शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

राजापुरात माेसम गावातून टॅंकरसाठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

राजापूर : गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे यावर्षी आतापर्यंत पाणीटंचाईची झळ फारशी जाणवली नसली तरी दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे जलस्त्राेतांमधील पाणी कमी ...

राजापूर : गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे यावर्षी आतापर्यंत पाणीटंचाईची झळ फारशी जाणवली नसली तरी दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे जलस्त्राेतांमधील पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे राजापूर तालुक्याला हळूहळू टंचाईचे चटके बसू लागले आहेत. सद्य:स्थितीत तालुक्यातील मोसम सरवणकरवाडी येथील ग्रामस्थांना टंचाईची झळ बसत असून, त्यांनी टँकरद्वारे पाणी पुरविण्याची मागणी पंचायत समितीकडे केली आहे.

राजापूर तालुक्याला दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मुबलक प्रमाणात पाऊस पडला तरी राजापूर तालुक्याला लागलेले पाणीटंचाईचे ग्रहण मात्र वर्षानुवर्षे कायम आहे. दरवर्षी नवनवीन गावांची टंचाईग्रस्त म्हणून भर पडत आहे. ही पाणी समस्या दूर करण्याकरिता विविध योजनांच्या माध्यमातून शासनाकडून दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. मात्र, तरीही पाणीटंचाईच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

गतवर्षी तालुक्याला फारशी टंचाई जाणवली नव्हती. यावर्षीही परतीचा पाऊस चांगला झाला होता. शिवाय मधल्या काळात अवकाळी पावसानेही हजेरी लावलेली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईची झळ काहीशी कमी बसेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील मोसम सरवणकरवाडी येथील काही ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे.