शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्ण सज्जता : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

रत्नागिरी : काही तासांवर आलेल्या ताउते संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ...

रत्नागिरी : काही तासांवर आलेल्या ताउते संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज रहाण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आयाेजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि राजापूर तालुक्यांमधील किनाऱ्यालगत असलेल्या २७६ गावांना अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाला जेमतेम वर्षही पूर्ण झाले नाही. तोपर्यंत आता तोक्ते चक्रीवादळाचे संकट कोकणावर आले आहे. निसर्ग वादळाच्या वेळच्या परिस्थितीचा अनुभव असल्याने जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि राजापूर या तालुक्यांना या वादळाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वादळाची तीव्रता वाढल्यास अत्यावश्यक परिस्थितीत कच्च्या घरात रहाणाऱ्या नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद दल (एन. डी. आर. ए.) पथकाशी जिल्हा प्रशासनाचा सतत संपर्क सुरू आहे. सध्या हे पथक गोवा आणि पुणे येथे आहे. आपत्ती उद्भवल्यास त्यांना तातडीने पाचारण करता येईल. आपत्तीवेळी दळणवळण थांबले, मार्ग बंद झाले तर अशावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी कटर, जेसीबी आदी अत्यावश्यक यंत्रसामग्री तयार ठेवण्याच्या सूचना तहसीलदार तसेच त्यांच्या सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता हे चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. मध्यरात्री राजापूर तसेच पहाटेच्या सुमारास रत्नागिरीच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या वादळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, नागरिकांनीही हे संकट लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी, असे आवाहनही

मंत्री सामंत यांनी यावेळी केले.

चार तालुक्यांतील २७६ गावांना फटका

समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागर या चार तालुक्यांमधील किनारी भागात वसलेल्या गावांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या तालुक्यांमधील किनाऱ्यांलगत ० ते ५ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या रत्नागिरीतील १०४, दापोलीतील ६८, गुहागरमधील ५१ आणि राजापूर तालुक्यातील ५३ गावांना तडाखा बसणार असल्याने येथील यंत्रणांना अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कडक निर्बंधांबाबत चर्चा करणार

जिल्ह्यात कडक निर्बंधांबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत लाॅकडाऊन आहे तसाच सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अद्याप काही निर्णय नाही. ग्रामीण भागात कोरोना जास्त पसरला असला तरी तिथे कडक लाॅकडाऊन करणे उपयोगी नाही. या सर्व बाजूने विचार करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सामंत म्हणाले.

एमआयडीसी बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही

एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी स्वत:ची कोरोना केअर सेंटर उभारली आहेत. त्यांच्या खर्चाने कोरोना चाचण्याही हाेत आहेत. त्यामुळे सध्या तरी एमआयडीसी बंद करण्याची गरज वाटत नाही.

लोकवस्तीत उभारलेल्या कोविड रुग्णालयाबाबत कारवाई

शहरातील साळवी स्टाॅप येथे लोकवस्तीत सुरू केलेल्या कोविड रुग्णालयाबाबतची तक्रार आपल्याकडे एका नगरसेविकेने केली आहे. चक्रीवादळाचे संकट गेल्यावर याप्रकरणीही दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.