शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

मासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 6:57 PM

Ratnagiri HraneBandar Fishrman- रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णेै आणि साखरीनाटे या २ बंदरांसह मासळी उतरवण्याच्या ११ केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा किंवा सागरमाला योजनेद्वारे राबविण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. बंदरांसह केंद्रांचा विकास झाल्यास मासेमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देमासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास  व्यवसायाला चालना, केंद्राकडे प्रस्ताव

रत्नागिरी : जिल्ह्यातील हर्णेै आणि साखरीनाटे या २ बंदरांसह मासळी उतरवण्याच्या ११ केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा किंवा सागरमाला योजनेद्वारे राबविण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. बंदरांसह केंद्रांचा विकास झाल्यास मासेमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे.मासेमारी व्यवसायाबरोबरच व्यापारी, दळणवळण आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही बंदरे व मासळी उतरविणाऱ्या केंद्रांचा विकास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा यात समावेश आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल बंगळुरू येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज (सीआयसीईएफ) या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीकडे तांत्रिक छाननीसाठी पाठवण्यात आला होता. सीआयसीईएफ या संस्थेच्या पथकाने पाहणी करुन पहिल्या टप्प्यात ४ प्रमुख बंदरे आणि मासळी उतरवण्याच्या २० केंद्रांना मान्यता दिली आहे. ८ प्रमुख बंदरे व मासळी उतरविणाऱ्या ५९ केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यानुसार एकूण ६३५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.या बंदर विकास योजनांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले गेले तेव्हा पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना अस्तित्त्वात नव्हती. त्यामुळे या प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर हे प्रकल्प पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून करायचे की, सागरमाला योजनेपर्यंत राबवायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.मासळी उतरविण्यात येणारी केंद्रेजिल्ह्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. या व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील आंबोळगड, हेदवी, बुधल, पालशेत, असगोली, दाभोळ, पाजपंढरी, आंजर्ले, केळशी, वेसवी, बाणकोट या मासळी उतरविण्यात येणाऱ्या केंद्राचा विकास केला जाणार आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारHarnai portहर्णै बंदरRatnagiriरत्नागिरी