शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

रेमडेसिवरची मागणी आता केवळ ३४ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:42 IST

Coronavirus Unlock Ratnagirinews- ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. आरोग्य विभागाकडून चाचण्या वाढविण्यात आल्याने तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याने रुग्णांचे निदान वेळेवर होत आहे. परिणामी उपचारासाठी रुग्ण वेळेवर दाखल होत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी केवळ २३ टक्के तर जिल्ह्यात एकूण ३४ टक्के इतकी आहे.

ठळक मुद्देरेमडेसिवरची मागणी आता केवळ ३४ टक्केच ऑक्क्टोबरपासून जिल्ह्यात रुग्णांची संख्या घटली

शोभना कांबळेरत्नागिरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. आरोग्य विभागाकडून चाचण्या वाढविण्यात आल्याने तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याने रुग्णांचे निदान वेळेवर होत आहे. परिणामी उपचारासाठी रुग्ण वेळेवर दाखल होत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी केवळ २३ टक्के तर जिल्ह्यात एकूण ३४ टक्के इतकी आहे.जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली. या उत्सवासाठी आलेल्यांपैकी अनेक जण तपासणी न करताच घरी गेल्याने गंभीर रूग्णांचे प्रमाण वाढले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोनाची रूग्णसंख्या वेगाने वाढून गंभीर रूग्णांचे प्रमाणही वाढले. लोक लक्षणे लपवू लागल्याने उशिरा उपचारासाठी दाखल होऊ लागले. त्यामुळे रूग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले.गंभीर रूग्ण वाढताच जिल्हा रूग्णालयाला रेमडेसिवर इंजेक्शनचा साठा मोठ्या प्रमाणावर ठेवावा लागत होता. सुरूवातीला जिल्हा रूग्णालयाला रेमडेसिवर इंजेक्शन ५६०० रूपयांना एक याप्रमाणे खरेदी करावे लागले. सप्टेंबरमध्ये रूग्णसंख्या वाढल्याने या इंजेक्शनचीही गरज वाढली. मात्र, आता दिवसाला १० पेक्षाही कमी झाली आहे.ॲंटिजेन टेस्ट, औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्धऑगस्ट महिन्यात महिला रूग्णालय, जिल्हा कोरोना रूग्णालय आणि इतर शासकीय रूग्णालयांमध्ये ५६२ रेमडेसिवर इंजेक्शन लागली. मात्र, सप्टेंबर महिन्यात भरमसाठ वाढलेल्या रूग्णांबरोबरच गंभीर रूग्ण वाढले. त्यामुळे ही संख्या १२२० इतकी झाली. वेळेवर निदान होऊ लागल्याने गंभीर रूग्णांची संख्याही घटली आहे. मात्र, रेमडेसिवर इंजेक्शनबरोबरच ॲटिजेन टेस्टसह इतर औषधसाठा जिल्हा रूग्णालयात पुरेशा प्रमाणात ठेवण्यात आला आहे.१० इंजेक्शनची गरजरेमडेसिवर इंजेक्शन कोरोनावर उपयोगी नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याचवेळी जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण घटल्याने जिल्हा रूग्णालयाने इंजेक्शनची खरेदी थांबविली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १२२० इंजेक्शने लागली. मात्र, आता दिवसाला १० पेक्षा कमी इंजेक्शने लागत आहेत.

कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरीही अजून कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यासाठी रेमडेसिवर इंजेक्शन तसेच सर्व चाचण्या, औषधसाठा मुबलक प्रमाणात ठेवलेला आहे. नागरिकांनीही कोरोना गेला असे न समजता अजूनही काही महिने मास्क आणि सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करावे.- डॉ. संघमित्रा फुले-गावडे,जिल्हा शल्य चिकीत्सक

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी