शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

राजापुरात माेसम गावातून टॅंकरसाठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

राजापूर : गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे यावर्षी आतापर्यंत पाणीटंचाईची झळ फारशी जाणवली नसली तरी दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे जलस्त्राेतांमधील पाणी कमी ...

राजापूर : गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे यावर्षी आतापर्यंत पाणीटंचाईची झळ फारशी जाणवली नसली तरी दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे जलस्त्राेतांमधील पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे राजापूर तालुक्याला हळूहळू टंचाईचे चटके बसू लागले आहेत. सद्य:स्थितीत तालुक्यातील मोसम सरवणकरवाडी येथील ग्रामस्थांना टंचाईची झळ बसत असून, त्यांनी टँकरद्वारे पाणी पुरविण्याची मागणी पंचायत समितीकडे केली आहे.

राजापूर तालुक्याला दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मुबलक प्रमाणात पाऊस पडला तरी राजापूर तालुक्याला लागलेले पाणीटंचाईचे ग्रहण मात्र वर्षानुवर्षे कायम आहे. दरवर्षी नवनवीन गावांची टंचाईग्रस्त म्हणून भर पडत आहे. ही पाणी समस्या दूर करण्याकरिता विविध योजनांच्या माध्यमातून शासनाकडून दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. मात्र, तरीही पाणीटंचाईच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

गतवर्षी तालुक्याला फारशी टंचाई जाणवली नव्हती. यावर्षीही परतीचा पाऊस चांगला झाला होता. शिवाय मधल्या काळात अवकाळी पावसानेही हजेरी लावलेली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईची झळ काहीशी कमी बसेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील मोसम सरवणकरवाडी येथील काही ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे.