शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

रत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 17:45 IST

नाविन्यपूर्ण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेमधून सुरु असलेल्या विहिरींच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, ग्रामपंचायतींकडून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनेतील २१ विहिरींची कामे अडकल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत स्पष्ट केले़ ही बक्षीसपत्रे करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढे यावे, असे आवाहन प्रभारी सभापती सुनील नावले यांनी आजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत केले़

ठळक मुद्देरत्नागिरी पंचायत समिती सभेत चर्चाग्रामीण पाणीपुरवठाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती

रत्नागिरी : नाविन्यपूर्ण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेमधून सुरु असलेल्या विहिरींच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, ग्रामपंचायतींकडून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनेतील २१ विहिरींची कामे अडकल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत स्पष्ट केले़ ही बक्षीसपत्रे करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढे यावे, असे आवाहन प्रभारी सभापती सुनील नावले यांनी आजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत केले़ही सभा प्रभारी सभापती नावले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला़ ह्यउन्नत शेती, समृध्द शेतकरीह्ण या योजनेंतर्गत ५३९ शेतकऱ्यांचे पॉवर स्प्रे व ग्रासकटर अनुदान जमा करण्यात आले आहे़ तालुक्यातील कासारवेली गावाची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड झाल्याचे यावेळी रोजगार हमी योजनेच्या अधिकाºयांनी सांगितले़चालू शैक्षणिक वर्षात रत्नागिरी तालुक्यात २ हजार २८८ विद्यार्थ्यांनी पहिली इयत्तेत प्रवेश घेतला आहे़ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले असले तरी काही विषयांची पुस्तके नुकतीच उपलब्ध झाली असून, ती पुढील आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहेत़.

तालुक्यातील नाखरे-उंबरवाडी येथील शाळेची पटसंख्या केवळ ३ असल्याने, शासन निर्णयानुसार ही शाळा बंद करावी लागणार आहे़ परंतु, सद्यस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने ही पटसंख्या १२ एवढी झाली असली तरी किमान २० पटसंख्या असेल तर ही शाळा सुरू ठेवता येणार आहे़ त्यामुळे यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी भाग्यश्री हिरवे यांनी सभागृहात स्पष्ट केले़नाविन्यपूर्ण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत तालुक्याला विहिरींची कामे मंजूर झाली आहेत़ त्यासाठी १० लाखांचा निधीही उपलब्ध झाला आहे़ परंतु, विहिरींसाठी लागणारी जागा बक्षीसपत्र नसल्यामुळे या योजनेतील २१ विहिरींची कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामध्ये सभागृहाने लक्ष घालावे, अशी विनंती यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी केली़

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीRatnagiriरत्नागिरी