शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांसह गद्दारीचा मुद्दा रंगणार

By admin | Updated: September 29, 2014 00:12 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रचारात राडा होण्याची शक्यता

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धडका सुरु झालेला असतानाच विकासकामांसह गद्दारी या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जाणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये या मुद्द्यावरुन जोरदार राडा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. सत्तेसाठी वाटेल ते करता येते, असे एकूण आजच्या राजकीय स्थितीवरुन दिसून येते. कारण जनतेच्या भल्यापेक्षा स्वत:ची पोळी कशी भाजता येईल, असेच जिल्ह्यातील राजकीय उलाढालीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मतदार जागा होणार का, अशी चर्चा सुरु आहे. रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेना-भाजपा युतीचे राज्य असतानाही आमदार राष्ट्रवादीचा होता, यातून खरे राजकारण कळत होते. उदय सामंत यांनी केलेल्या शिवसेनेतील प्रवेशाने राष्ट्रवादी एकदम पोरकी झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे तालुक्यात भरकटलेले तारु कसे तारता येईल, यासाठी बशीर मुर्तुझा यांच्या हाती दोर देण्यात आला आहे. विविध खात्यांचे मंत्री असलेल्या पालकमंत्र्यांनी आघाडी शासनाच्या माध्यमातून विकासकामे केली. त्याचे श्रेय सामंत हेच घेणार असल्याचा प्रश्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. राष्ट्रवादीने सामंत यांना काय नाही दिले, तरीही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करुन आपली पुढील राजकीय कारकीर्द सुरु केली आहे. त्यामुळे अचानक राष्ट्रवादी एकदम रिकामी झाल्याने उर्वरित पदाधिकाऱ्यांनीही गप्प बसून चालणार नाही, असाच काहीसा विचार पुढे येत आहे. त्यामुळे आघाडी सरकारने केलेली विकासकामे, हा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जाणार आहेच. शिवाय ज्याला पक्षाने युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिपद देऊन राज्याच्या राजकारणात सक्रिय केले. त्यानेच पक्षाशी गद्दारी केली. आता विकासकामांबरोबर गद्दारी हा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाण्यातच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना रस आहे. त्यामुळे गद्दार या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. गद्दार या मुद्द्याला सामंत आणि शिवसेना कशा प्रकारे उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, गद्दारीवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामंत यांच्या मुद्द्यावरुन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापणार आहे. या मतदार संघातील लढतीकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)