घ्यावे, असे आवाहन वित्तमंंत्री दीपक केसरकर यांंनी राष्ट्रीय काजू परिषदेत बोलताना केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, काजू आणि कोको विकास संचालनालय कोची आणि नाबार्डतर्फे वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या काजूपीक विकासासंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेत वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री केसरकर बोलत होते. परिषदेचे उद्घाटन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर खासदार विनायक राऊत, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, काजू व कोको विकास संचनालय कोचीचे डॉ. पी. एल. सरोज, विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्राचे सहयोगी संचालक डॉ. भरत साळवी, डॉ. व्यंकटेश हुबळीकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नाईक, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, पंचायत समिती सदस्य उमा मठकर, समाधान बांदवलकर, सुनिल मोरजकर, जिल्हा परिषद सदस्य सुकन्या नरसुले, जयप्रकाश चमणकर, सुरेश भोसले, दीपक कुबल, चंद्रकांत गडेकर, सचिन वालावलकर, राजन वालावलकर, विवेकानंद आरोलकर, सुनिल वालावलकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. टी. गुंजाटे, डॉ. यदुकुमार, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काजू परिषदेवर आधारीत विविध संशोधकांनी लिहिलेल्या संशोधनपर लेखांच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. केसरकर बोलताना पुढे म्हणाले, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने काजूच्या विविध जाती विकसीत केल्या. मात्र, काजू बोंडू वाया जात आहे. या बोंडावर सखोल संशोधन होऊन काजू बोंडापासून नविन प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यात यावे जेणेकरुन शेतकऱ्यांना काजू बी बरोबरच अतिरिक्त उत्पादन मिळू शकेल. सिंधुदुर्ग जिल्हा विविधतेने नटलेला आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळून येतात. या औषधी वनस्पतीपासून आयुर्वेदिक औषधी तयार करण्यास भरपूर वाव आहे. काजू पिकाच्याबाबतीत आंतरपिक म्हणून दुसरे पिक घेण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल अहिरे यांनी केले तर आभार वेंंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी मानले. परिषद यशस्वीतेसाठी डॉ. बी. एन. सावंंत, डॉ. आर. सी. गजभिये, प्रा. सी. एम. तल्ला यांनी परिश्रम घेतले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत काजूपीक सुधारणा, काजूपीक व्यवस्थापन, बदलते वातावरण व त्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा अवलंब, काजूपीक मूल्यवर्धनासाठी मूल्यवर्धन साखळी व्यवस्थापन, काजूपीकावरील किड व रोग, हवामानानुसार त्यांचे नियंत्रण आणि काजूपीक विकासाचे सामाजिक व आर्थिक घटक या विषयावर तांत्रिक सत्रे होणार आहेत. (प्रतिनिधी)तपस भट्टाचार्य : काजूची नवीन जात विकसित करण्यासाठी संशोधनकुलगुरु तपस भट्टाचार्य बोलतांना म्हणाले की, व्हिएतनाम हा देश काजू उत्पादनात अग्रेसर आहे. भारतातील काजू उत्पादनात वाढ होण्याकरीता काजू उत्पादक शेतकरी काजू बागेत अवलंंंब करीत असलेले तंत्रज्ञान व सध्या विद्यापिठामार्फत उपलब्ध तंत्रज्ञान यात जेथे कुठे कमतरता असतील त्या शोधून शेतकऱ्यांची गरज ओळखून विद्यापिठामार्फत संशोधन केले जावे. याचबरोबर काजूचे शाश्वत उत्पादन घेण्याच्याबाबतीत विद्यापीठ विचार करीत आहे. काजूच्या घन लागवडीकरीता काजूची नविन जात विकसित करण्याच्या संशोधनावर लक्ष दिले जाणार आहे. काजूच्या बोंडावर सखोल संशोधन करुन त्यापासून शेतकऱ्यांना जास्तीत उत्पन्न मिळवून देण्याचा विद्यापीठ प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले.‘फळ संशोधन’चे कार्य कौतुकास्पद : राऊतखासदार विनायक राऊत म्हणाले की, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कार्य कौतुकास्पद आहे. काजूच्या बाबतीत केंद्राने दिलेले योगदान देशपातळीवरच नव्हे तर विदेशात वाखाणले जात आहे. आज येथे होत असलेल्या राष्ट्रीय काजू परिषदेतील चर्चेअंती शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारीत असे नविन संशोधन उपलब्ध होईल अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली.