शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्ण सज्जता : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

रत्नागिरी : काही तासांवर आलेल्या ताउते संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ...

रत्नागिरी : काही तासांवर आलेल्या ताउते संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज रहाण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आयाेजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि राजापूर तालुक्यांमधील किनाऱ्यालगत असलेल्या २७६ गावांना अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाला जेमतेम वर्षही पूर्ण झाले नाही. तोपर्यंत आता तोक्ते चक्रीवादळाचे संकट कोकणावर आले आहे. निसर्ग वादळाच्या वेळच्या परिस्थितीचा अनुभव असल्याने जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि राजापूर या तालुक्यांना या वादळाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वादळाची तीव्रता वाढल्यास अत्यावश्यक परिस्थितीत कच्च्या घरात रहाणाऱ्या नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद दल (एन. डी. आर. ए.) पथकाशी जिल्हा प्रशासनाचा सतत संपर्क सुरू आहे. सध्या हे पथक गोवा आणि पुणे येथे आहे. आपत्ती उद्भवल्यास त्यांना तातडीने पाचारण करता येईल. आपत्तीवेळी दळणवळण थांबले, मार्ग बंद झाले तर अशावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी कटर, जेसीबी आदी अत्यावश्यक यंत्रसामग्री तयार ठेवण्याच्या सूचना तहसीलदार तसेच त्यांच्या सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता हे चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. मध्यरात्री राजापूर तसेच पहाटेच्या सुमारास रत्नागिरीच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या वादळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, नागरिकांनीही हे संकट लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी, असे आवाहनही

मंत्री सामंत यांनी यावेळी केले.

चार तालुक्यांतील २७६ गावांना फटका

समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागर या चार तालुक्यांमधील किनारी भागात वसलेल्या गावांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या तालुक्यांमधील किनाऱ्यांलगत ० ते ५ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या रत्नागिरीतील १०४, दापोलीतील ६८, गुहागरमधील ५१ आणि राजापूर तालुक्यातील ५३ गावांना तडाखा बसणार असल्याने येथील यंत्रणांना अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कडक निर्बंधांबाबत चर्चा करणार

जिल्ह्यात कडक निर्बंधांबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत लाॅकडाऊन आहे तसाच सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अद्याप काही निर्णय नाही. ग्रामीण भागात कोरोना जास्त पसरला असला तरी तिथे कडक लाॅकडाऊन करणे उपयोगी नाही. या सर्व बाजूने विचार करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सामंत म्हणाले.

एमआयडीसी बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही

एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी स्वत:ची कोरोना केअर सेंटर उभारली आहेत. त्यांच्या खर्चाने कोरोना चाचण्याही हाेत आहेत. त्यामुळे सध्या तरी एमआयडीसी बंद करण्याची गरज वाटत नाही.

लोकवस्तीत उभारलेल्या कोविड रुग्णालयाबाबत कारवाई

शहरातील साळवी स्टाॅप येथे लोकवस्तीत सुरू केलेल्या कोविड रुग्णालयाबाबतची तक्रार आपल्याकडे एका नगरसेविकेने केली आहे. चक्रीवादळाचे संकट गेल्यावर याप्रकरणीही दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.