शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

मासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:58 IST

Ratnagiri HraneBandar Fishrman- रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णेै आणि साखरीनाटे या २ बंदरांसह मासळी उतरवण्याच्या ११ केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा किंवा सागरमाला योजनेद्वारे राबविण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. बंदरांसह केंद्रांचा विकास झाल्यास मासेमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देमासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास  व्यवसायाला चालना, केंद्राकडे प्रस्ताव

रत्नागिरी : जिल्ह्यातील हर्णेै आणि साखरीनाटे या २ बंदरांसह मासळी उतरवण्याच्या ११ केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा किंवा सागरमाला योजनेद्वारे राबविण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. बंदरांसह केंद्रांचा विकास झाल्यास मासेमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे.मासेमारी व्यवसायाबरोबरच व्यापारी, दळणवळण आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही बंदरे व मासळी उतरविणाऱ्या केंद्रांचा विकास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा यात समावेश आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल बंगळुरू येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज (सीआयसीईएफ) या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीकडे तांत्रिक छाननीसाठी पाठवण्यात आला होता. सीआयसीईएफ या संस्थेच्या पथकाने पाहणी करुन पहिल्या टप्प्यात ४ प्रमुख बंदरे आणि मासळी उतरवण्याच्या २० केंद्रांना मान्यता दिली आहे. ८ प्रमुख बंदरे व मासळी उतरविणाऱ्या ५९ केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यानुसार एकूण ६३५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.या बंदर विकास योजनांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले गेले तेव्हा पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना अस्तित्त्वात नव्हती. त्यामुळे या प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर हे प्रकल्प पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून करायचे की, सागरमाला योजनेपर्यंत राबवायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.मासळी उतरविण्यात येणारी केंद्रेजिल्ह्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. या व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील आंबोळगड, हेदवी, बुधल, पालशेत, असगोली, दाभोळ, पाजपंढरी, आंजर्ले, केळशी, वेसवी, बाणकोट या मासळी उतरविण्यात येणाऱ्या केंद्राचा विकास केला जाणार आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारHarnai portहर्णै बंदरRatnagiriरत्नागिरी