शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:58 IST

Ratnagiri HraneBandar Fishrman- रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णेै आणि साखरीनाटे या २ बंदरांसह मासळी उतरवण्याच्या ११ केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा किंवा सागरमाला योजनेद्वारे राबविण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. बंदरांसह केंद्रांचा विकास झाल्यास मासेमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देमासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास  व्यवसायाला चालना, केंद्राकडे प्रस्ताव

रत्नागिरी : जिल्ह्यातील हर्णेै आणि साखरीनाटे या २ बंदरांसह मासळी उतरवण्याच्या ११ केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा किंवा सागरमाला योजनेद्वारे राबविण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. बंदरांसह केंद्रांचा विकास झाल्यास मासेमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे.मासेमारी व्यवसायाबरोबरच व्यापारी, दळणवळण आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही बंदरे व मासळी उतरविणाऱ्या केंद्रांचा विकास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा यात समावेश आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल बंगळुरू येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज (सीआयसीईएफ) या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीकडे तांत्रिक छाननीसाठी पाठवण्यात आला होता. सीआयसीईएफ या संस्थेच्या पथकाने पाहणी करुन पहिल्या टप्प्यात ४ प्रमुख बंदरे आणि मासळी उतरवण्याच्या २० केंद्रांना मान्यता दिली आहे. ८ प्रमुख बंदरे व मासळी उतरविणाऱ्या ५९ केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यानुसार एकूण ६३५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.या बंदर विकास योजनांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले गेले तेव्हा पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना अस्तित्त्वात नव्हती. त्यामुळे या प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर हे प्रकल्प पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून करायचे की, सागरमाला योजनेपर्यंत राबवायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.मासळी उतरविण्यात येणारी केंद्रेजिल्ह्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. या व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील आंबोळगड, हेदवी, बुधल, पालशेत, असगोली, दाभोळ, पाजपंढरी, आंजर्ले, केळशी, वेसवी, बाणकोट या मासळी उतरविण्यात येणाऱ्या केंद्राचा विकास केला जाणार आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारHarnai portहर्णै बंदरRatnagiriरत्नागिरी