शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

कोकोबद्दल विद्यापीठाने संशोधन करावे

By admin | Updated: February 20, 2016 00:39 IST

दीपक केसरकर : वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात काजूपिक विकासासंदर्भात राष्ट्रीय परिषद

सिंधुदुर्गनगरी : कोकणात उत्पादन होत असलेले काजू-बोंडू आज वाया जात आहेत. त्यासाठी काजू बोंडांवर प्रक्रिया करुन बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोकणात कोकोचे चांगले उत्पादन होते. त्यामुळे येथील नारळ, सुपारी बागेत आंतरपिक म्हणून कोकोची लागवड करण्याबाबत विद्यापीठाने संशोधन हाती घ्यावे, असे आवाहन वित्तमंंत्री दीपक केसरकर यांंनी राष्ट्रीय काजू परिषदेत बोलताना केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, काजू आणि कोको विकास संचालनालय कोची आणि नाबार्डतर्फे वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या काजूपीक विकासासंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेत वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री केसरकर बोलत होते. परिषदेचे उद्घाटन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर खासदार विनायक राऊत, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, काजू व कोको विकास संचनालय कोचीचे डॉ. पी. एल. सरोज, विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्राचे सहयोगी संचालक डॉ. भरत साळवी, डॉ. व्यंकटेश हुबळीकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नाईक, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, पंचायत समिती सदस्य उमा मठकर, समाधान बांदवलकर, सुनिल मोरजकर, जिल्हा परिषद सदस्य सुकन्या नरसुले, जयप्रकाश चमणकर, सुरेश भोसले, दीपक कुबल, चंद्रकांत गडेकर, सचिन वालावलकर, राजन वालावलकर, विवेकानंद आरोलकर, सुनिल वालावलकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. टी. गुंजाटे, डॉ. यदुकुमार, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काजू परिषदेवर आधारीत विविध संशोधकांनी लिहिलेल्या संशोधनपर लेखांच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. केसरकर बोलताना पुढे म्हणाले, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने काजूच्या विविध जाती विकसीत केल्या. मात्र, काजू बोंडू वाया जात आहे. या बोंडावर सखोल संशोधन होऊन काजू बोंडापासून नविन प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यात यावे जेणेकरुन शेतकऱ्यांना काजू बी बरोबरच अतिरिक्त उत्पादन मिळू शकेल. सिंधुदुर्ग जिल्हा विविधतेने नटलेला आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळून येतात. या औषधी वनस्पतीपासून आयुर्वेदिक औषधी तयार करण्यास भरपूर वाव आहे. काजू पिकाच्याबाबतीत आंतरपिक म्हणून दुसरे पिक घेण्याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल अहिरे यांनी केले तर आभार वेंंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी मानले. परिषद यशस्वीतेसाठी डॉ. बी. एन. सावंंत, डॉ. आर. सी. गजभिये, प्रा. सी. एम. तल्ला यांनी परिश्रम घेतले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत काजूपीक सुधारणा, काजूपीक व्यवस्थापन, बदलते वातावरण व त्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा अवलंब, काजूपीक मूल्यवर्धनासाठी मूल्यवर्धन साखळी व्यवस्थापन, काजूपीकावरील किड व रोग, हवामानानुसार त्यांचे नियंत्रण आणि काजूपीक विकासाचे सामाजिक व आर्थिक घटक या विषयावर तांत्रिक सत्रे होणार आहेत. (प्रतिनिधी)तपस भट्टाचार्य : काजूची नवीन जात विकसित करण्यासाठी संशोधनकुलगुरु तपस भट्टाचार्य बोलतांना म्हणाले की, व्हिएतनाम हा देश काजू उत्पादनात अग्रेसर आहे. भारतातील काजू उत्पादनात वाढ होण्याकरीता काजू उत्पादक शेतकरी काजू बागेत अवलंंंब करीत असलेले तंत्रज्ञान व सध्या विद्यापिठामार्फत उपलब्ध तंत्रज्ञान यात जेथे कुठे कमतरता असतील त्या शोधून शेतकऱ्यांची गरज ओळखून विद्यापिठामार्फत संशोधन केले जावे. याचबरोबर काजूचे शाश्वत उत्पादन घेण्याच्याबाबतीत विद्यापीठ विचार करीत आहे. काजूच्या घन लागवडीकरीता काजूची नविन जात विकसित करण्याच्या संशोधनावर लक्ष दिले जाणार आहे. काजूच्या बोंडावर सखोल संशोधन करुन त्यापासून शेतकऱ्यांना जास्तीत उत्पन्न मिळवून देण्याचा विद्यापीठ प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले.‘फळ संशोधन’चे कार्य कौतुकास्पद : राऊतखासदार विनायक राऊत म्हणाले की, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कार्य कौतुकास्पद आहे. काजूच्या बाबतीत केंद्राने दिलेले योगदान देशपातळीवरच नव्हे तर विदेशात वाखाणले जात आहे. आज येथे होत असलेल्या राष्ट्रीय काजू परिषदेतील चर्चेअंती शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारीत असे नविन संशोधन उपलब्ध होईल अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली.