शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुळवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:03 IST

gram panchayat Elecation Ratnagiri- असगोली तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी असली तरी गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून अन्य सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देगुहागरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुळवड२९ ग्रामपंचायतींसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू

असगोली : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी असली तरी गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून अन्य सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.तालुक्यातील कोंडकरूळ, रानवी, भातगाव, तळवली, निगुंडळ, पालपेणे, नरवण, पिंपर, मळण, शीर, वेळणेश्वर, जामसुत, मासू, अडूर, काजुर्ली, शिवणे, गोळेवाडी, मुंढर, पडवे, काताळे, उमराठ, कुडली, पेवे, खामशेत, साखळी बुद्रुक, साखरी आगर, कोळवली, गिमवी, कोसबीवाडी आदी २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुन्या-नव्यांची सांगड घालावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून राजेंद्र आरेकर यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गाव पातळीवरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित बैठका सुरू झाल्या आहेत.राष्ट्रवादी अडसर ठरेल?राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र असले तरी गुहागरात मात्र राष्ट्रवादी शिवसेनेला अडसर ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला बळकटी मिळाली आहे.लढत तीन पक्षात?भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या माध्यमातून वाडी-वस्तीवर बैठका सुरू केल्या आहेत. केंद्रशासनाच्या योजनांच्या जोरावर अधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. खरी लढत ही शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप या तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार हे निश्चित आहे. त्यातही तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून रिंगणात उतरल्यास चित्र बदलेल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीGuhagar Nagar Panchayatगुहागर नगरपंचायतElectionनिवडणूक