शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

विकासकामांसह गद्दारीचा मुद्दा रंगणार

By admin | Updated: September 29, 2014 00:12 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रचारात राडा होण्याची शक्यता

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धडका सुरु झालेला असतानाच विकासकामांसह गद्दारी या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जाणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये या मुद्द्यावरुन जोरदार राडा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. सत्तेसाठी वाटेल ते करता येते, असे एकूण आजच्या राजकीय स्थितीवरुन दिसून येते. कारण जनतेच्या भल्यापेक्षा स्वत:ची पोळी कशी भाजता येईल, असेच जिल्ह्यातील राजकीय उलाढालीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मतदार जागा होणार का, अशी चर्चा सुरु आहे. रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेना-भाजपा युतीचे राज्य असतानाही आमदार राष्ट्रवादीचा होता, यातून खरे राजकारण कळत होते. उदय सामंत यांनी केलेल्या शिवसेनेतील प्रवेशाने राष्ट्रवादी एकदम पोरकी झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे तालुक्यात भरकटलेले तारु कसे तारता येईल, यासाठी बशीर मुर्तुझा यांच्या हाती दोर देण्यात आला आहे. विविध खात्यांचे मंत्री असलेल्या पालकमंत्र्यांनी आघाडी शासनाच्या माध्यमातून विकासकामे केली. त्याचे श्रेय सामंत हेच घेणार असल्याचा प्रश्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. राष्ट्रवादीने सामंत यांना काय नाही दिले, तरीही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करुन आपली पुढील राजकीय कारकीर्द सुरु केली आहे. त्यामुळे अचानक राष्ट्रवादी एकदम रिकामी झाल्याने उर्वरित पदाधिकाऱ्यांनीही गप्प बसून चालणार नाही, असाच काहीसा विचार पुढे येत आहे. त्यामुळे आघाडी सरकारने केलेली विकासकामे, हा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जाणार आहेच. शिवाय ज्याला पक्षाने युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिपद देऊन राज्याच्या राजकारणात सक्रिय केले. त्यानेच पक्षाशी गद्दारी केली. आता विकासकामांबरोबर गद्दारी हा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाण्यातच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना रस आहे. त्यामुळे गद्दार या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. गद्दार या मुद्द्याला सामंत आणि शिवसेना कशा प्रकारे उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, गद्दारीवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामंत यांच्या मुद्द्यावरुन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापणार आहे. या मतदार संघातील लढतीकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)