शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारी संचालकांना संधी देऊ नये

By admin | Updated: April 4, 2015 00:11 IST

रमेश कदम : दोन दिवसांत सीआयडीकडे तक्रार देणार

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना नोकरी देणाऱ्या भ्रष्टाचारी संचालकांना उमेदवारी देऊ नये, याप्रकरणी येत्या दोन दिवसांत आपण सीआयडीकडे तक्रार अर्ज देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांनी दिली. जिल्हा बँकेवर निशाणा साधण्यासाठी माजी आमदार कदम यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा बँकेत झालेल्या नोकरभरती प्रकरणावर त्यांनी कडाडून प्रहार केला. या नोकरभरतीची चीरफाड करताना भ्रष्टाचार कसा झाला, हे त्यांनी सविस्तर सांगितले. रमेश कदम म्हणाले की, जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्याची बँक आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी व त्याच्या मुलाबाळांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याची स्थापना झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला नवी ऊर्जा मिळावी, त्याची उमेद वाढावी व त्याला आधार मिळावा, यासाठी ही बँक आहे. परंतु, या बँकेत सर्वसामान्य गरीब माणसाच्या हिताचा अजिबात विचार केला जात नाही. जिल्हा बँकेत नोकरभरती करताना संचालकांनी आपल्या मर्जीतील लोकांना व नातेवाईकांना संधी दिली, असा आरोपही कदम यांनी यावेळी बोलताना केला.काहींनी २०-२० लाख रुपये घेऊन नोकरभरती केली. आम्ही सूचवलेल्या गरीब पात्र उमेदवारांचा विचारही झाला नाही. असे पैसे घेऊन नोकरभरती करणाऱ्या संचालकांना मतदारांनी पैसे घेतल्याशिवाय मत देऊ नये किंवा चार शब्द खडसावून सुनावून मतदान करावे. भरतीसाठी उमेदवारांकडून घेतलेले पैसे मतदारांना द्यावेत. कारण पैसे घेऊन भरती करणे हा सभासदांचा अपमान आहे, असेही कदम यांनी सांगितले. सभासदांच्या जीवावर निवडून येणारे संचालक पैसे घेऊन भरती करतात हे अयोग्य आहे. हे घेतलेले पैसे संबंधित संचालकांनी नातेवाईकांना परत द्यावेत किंवा मतदारांना द्यावेत. याप्रकरणी सीआयडी चौकशी व्हावी, असेही माजी आमदार कदम यावेळी म्हणाले. आपल्याला निवडणुकीत कोणी स्पर्धक नको किंवा कोणाची अडचण होवू नये, यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना लाखो रुपयांचे कर्ज देऊन ती थकवण्यात आली आहेत. त्यामुळे मार्गातला अडसर आपोआप दूर झाला आहे. जिल्हा बँक हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. येथे वर्षानुवर्षे हा भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी उमेदवारांना उमेदवारी देऊ नये. येथे चांगले उमेदवार निवडून द्यावेत व सहकारात चांगली माणसे यावीत, अशी आपली धारणा आहे, असे ते म्हणाले.जो संचालक भ्रष्टाचार केला नाही असे म्हणत असतील त्यानी आपण मानत असलेल्या देवासमोर नारळ ठेवून तसे स्पष्ट करावे. बँकेकडून सामान्य माणसाच्या अपेक्षा आहेत. परंतु, त्या पूर्ण होत नाहीत. शेतकऱ्यांना योग्य सहकार्य मिळत नाही म्हणून शेतकरी इतर राष्ट्रीय बँकेकडे कर्जासाठी वळले आहेत. बँकेत चांगले उमेदवार निवडून जावेत, असे पत्र चेअरमन तानाजी चोरगे यांनी सभासदांना दिले आहे. त्यामुळे ते पैसे खाणाऱ्या उमेदवारांना संधी देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असे रमेश कदम यावेळी बोलताना म्हणाले. (प्रतिनिधी)जिल्हा बँक आपल्या पक्षाच्या ताब्यात आहे. आपण त्याकडे लक्ष देणार का, यावर ते म्हणाले, मी सहकारात काम करीत नाही. ते माझे क्षेत्र नाही. बँक कोणत्या पक्षाची आहे हे महत्त्वाचे नाही, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांच्या जीवावर ही बँक उभी आहे ती माणसं जगली पाहिजेत. गरीब ग्राहकांना चांगला आधार मिळाला पाहिजे आणि त्यांच्यात जागृती झाली पाहिजे, यासाठी माझा हा लढा आहे, असे कदम यांनी सांगितले.