शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

विकासकामांसह गद्दारीचा मुद्दा रंगणार

By admin | Updated: September 29, 2014 00:12 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रचारात राडा होण्याची शक्यता

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धडका सुरु झालेला असतानाच विकासकामांसह गद्दारी या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जाणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये या मुद्द्यावरुन जोरदार राडा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. सत्तेसाठी वाटेल ते करता येते, असे एकूण आजच्या राजकीय स्थितीवरुन दिसून येते. कारण जनतेच्या भल्यापेक्षा स्वत:ची पोळी कशी भाजता येईल, असेच जिल्ह्यातील राजकीय उलाढालीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मतदार जागा होणार का, अशी चर्चा सुरु आहे. रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेना-भाजपा युतीचे राज्य असतानाही आमदार राष्ट्रवादीचा होता, यातून खरे राजकारण कळत होते. उदय सामंत यांनी केलेल्या शिवसेनेतील प्रवेशाने राष्ट्रवादी एकदम पोरकी झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे तालुक्यात भरकटलेले तारु कसे तारता येईल, यासाठी बशीर मुर्तुझा यांच्या हाती दोर देण्यात आला आहे. विविध खात्यांचे मंत्री असलेल्या पालकमंत्र्यांनी आघाडी शासनाच्या माध्यमातून विकासकामे केली. त्याचे श्रेय सामंत हेच घेणार असल्याचा प्रश्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. राष्ट्रवादीने सामंत यांना काय नाही दिले, तरीही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करुन आपली पुढील राजकीय कारकीर्द सुरु केली आहे. त्यामुळे अचानक राष्ट्रवादी एकदम रिकामी झाल्याने उर्वरित पदाधिकाऱ्यांनीही गप्प बसून चालणार नाही, असाच काहीसा विचार पुढे येत आहे. त्यामुळे आघाडी सरकारने केलेली विकासकामे, हा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जाणार आहेच. शिवाय ज्याला पक्षाने युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिपद देऊन राज्याच्या राजकारणात सक्रिय केले. त्यानेच पक्षाशी गद्दारी केली. आता विकासकामांबरोबर गद्दारी हा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाण्यातच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना रस आहे. त्यामुळे गद्दार या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. गद्दार या मुद्द्याला सामंत आणि शिवसेना कशा प्रकारे उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, गद्दारीवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामंत यांच्या मुद्द्यावरुन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापणार आहे. या मतदार संघातील लढतीकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)