शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पंचसूत्री कार्यक्रमातून विकासकामांना गती देणार : विक्रांत जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

मंडणगड : कोरोनामुळे जिल्ह्यातील विकासकामांची गती मंदावलेली असल्याने तिला अधिक गतिमान करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक ...

मंडणगड : कोरोनामुळे जिल्ह्यातील विकासकामांची गती मंदावलेली असल्याने तिला अधिक गतिमान करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्याचा आढावा घेत प्रशासनास यथायोग्य सूचना दिलेल्या असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मंडणगड येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी झीरो पेंडन्सी, मनरेगा, जलजीवन मिशन, तिसऱ्या लाटेचा आढावा व तयारी आणि विकासकामांचे प्रश्न यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्याचे सांगितले.

या पत्रकार परिषदेला आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, सभापती स्नेहल सकपाळ उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. दुर्लक्षित म्हणून गणल्या गेलेल्या तालुक्यास न्याय देण्याचे काम करणार असल्याचे यावेळी सांगितले. असमतोल निधी वाटप झाल्याने तालुक्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत पत्रकारांनी छेडले असता, ते म्हणाले की, निधीचा अभाव व सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका पाळावी लागत आहे. आगामी काळात तालुक्यास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यास अग्रक्रम देणार असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी जलजीवन मिशनमध्ये जिल्ह्यात मंडणगड तालुक्याचे काम एक नंबरवर असल्याचे सांगितले. आमदार योगेश कदम यांनी राबवत असलेला हळद लागवडीचा उपक्रम हा स्तुत्य असून, यामुळे नागरिकांना चांगला रोजगार मिळत आहे. पर्यटन विकासाबाबत बाेलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्याला पर्यटन विकासासाठी म्हणावा तसा निधी उपलब्ध होत नाही. तरी आपण ‘क’ दर्जा पर्यटनामधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.