शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Ratnagiri news: पूरमुक्ततेसाठी चांदेराईत नदीतील गाळउपसा सुरू, मात्र..

By मनोज मुळ्ये | Updated: March 17, 2023 14:00 IST

जिल्हा नियोजन समितीमधून २५ लाख रुपये मंजूर

रत्नागिरी : दरवर्षी पावसाळ्यात पुराचा धोका उद्भवणाऱ्या चांदेराई येथे नदीतील गाळ उपशाचे काम वेगात सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमधून त्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले असून, पाटबंधारे खात्याकडून हे काम केले जात आहे. मात्र उपसलेला गाळ नदीकिनारीच ठेवला जात असल्याने पावसाळ्यात तो पुन्हा नदीत येण्याची भीती आहे.चांदेराईमधून वाहणाऱ्या काजळी नदीला दरवर्षी पूर येतो. सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो. वर्षानुवर्षे या नदीतील गाळ काढण्यात आला नसल्याने अतिवृष्टी काळात नदीचे पात्र रुंदावते. दरवर्षी पुरामुळे शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान होते. यावर पर्याय काढण्यासाठी म्हणून गतवर्षापासून नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र गतवर्षी साधनसामग्री कमी असल्याने या कामात फारशी प्रगती झाली नाही.यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गाळ उपसा करण्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात पाटबंधारे खात्याने गतवर्षीपेक्षा थोडी अधिक यंत्रणा उपलब्ध केली असल्याने या कामाला गती आली आहे. मात्र उपसलेला गाळ नदीच्या काठावरच ठेवला जात असल्याने पावसाळ्यात तो पुन्हा नदी येऊन समस्या तशीच राहण्याचीही भीती आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदीfloodपूर