शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाला जीर्ण इमारतींचा अडसर

By admin | Updated: December 4, 2014 23:49 IST

इमारती धोकादायक : दिवसेंदिवस देखभाल-दुरूस्तीही जातेय आवाक्याबाहेर

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या जीर्ण इमारतींचा अडसर होत असून, या कार्यालयाचा प्रथमदर्शनी भाग झाकोळला जात आहे. त्याचबरोबर या इमारतींचा दुरूस्ती खर्चही दिवसेंदिवस प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालयासह या आवारात असलेल्या बहुतांश इमारती या ब्रिटिश काळात उभारलेल्या आहेत. उपविभागीय कार्यालय (प्रांत कार्यालय) तसेच तहसील कार्यालय तर १८२५ रोजी बांधले गेले असल्याची नोंद शासन दरबारी आढळते. सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची उभारणी ही १९८७ साली झालेली आहे. दि. १५ मे १९८७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झालेले आहे. मात्र, या आवारातील प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय यांच्याबरोबरच तलाठी सजा (झाडगाव, रहाटाघर), मंडल अधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी, सह दुय्यम निबंधक कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय या कार्यालयांचे बांधकाम एकाच कालावधीत झाले आहे. त्यामुळे या इमारती अधिकच मोडकळीस आल्या आहेत. त्यातल्या त्यात प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयाची काही वर्षांपूर्वी डागडुजी झालेली असली तरी या इमारतींमुळे सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रथमदर्शनी भाग झाकोळला जात आहे.दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे यापैकी काही इमारती अधिकच जीर्ण झाल्याने धोकादायक झाल्या आहेत. त्या कधीही कोसळण्याचा धोका संभवतो. त्यांच्या दुरूस्तीचा खर्चही प्रशासनाच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे या इमारती दुरूस्ती करण्यापेक्षा नवीन इमारती बांधणे आर्थिकदृष्ट्या प्रशासनाला परवडणारे आहे. सध्या ई कार्यालये करण्यासाठी प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे या जुन्या इमारतींमध्ये आधुनिक यंत्रणा बसविण्यात अडचणी येणार आहेत. त्यातच या इमारती लागून असल्याने तसेच कशाही उभ्या असल्याने त्यांची दाटी अधिक वाटते. त्यामुळे या आवारात वाहने अथवा नागरिक समुहाने आले तर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या जुन्या इमारतींची दरवर्षी डागडुजी करण्यापेक्षा पाडून योग्य ठिकाणी त्या इमारती उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.याबाबतही जिल्हाधिकारी प्रशासनाकडून विचार केला जात असल्याचे विश्वसनीयरित्या सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)