शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळ्यांवर जिल्हा प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 14:36 IST

shiv bhojnalaya, ratnagirinews शिवभोजन थाळ्या अधिक झाल्याचे दाखविण्यासाठी लाभार्थ्यांच्या फोटोंमध्ये करण्यात येत असलेल्या गोंधळाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने आता जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवर जिल्हा प्रशासनाची सक्त नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशिवभोजन थाळ्यांवर जिल्हा प्रशासनाची नजरजिल्ह्यातील २२ केंद्रांमध्ये २६५० थाळ्यांची क्षमता

रत्नागिरी : शिवभोजन थाळ्या अधिक झाल्याचे दाखविण्यासाठी लाभार्थ्यांच्या फोटोंमध्ये करण्यात येत असलेल्या गोंधळाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने आता जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवर जिल्हा प्रशासनाची सक्त नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.राज्य सरकारने महाराष्ट्रात शिवभोजन केंद्राद्वारे सामान्य व्यक्तींना १० रूपयांत पूर्ण जेवण मिळावे, या उद्देशाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. कोरोना काळात ही थाळी ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात हातातील काम थांबलेल्या कामगारांसह अन्य आर्थिक दुर्बल घटकांना या शिवभोजन थाळीचा आधार मिळत आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत या थाळीचा दर ५ रुपये एवढाच ठेवण्यात आला आहे.मात्र, राज्यात अनेक भागात जादा थाळ्या दाखवून त्यातून काहींनी नफा काढल्याचे निदर्शनास आले आहे. शिवभोजन घेणाऱ्याच्या अपलोड केलेल्या फोटोवरून दरदिवशी थाळ्यांच्या विक्रीची संख्या समजते. मात्र, काही केंद्रांवर एकाच व्यक्तीचे, त्याच पोषाखातील एकाच दिवसाचे फोटो अनेक वेळा अपलोड केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही केंद्रांत कमी झालेल्या थाळ्यांची संख्या वाढवून दाखवून त्यातून नफा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे.त्यामुळे सर्व जिल्ह्यांना सर्व शिवभोजन केंद्रांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २२ शिवभोजन केंद्रांमधील थाळ्यांच्या संख्येवर आता बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यातील या २२ केंद्रांमध्ये २६५० थाळ्यांची क्षमता आहे. जिल्ह्याला ३ हजार थाळ्यांचे उद्दिष्ट आहे. अजूनही काही ठिकाणे प्रस्तावित असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयRatnagiriरत्नागिरी