शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीकर जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन पाळणार का? एकजुटीने कर्तव्य बजावतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:25 IST

रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे फेसबुक लाईव्हनागरिकांच्या प्रश्नांना दिली उत्तर-- शिथिलतेचा गैरफायदा घेऊ नकाकोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन

रत्नागिरी : शिथिलतेचा अतिरेक किंवा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये. शिथिलतेमुळे काही अडचणी निर्माण झाल्यास ही शिथिलता बंद होऊ शकते. सोशल डिस्टन्सिंगचे किमान बंधन प्रत्येकाने पाळले पाहिजे. ऑरेंज झोनमधून रेडझोनमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, कोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांनी केले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात विविध कारणांमुळे अडकलेल्या लोकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्हा बाहेरील लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे उपस्थित होते. तब्बल २ हजार लोकांनी जिल्हा प्रशासनाचे फेसबुक लाईव्ह पाहिले. ८० लोकांनी पेज शेअर केले असून, ३५० लोकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले.यावेळी त्यांनी सांगितले की, बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत करा. रेडझोनमधून येऊ शकतो का? या प्रश्नावर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी रेडझोनमधून कोणीही येऊ शकणार नसल्याचे सांगितले. कंटेनमेंट झोनच्या बाहेर असाल तर जवळच्या पोलीस स्थानकाकडे अर्ज करावा. त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन परवानगी देण्याबाबत विचार होईल, असे सांगितले.कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली असेल किंवा हॉटस्पॉटमध्ये व्यक्ती जाऊन आलेली असेल अशा लोकांना क्वॉरंटाईन होणे आवश्यक आहे, अशी माहिती कान्हुराज बघाटे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडूच नयेत, असे स्पष्ट संकेत शासनाचे आहेत. त्यांना जास्त धोका आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये, असे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र राहता कामा नयेत. योग्यत्या सर्वप्रकारच्या काळजी घेऊन सर्व आस्थापनांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचे पालन करावे, असे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले.ज्या लोकांना बाहेरून रत्नागिरीत यायचे असेल तर पास घेणे अनिवार्य आहे. प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन वर्गीकरण करेल त्यानुसार नियोजन केले जाईल. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू, असेही सांगण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी