शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
Delhi Blast : "आम्ही गेट उघडला आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
4
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
5
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
8
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
9
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
10
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
11
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
12
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
13
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
14
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
15
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
16
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
17
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
18
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
19
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
20
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

रत्नागिरीकर जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन पाळणार का? एकजुटीने कर्तव्य बजावतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:25 IST

रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे फेसबुक लाईव्हनागरिकांच्या प्रश्नांना दिली उत्तर-- शिथिलतेचा गैरफायदा घेऊ नकाकोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन

रत्नागिरी : शिथिलतेचा अतिरेक किंवा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये. शिथिलतेमुळे काही अडचणी निर्माण झाल्यास ही शिथिलता बंद होऊ शकते. सोशल डिस्टन्सिंगचे किमान बंधन प्रत्येकाने पाळले पाहिजे. ऑरेंज झोनमधून रेडझोनमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, कोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांनी केले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात विविध कारणांमुळे अडकलेल्या लोकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्हा बाहेरील लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे उपस्थित होते. तब्बल २ हजार लोकांनी जिल्हा प्रशासनाचे फेसबुक लाईव्ह पाहिले. ८० लोकांनी पेज शेअर केले असून, ३५० लोकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले.यावेळी त्यांनी सांगितले की, बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत करा. रेडझोनमधून येऊ शकतो का? या प्रश्नावर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी रेडझोनमधून कोणीही येऊ शकणार नसल्याचे सांगितले. कंटेनमेंट झोनच्या बाहेर असाल तर जवळच्या पोलीस स्थानकाकडे अर्ज करावा. त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन परवानगी देण्याबाबत विचार होईल, असे सांगितले.कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली असेल किंवा हॉटस्पॉटमध्ये व्यक्ती जाऊन आलेली असेल अशा लोकांना क्वॉरंटाईन होणे आवश्यक आहे, अशी माहिती कान्हुराज बघाटे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडूच नयेत, असे स्पष्ट संकेत शासनाचे आहेत. त्यांना जास्त धोका आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये, असे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र राहता कामा नयेत. योग्यत्या सर्वप्रकारच्या काळजी घेऊन सर्व आस्थापनांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचे पालन करावे, असे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी सांगितले.ज्या लोकांना बाहेरून रत्नागिरीत यायचे असेल तर पास घेणे अनिवार्य आहे. प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन वर्गीकरण करेल त्यानुसार नियोजन केले जाईल. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू, असेही सांगण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी