शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

डिंगणी - जयगड रेल्वे मार्गामुळे १० पाणीयोजना होणार बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:54 AM

डिंगणी-जयगड रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील एकूण १० नळपाणी पुरवठा योजना बाधित होत असल्याचा अहवाल उपअभियंत्यांनी पाहणीनंतर जिल्हा परिषदेला दिला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने या कामाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत आहे.

ठळक मुद्देडिंगणी - जयगड रेल्वे मार्गामुळे १० पाणीयोजना होणार बाधितउपअभियंत्यांकडून जिल्हा परिषदेला अहवाल सादर

रत्नागिरी : डिंगणी-जयगड रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यातील एकूण १० नळपाणी पुरवठा योजना बाधित होत असल्याचा अहवाल उपअभियंत्यांनी पाहणीनंतर जिल्हा परिषदेला दिला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने या कामाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत आहे.मालाची ने-आण करण्यासाठी सोपा मार्ग बंदर हा असल्याने त्याला रेल्वे मार्गाने जोडल्यास व्यवसायासह विकासालाही चालना मिळणार आहे, असा मुद्दा खासगी कंपनीकडून पुढे करण्यात येत आहे. त्यामुळे डिंंगणी- जयगड रेल्वे मार्गाची आखणी करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास जयगड बंदर थेट कोकण रेल्वेला जोडले जाणार असून, महामार्गावरील वाहतूक कमी होणार असून, व्यावसायिकदृष्ट्या हे फायद्याचे ठरणार आहे.डिंंगणी - जयगड रेल्वे मार्ग हा व्यापारी दृष्टीकोनातून फायद्याचा असला, तरी ज्या गावांमधून हा मार्ग जाणार आहे तेथील ग्रामस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा या रेल्वेमार्गाला तीव्र विरोध असल्याने खासगी कंपनीसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या रेल्वे प्रकल्पाबाबत जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार चर्चा झाली होती. त्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले होते.त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने उपअभियंत्यांना डिंगणी - जयगड रेल्वे मार्गाची पाहणी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपअभियंत्यांनी या मार्गाची पाहणी करुन अहवाल दिला होता.

त्यामध्ये या रेल्वे प्रकल्पामुळे संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावातील घडशीवाडी, कांबळेवाडी, कुंभारवाडी, शिंदेवाडी, भोसलेवाडी, लांजेकरवाडी, बौध्दवाडी, कडेवठार, देसाईवाडी, शंकरवठार आणि रत्नागिरी तालुक्यातील खालगाव धारेखालची विहीर अशा नळपाणी पुरवठा योजना बाधित होत असल्याचे अहवालात उपअभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. या रेल्वे मार्गाच्या कामामुळे नळपाणी पुरवठा योजना बाधित झाल्यास भविष्यात येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होणार असल्याने ग्रामस्थांचाही विरोध आहे.या प्रकल्पामुळे नळपाणी पुरवठा योजनाच नव्हे तर त्याबरोबरच रस्तेही बाधित होणार आहेत. त्यामध्ये देऊड - लावगणवाडी - चिंचवाडी रस्ता, जाकादेवी - खालगाव - राई रस्ता, खालगाव बौध्दवाडी रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. ही नुकसानभरपाई कंपनीकडून लिखित स्वरुपात दिली जात नाही, तोपर्यंत या प्रकल्पाचे काम करावयास द्यायचे नाही, असा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता.अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्तारत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाचा प्रश्न जोरदार गाजला होता. त्या सभेत हा रेल्वे मार्ग कोणत्या कंपनीसाठी नेण्यात येत आहे, असा प्रश्न त्याठिकाणी उपस्थित असलेल्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्यांनी विचारला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी कंपनीचे नाव सभागृहाला न सांगता वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त सदस्यांनी ह्यत्याह्ण अधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर व्हा, अशा शब्दात सुनावले होते. सदस्य संतप्त झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती.

टॅग्स :railwayरेल्वेRatnagiriरत्नागिरी