शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

शिवभोजन थाळ्यांवर जिल्हा प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 14:36 IST

shiv bhojnalaya, ratnagirinews शिवभोजन थाळ्या अधिक झाल्याचे दाखविण्यासाठी लाभार्थ्यांच्या फोटोंमध्ये करण्यात येत असलेल्या गोंधळाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने आता जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवर जिल्हा प्रशासनाची सक्त नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशिवभोजन थाळ्यांवर जिल्हा प्रशासनाची नजरजिल्ह्यातील २२ केंद्रांमध्ये २६५० थाळ्यांची क्षमता

रत्नागिरी : शिवभोजन थाळ्या अधिक झाल्याचे दाखविण्यासाठी लाभार्थ्यांच्या फोटोंमध्ये करण्यात येत असलेल्या गोंधळाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने आता जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवर जिल्हा प्रशासनाची सक्त नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.राज्य सरकारने महाराष्ट्रात शिवभोजन केंद्राद्वारे सामान्य व्यक्तींना १० रूपयांत पूर्ण जेवण मिळावे, या उद्देशाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. कोरोना काळात ही थाळी ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात हातातील काम थांबलेल्या कामगारांसह अन्य आर्थिक दुर्बल घटकांना या शिवभोजन थाळीचा आधार मिळत आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत या थाळीचा दर ५ रुपये एवढाच ठेवण्यात आला आहे.मात्र, राज्यात अनेक भागात जादा थाळ्या दाखवून त्यातून काहींनी नफा काढल्याचे निदर्शनास आले आहे. शिवभोजन घेणाऱ्याच्या अपलोड केलेल्या फोटोवरून दरदिवशी थाळ्यांच्या विक्रीची संख्या समजते. मात्र, काही केंद्रांवर एकाच व्यक्तीचे, त्याच पोषाखातील एकाच दिवसाचे फोटो अनेक वेळा अपलोड केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही केंद्रांत कमी झालेल्या थाळ्यांची संख्या वाढवून दाखवून त्यातून नफा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे.त्यामुळे सर्व जिल्ह्यांना सर्व शिवभोजन केंद्रांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २२ शिवभोजन केंद्रांमधील थाळ्यांच्या संख्येवर आता बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यातील या २२ केंद्रांमध्ये २६५० थाळ्यांची क्षमता आहे. जिल्ह्याला ३ हजार थाळ्यांचे उद्दिष्ट आहे. अजूनही काही ठिकाणे प्रस्तावित असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयRatnagiriरत्नागिरी