शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

रत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 17:45 IST

नाविन्यपूर्ण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेमधून सुरु असलेल्या विहिरींच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, ग्रामपंचायतींकडून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनेतील २१ विहिरींची कामे अडकल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत स्पष्ट केले़ ही बक्षीसपत्रे करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढे यावे, असे आवाहन प्रभारी सभापती सुनील नावले यांनी आजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत केले़

ठळक मुद्देरत्नागिरी पंचायत समिती सभेत चर्चाग्रामीण पाणीपुरवठाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती

रत्नागिरी : नाविन्यपूर्ण तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेमधून सुरु असलेल्या विहिरींच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र, ग्रामपंचायतींकडून बक्षीसपत्र न मिळाल्याने या योजनेतील २१ विहिरींची कामे अडकल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत स्पष्ट केले़ ही बक्षीसपत्रे करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढे यावे, असे आवाहन प्रभारी सभापती सुनील नावले यांनी आजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत केले़ही सभा प्रभारी सभापती नावले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला़ ह्यउन्नत शेती, समृध्द शेतकरीह्ण या योजनेंतर्गत ५३९ शेतकऱ्यांचे पॉवर स्प्रे व ग्रासकटर अनुदान जमा करण्यात आले आहे़ तालुक्यातील कासारवेली गावाची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड झाल्याचे यावेळी रोजगार हमी योजनेच्या अधिकाºयांनी सांगितले़चालू शैक्षणिक वर्षात रत्नागिरी तालुक्यात २ हजार २८८ विद्यार्थ्यांनी पहिली इयत्तेत प्रवेश घेतला आहे़ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले असले तरी काही विषयांची पुस्तके नुकतीच उपलब्ध झाली असून, ती पुढील आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहेत़.

तालुक्यातील नाखरे-उंबरवाडी येथील शाळेची पटसंख्या केवळ ३ असल्याने, शासन निर्णयानुसार ही शाळा बंद करावी लागणार आहे़ परंतु, सद्यस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने ही पटसंख्या १२ एवढी झाली असली तरी किमान २० पटसंख्या असेल तर ही शाळा सुरू ठेवता येणार आहे़ त्यामुळे यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी भाग्यश्री हिरवे यांनी सभागृहात स्पष्ट केले़नाविन्यपूर्ण तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत तालुक्याला विहिरींची कामे मंजूर झाली आहेत़ त्यासाठी १० लाखांचा निधीही उपलब्ध झाला आहे़ परंतु, विहिरींसाठी लागणारी जागा बक्षीसपत्र नसल्यामुळे या योजनेतील २१ विहिरींची कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामध्ये सभागृहाने लक्ष घालावे, अशी विनंती यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी केली़

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीRatnagiriरत्नागिरी