शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

रत्नागिरी  जिल्ह्यात पॉस मशीननेच धान्य वितरण : जयकृष्ण फड यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 14:10 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रास्तदर धान्य दुकानांमध्ये आता पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण होणार आहे. जेथे नेटवर्कची समस्या होती, तिथेही आॅगस्ट महिन्यापासून पॉसद्वारेच धान्य दिले जाणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांची रूट नॉमिनी म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी सांगितले.

ठळक मुद्देरत्नागिरी  जिल्ह्यात पॉस मशीननेच धान्य वितरणशासकीय कर्मचाऱ्यांमधून रूट नॉमिनी नियुक्तीची प्रक्रिया

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्वच रास्तदर धान्य दुकानांमध्ये आता पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण होणार आहे. जेथे नेटवर्कची समस्या होती, तिथेही आॅगस्ट महिन्यापासून पॉसद्वारेच धान्य दिले जाणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांची रूट नॉमिनी म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी सांगितले.रास्तदर धान्य दुकानातील वितरण व्यवस्थेत होणारा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने धान्य वितरणामध्येही पॉस मशीनचा वापर करण्याची सक्ती केली. त्यानुसार, पुरवठा विभागाने गेल्या वर्षीपासून या प्रक्रियेला सुरूवात केली. जिल्ह्यातील बहुतांश दुकानात पॉस मशीन बसविले आहेत. सुरूवातीला रेशन दुकानदारांकडून विरोध दर्शविण्यात आला होता. परंतु कमिशन वाढवून दिल्यानंतर त्याला संमती दर्शविली. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये पॉस मशीनचे वाटप झाले आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुुर्ग जिल्हे डोंगराळ असल्यामुळे कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली होती. बहुतांश ग्रामीण भागात मशीनला रेंज मिळत नसल्याचे दिसून आले. महामार्गाचे काम, बॅटरी बॅकअप आदी समस्याही समोर आल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पूर्वीप्रमाणेच अशा ३०२ दुकानांमध्ये धान्य वितरण करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पावतीद्वारे धान्य वाटप सुरू होते.मात्र, शासनाच्या पुरवठा विभागातर्फे २६ जुलै रोजी सर्वच ई - पॉसद्वारे धान्य वितरणाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या भागात कनेक्टिव्हिटीची अडचण येणार आहे, त्या भागात आवश्यकतेनुसार स्थानिक स्तरावरील शासकीय कर्मचारी (पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी आदी) यांची ह्यरूट नॉमिनीह्ण म्हणून नियुक्त करण्याचे आदेश असल्याने पुरवठा विभागाकडून नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.जेथे पॉस मशीनद्वारे धान्य वितरणमध्ये अडथळा निर्माण होईल, त्या ठिकाणी पावतीद्वारे धान्य वितरण करून त्यानंतर अधिकृतरित्या त्या ठिकाणी नियुक्त केलेल्या रूट नॉमिनी मार्फत बायोमेट्रिक प्रणालीद्वारे ही माहिती पॉसमध्ये अपलोड केली जाईल.जिल्ह्यात एकूण ९४३ रेशन दुकाने आहेत. मंडणगड तालुक्यात ४९, दापोलीत ११२, खेडात १२७, गुहागरात ७३, चिपळुणात १४७, संगमेश्वरात १३२, रत्नागिरीत १३६, लांजात ७० तर राजापुरात ९७ रेशनदुकाने आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी