शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला

By अरुण आडिवरेकर | Updated: November 15, 2022 17:55 IST

महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे

रत्नागिरी : राज्यातील सरकारची अस्थिरतेकडे वाटचाल सुरु आहे. बहुमत असूनही हे सरकार अस्थिर आणि अस्वस्थ आहे. ज्यावेळी अस्थिरतेकडे वाटचाल होते, त्यावेळी पुढचे पाऊल हे मध्यावधी निवडणुका असू शकते. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले.दिशा समितीच्या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे आज, मंगळवारी (दि.१५) रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमदार जितेंद्र आव्हाड हे गेली अनेक वर्षे सक्रिय राजकारणात आहेत. शरद पवारांच्या पुरोगामी विचारांचा पगडा त्यांच्या मनावर आहे. पोलिसांमार्फत जो काही प्रकार झाला तो दुर्दैवी आणि निषेधार्ह असाच आहे. विरोधी पक्षातील सक्षम नेत्यावर अशाप्रकारची कारवाई करणे म्हणजे सरकारच्या अस्थिरतेबाबत त्यांच्याच मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणूनच अशाप्रकरची आकसाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खासदार तटकरे यांनी केला. सरकारने याबाबत फेरविचार करावा, असेही ते म्हणाले.मंत्री सत्तारांवर यापेक्षा कडक कारवाई झाली पाहिजेराजकारणात आणि समाजकारणात मतमतांतर असू शकतात. प्रत्येकाची राजकीय विचारसरणी भिन्न असू शकते. संविधानाच्या माध्यमातून विरोधी पक्ष सक्षम असलाच पाहिजे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नाही. आपले विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. ज्यापद्धतीने गुन्हा नोंदविण्याची तत्परता दाखविण्यात आली. त्याउलट खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत अश्लिल, हीन शब्दामध्ये राज्याच्या एका विद्यमान मंत्र्याने काढलेले उद्गार महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. खरंतर कारवाई व्हायचीच असेल तर यापेक्षाही कडक कारवाई अब्दुल सत्तार यांच्यावर झाली पाहिजे, असे खासदार तटकरे म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsunil tatkareसुनील तटकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस