शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

जिल्हा प्रशासनाने लसींचा साठा जाहीर करावा : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी जिल्ह्याला नेमक्या किती लसी प्राप्त झाल्या, किती साठा उपलब्ध आहे, हे जाहीर करायला ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी जिल्ह्याला नेमक्या किती लसी प्राप्त झाल्या, किती साठा उपलब्ध आहे, हे जाहीर करायला हवे. लसीकरणाबाबत प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने काम करावे, जेणेकरून लोकांचे जीव धोक्यात न टाकता होत असलेली गैरसोय टाळता येईल, अशी स्पष्ट मागणी माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाने विळखा घातला असतानाच लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मिस्त्री हायस्कूलमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावेळी झालेली चेंगराचेंगरी आणि जिल्हा प्रशासनाचे कुचकामी ठरलेले नियोजन समोर आल्यानंतर नीलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.

जिल्हा प्रशासनाने या सर्व मोहिमेत जर पारदर्शकता ठेवली असती तर लोकांचे जीव धोक्यात आले नसते, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी दिलेली लिंक उघडताक्षणी नोंदणी पूर्ण झाल्याचे दिसते. लसी उपलब्ध असतील तर मग सलग लसीकरण का घेतले जात नाही? त्यामुळे यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय बळावतो आहे. याबाबत असंख्य नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अशावेळी जिल्हा प्रशासनाने पारदर्शकता ठेवून रत्नागिरी जिल्ह्यासाठी कोणत्या प्रकारच्या किती लसी शासनाकडून प्राप्त झाल्या. तालुक्यांमध्ये किती वाटप करण्यात आले, किती साठा उपलब्ध आहे, तसेच किती नागरिकांना लसी देण्यात आल्या, याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.