शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्ण सज्जता : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

रत्नागिरी : काही तासांवर आलेल्या ताउते संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ...

रत्नागिरी : काही तासांवर आलेल्या ताउते संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज रहाण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आयाेजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि राजापूर तालुक्यांमधील किनाऱ्यालगत असलेल्या २७६ गावांना अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाला जेमतेम वर्षही पूर्ण झाले नाही. तोपर्यंत आता तोक्ते चक्रीवादळाचे संकट कोकणावर आले आहे. निसर्ग वादळाच्या वेळच्या परिस्थितीचा अनुभव असल्याने जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि राजापूर या तालुक्यांना या वादळाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वादळाची तीव्रता वाढल्यास अत्यावश्यक परिस्थितीत कच्च्या घरात रहाणाऱ्या नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद दल (एन. डी. आर. ए.) पथकाशी जिल्हा प्रशासनाचा सतत संपर्क सुरू आहे. सध्या हे पथक गोवा आणि पुणे येथे आहे. आपत्ती उद्भवल्यास त्यांना तातडीने पाचारण करता येईल. आपत्तीवेळी दळणवळण थांबले, मार्ग बंद झाले तर अशावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी कटर, जेसीबी आदी अत्यावश्यक यंत्रसामग्री तयार ठेवण्याच्या सूचना तहसीलदार तसेच त्यांच्या सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता हे चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. मध्यरात्री राजापूर तसेच पहाटेच्या सुमारास रत्नागिरीच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या वादळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, नागरिकांनीही हे संकट लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी, असे आवाहनही

मंत्री सामंत यांनी यावेळी केले.

चार तालुक्यांतील २७६ गावांना फटका

समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागर या चार तालुक्यांमधील किनारी भागात वसलेल्या गावांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या तालुक्यांमधील किनाऱ्यांलगत ० ते ५ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या रत्नागिरीतील १०४, दापोलीतील ६८, गुहागरमधील ५१ आणि राजापूर तालुक्यातील ५३ गावांना तडाखा बसणार असल्याने येथील यंत्रणांना अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कडक निर्बंधांबाबत चर्चा करणार

जिल्ह्यात कडक निर्बंधांबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत लाॅकडाऊन आहे तसाच सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अद्याप काही निर्णय नाही. ग्रामीण भागात कोरोना जास्त पसरला असला तरी तिथे कडक लाॅकडाऊन करणे उपयोगी नाही. या सर्व बाजूने विचार करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सामंत म्हणाले.

एमआयडीसी बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही

एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी स्वत:ची कोरोना केअर सेंटर उभारली आहेत. त्यांच्या खर्चाने कोरोना चाचण्याही हाेत आहेत. त्यामुळे सध्या तरी एमआयडीसी बंद करण्याची गरज वाटत नाही.

लोकवस्तीत उभारलेल्या कोविड रुग्णालयाबाबत कारवाई

शहरातील साळवी स्टाॅप येथे लोकवस्तीत सुरू केलेल्या कोविड रुग्णालयाबाबतची तक्रार आपल्याकडे एका नगरसेविकेने केली आहे. चक्रीवादळाचे संकट गेल्यावर याप्रकरणीही दखल घेऊन कारवाई केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.