शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

कोकोबद्दल विद्यापीठाने संशोधन करावे

By admin | Updated: February 20, 2016 00:39 IST

दीपक केसरकर : वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात काजूपिक विकासासंदर्भात राष्ट्रीय परिषद

सिंधुदुर्गनगरी : कोकणात उत्पादन होत असलेले काजू-बोंडू आज वाया जात आहेत. त्यासाठी काजू बोंडांवर प्रक्रिया करुन बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोकणात कोकोचे चांगले उत्पादन होते. त्यामुळे येथील नारळ, सुपारी बागेत आंतरपिक म्हणून कोकोची लागवड करण्याबाबत विद्यापीठाने संशोधन हाती घ्यावे, असे आवाहन वित्तमंंत्री दीपक केसरकर यांंनी राष्ट्रीय काजू परिषदेत बोलताना केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, काजू आणि कोको विकास संचालनालय कोची आणि नाबार्डतर्फे वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या काजूपीक विकासासंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेत वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री केसरकर बोलत होते. परिषदेचे उद्घाटन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर खासदार विनायक राऊत, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, काजू व कोको विकास संचनालय कोचीचे डॉ. पी. एल. सरोज, विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्राचे सहयोगी संचालक डॉ. भरत साळवी, डॉ. व्यंकटेश हुबळीकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नाईक, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, पंचायत समिती सदस्य उमा मठकर, समाधान बांदवलकर, सुनिल मोरजकर, जिल्हा परिषद सदस्य सुकन्या नरसुले, जयप्रकाश चमणकर, सुरेश भोसले, दीपक कुबल, चंद्रकांत गडेकर, सचिन वालावलकर, राजन वालावलकर, विवेकानंद आरोलकर, सुनिल वालावलकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. टी. गुंजाटे, डॉ. यदुकुमार, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काजू परिषदेवर आधारीत विविध संशोधकांनी लिहिलेल्या संशोधनपर लेखांच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. केसरकर बोलताना पुढे म्हणाले, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने काजूच्या विविध जाती विकसीत केल्या. मात्र, काजू बोंडू वाया जात आहे. या बोंडावर सखोल संशोधन होऊन काजू बोंडापासून नविन प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यात यावे जेणेकरुन शेतकऱ्यांना काजू बी बरोबरच अतिरिक्त उत्पादन मिळू शकेल. सिंधुदुर्ग जिल्हा विविधतेने नटलेला आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळून येतात. या औषधी वनस्पतीपासून आयुर्वेदिक औषधी तयार करण्यास भरपूर वाव आहे. काजू पिकाच्याबाबतीत आंतरपिक म्हणून दुसरे पिक घेण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल अहिरे यांनी केले तर आभार वेंंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी मानले. परिषद यशस्वीतेसाठी डॉ. बी. एन. सावंंत, डॉ. आर. सी. गजभिये, प्रा. सी. एम. तल्ला यांनी परिश्रम घेतले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत काजूपीक सुधारणा, काजूपीक व्यवस्थापन, बदलते वातावरण व त्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा अवलंब, काजूपीक मूल्यवर्धनासाठी मूल्यवर्धन साखळी व्यवस्थापन, काजूपीकावरील किड व रोग, हवामानानुसार त्यांचे नियंत्रण आणि काजूपीक विकासाचे सामाजिक व आर्थिक घटक या विषयावर तांत्रिक सत्रे होणार आहेत. (प्रतिनिधी)तपस भट्टाचार्य : काजूची नवीन जात विकसित करण्यासाठी संशोधनकुलगुरु तपस भट्टाचार्य बोलतांना म्हणाले की, व्हिएतनाम हा देश काजू उत्पादनात अग्रेसर आहे. भारतातील काजू उत्पादनात वाढ होण्याकरीता काजू उत्पादक शेतकरी काजू बागेत अवलंंंब करीत असलेले तंत्रज्ञान व सध्या विद्यापिठामार्फत उपलब्ध तंत्रज्ञान यात जेथे कुठे कमतरता असतील त्या शोधून शेतकऱ्यांची गरज ओळखून विद्यापिठामार्फत संशोधन केले जावे. याचबरोबर काजूचे शाश्वत उत्पादन घेण्याच्याबाबतीत विद्यापीठ विचार करीत आहे. काजूच्या घन लागवडीकरीता काजूची नविन जात विकसित करण्याच्या संशोधनावर लक्ष दिले जाणार आहे. काजूच्या बोंडावर सखोल संशोधन करुन त्यापासून शेतकऱ्यांना जास्तीत उत्पन्न मिळवून देण्याचा विद्यापीठ प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले.‘फळ संशोधन’चे कार्य कौतुकास्पद : राऊतखासदार विनायक राऊत म्हणाले की, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कार्य कौतुकास्पद आहे. काजूच्या बाबतीत केंद्राने दिलेले योगदान देशपातळीवरच नव्हे तर विदेशात वाखाणले जात आहे. आज येथे होत असलेल्या राष्ट्रीय काजू परिषदेतील चर्चेअंती शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारीत असे नविन संशोधन उपलब्ध होईल अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली.