शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

बहुमत असूनही शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर-अस्वस्थ, खासदार सुनील तटकरेंनी लगावला टोला

By अरुण आडिवरेकर | Updated: November 15, 2022 17:55 IST

महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे

रत्नागिरी : राज्यातील सरकारची अस्थिरतेकडे वाटचाल सुरु आहे. बहुमत असूनही हे सरकार अस्थिर आणि अस्वस्थ आहे. ज्यावेळी अस्थिरतेकडे वाटचाल होते, त्यावेळी पुढचे पाऊल हे मध्यावधी निवडणुका असू शकते. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच एवढी अस्थिरता पाहायला मिळते आहे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले.दिशा समितीच्या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे आज, मंगळवारी (दि.१५) रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमदार जितेंद्र आव्हाड हे गेली अनेक वर्षे सक्रिय राजकारणात आहेत. शरद पवारांच्या पुरोगामी विचारांचा पगडा त्यांच्या मनावर आहे. पोलिसांमार्फत जो काही प्रकार झाला तो दुर्दैवी आणि निषेधार्ह असाच आहे. विरोधी पक्षातील सक्षम नेत्यावर अशाप्रकारची कारवाई करणे म्हणजे सरकारच्या अस्थिरतेबाबत त्यांच्याच मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणूनच अशाप्रकरची आकसाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खासदार तटकरे यांनी केला. सरकारने याबाबत फेरविचार करावा, असेही ते म्हणाले.मंत्री सत्तारांवर यापेक्षा कडक कारवाई झाली पाहिजेराजकारणात आणि समाजकारणात मतमतांतर असू शकतात. प्रत्येकाची राजकीय विचारसरणी भिन्न असू शकते. संविधानाच्या माध्यमातून विरोधी पक्ष सक्षम असलाच पाहिजे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नाही. आपले विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. ज्यापद्धतीने गुन्हा नोंदविण्याची तत्परता दाखविण्यात आली. त्याउलट खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत अश्लिल, हीन शब्दामध्ये राज्याच्या एका विद्यमान मंत्र्याने काढलेले उद्गार महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. खरंतर कारवाई व्हायचीच असेल तर यापेक्षाही कडक कारवाई अब्दुल सत्तार यांच्यावर झाली पाहिजे, असे खासदार तटकरे म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsunil tatkareसुनील तटकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस