शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुळवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:03 IST

gram panchayat Elecation Ratnagiri- असगोली तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी असली तरी गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून अन्य सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देगुहागरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुळवड२९ ग्रामपंचायतींसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू

असगोली : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी असली तरी गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून अन्य सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.तालुक्यातील कोंडकरूळ, रानवी, भातगाव, तळवली, निगुंडळ, पालपेणे, नरवण, पिंपर, मळण, शीर, वेळणेश्वर, जामसुत, मासू, अडूर, काजुर्ली, शिवणे, गोळेवाडी, मुंढर, पडवे, काताळे, उमराठ, कुडली, पेवे, खामशेत, साखळी बुद्रुक, साखरी आगर, कोळवली, गिमवी, कोसबीवाडी आदी २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुन्या-नव्यांची सांगड घालावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून राजेंद्र आरेकर यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गाव पातळीवरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित बैठका सुरू झाल्या आहेत.राष्ट्रवादी अडसर ठरेल?राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र असले तरी गुहागरात मात्र राष्ट्रवादी शिवसेनेला अडसर ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला बळकटी मिळाली आहे.लढत तीन पक्षात?भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या माध्यमातून वाडी-वस्तीवर बैठका सुरू केल्या आहेत. केंद्रशासनाच्या योजनांच्या जोरावर अधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. खरी लढत ही शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप या तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार हे निश्चित आहे. त्यातही तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून रिंगणात उतरल्यास चित्र बदलेल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीGuhagar Nagar Panchayatगुहागर नगरपंचायतElectionनिवडणूक