शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

कोरोनाने आणलेले मंदीचे विघ्न, बाप्पाने केले दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST

रत्नागिरी : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बाजारपेठेला आलेली मंदी गणेशोत्सवातील खरेदीमुळे काही प्रमाणात तरी दूर झाली आहे. गतवर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान कोरोनाबाबतची ...

रत्नागिरी : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बाजारपेठेला आलेली मंदी गणेशोत्सवातील खरेदीमुळे काही प्रमाणात तरी दूर झाली आहे. गतवर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान कोरोनाबाबतची भीती अधिक होती. यावेळी तुलनेने दुसरी लाट ओसरली असल्याने आणि कोरोनाबाबतची भीती कमी झाल्यामुळे यावेळी लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे यावर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीतून कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.

जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५३९ घरगुती तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हा कोकणातील सर्वांत मोठा सण असल्याने नोकरीनिमित्त परगावी गेलेले लोक त्यासाठी हमखास हजेरी लावतात. यंदाही जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी तब्बल एक लाख ९१६ मुंबईकर गावी आले आहेत. यामध्ये रेल्वेद्वारे ३१,०९०, बसद्वारे २४,८५८, खासगी वाहनातून २२,२९९, खासगी आराम बसने २२,६६९ लोक आले. गतवर्षीपेक्षा अधिक लोक यावर्षी आले असून, उत्सव शांततेत परंतु आनंदात साजरा करण्यात येत आहे.

मुंबईकर मुंबईतून येताना गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करीत असले तरी स्थानिक बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मखर सजावटीच्या वस्तू, कपडे, प्रसादासाठी लाडू, पेढे, पूजेचे साहित्य, गौरी ओवशासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यात आली आहे.

लाखोची उलाढाल

जिल्ह्यात अडीच ते तीन हजार मूर्तिकार असून, त्यांच्याकडून गणेशमूर्ती तयार करून घेतल्या जातात. पेण किंवा कोल्हापूर येथून जिल्ह्यात गणेशमूर्ती विक्रीला आणल्या जातात. स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्तींप्रमाणेच परजिल्ह्यातून आलेल्या गणेशमूर्तींचीही खरेदी केली जाते. काही सार्वजनिक मंडळे मुंबईहून गणेशमूर्ती घेऊन येतात. जिल्ह्यातील काही मंडळी व्यवसाय अथवा नोकरीमुळे परजिल्ह्यात किंवा राज्यात नोकरीला आहेत. त्यामुळे नातेवाइकांमार्फत येथून गणेशमूर्ती विकत घेऊन नेली जाते. इंधनवाढ, महागाईचा परिणाम मूर्ती व्यवसायावर झाल्याने दरात १० ते १५ टक्केने वाढ झाली होती. संपूर्ण जिल्ह्यात मूर्ती व्यवसायामुळे सुमारे तीन ते साडेतीन कोटींच्या घरात उलाढाल झाली आहे.

सजावट साहित्य खरेदी

गणेशमूर्तीबरोबरच मूर्ती ठेवण्यासाठी मखर सजावटीवरही अधिक खर्च केला जातोे. त्यासाठी लागणारे पडदे, झुंबर, विद्युत माळा, फुलांच्या माळांची खरेदी करण्यात येते. सजावट साहित्य खरेदीसाठी गतवर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद लाभला. वर्षाचा सण असल्याने कपडे खरेदी प्राधान्याने केली जाते. फिजिकल डिस्टन्सिंगमुळे उत्सवच साधेपणाने साजरा होत असतानाही बाजारात विविध वस्तूंची खरेदी ग्राहकांनी केली.

मिठाई व्यवसाय तेजीत

गणेशोत्सवात सहस्त्रनामाचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी सहस्त्र लाडू, मोदक अर्पण केले जातात. मोठा मोदक किंवा मोठा लाडू ठेवला जातो. पूर्वी मुंबईतून मोठे लाडू आणले जात असत. परंतु आता रत्नागिरीतही पाव किलोपासून एक किलोपर्यंतचे लाडू उपलब्ध असल्याने मोतीचुराच्या लाडवांसह तिरंगी मोदक, काजू मोदक, ड्रायफ्रूट मोदक तसेच विविध प्रकारचे पेढे, मोदक तसेच अन्य मिठाईला विशेष मागणी होती.

मोदकांना मोठी मागणी

उत्सवात पाहुण्याची वर्दळ असल्याने लाडू, चिवडा, फरसाण यांचाही खप बऱ्यापैकी होता. त्यातच यावर्षी ओवसे असल्याने फराळाचे तयार जिन्नसांना तर विशेष मागणी होती. त्यामुळे मिठाई व्यवसायातूनही लाखोची उलाढाल झाली. याशिवाय मिठाई विक्रेत्यांनी तयार उकडीचे मोदक मोदकांसाठी खास ऑर्डर घेतली होती.

फुलांचा खप

ताज्या फुलांचा वापर सजावटीबरोबर पूजेसाठी केला जातो. त्यामुळे हार, सुटी फुले, गणपतीसाठी किरीट, मुकुट, बाजूबंद, कमरपट्टा यांना विशेष मागणी होती. वेण्या, गजरे यांचाही खप मोठ्या प्रमाणावर होतो. याशिवाय दुर्वांच्या जुड्या, दुर्वा हार, झेंडू, गुलाब, शेवंती, जर्बेरा तसेच सजावटीसाठी डेलियाला विशेष मागणी होती. कोल्हापूर, वाशी, मुंबईतून फुलांची आवक वाढली होती. झेंडू १०० ते १२० रुपये, गुलछडी ३००, गुलाब १२० ते २००, शेवंती २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री सुरू होती. फुलांनाही चांगली मागणी असल्याने व्यवसाय तेजीत होता.