शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

रेमडेसिवरची मागणी आता केवळ ३४ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:42 IST

Coronavirus Unlock Ratnagirinews- ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. आरोग्य विभागाकडून चाचण्या वाढविण्यात आल्याने तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याने रुग्णांचे निदान वेळेवर होत आहे. परिणामी उपचारासाठी रुग्ण वेळेवर दाखल होत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी केवळ २३ टक्के तर जिल्ह्यात एकूण ३४ टक्के इतकी आहे.

ठळक मुद्देरेमडेसिवरची मागणी आता केवळ ३४ टक्केच ऑक्क्टोबरपासून जिल्ह्यात रुग्णांची संख्या घटली

शोभना कांबळेरत्नागिरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. आरोग्य विभागाकडून चाचण्या वाढविण्यात आल्याने तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याने रुग्णांचे निदान वेळेवर होत आहे. परिणामी उपचारासाठी रुग्ण वेळेवर दाखल होत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी केवळ २३ टक्के तर जिल्ह्यात एकूण ३४ टक्के इतकी आहे.जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली. या उत्सवासाठी आलेल्यांपैकी अनेक जण तपासणी न करताच घरी गेल्याने गंभीर रूग्णांचे प्रमाण वाढले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोनाची रूग्णसंख्या वेगाने वाढून गंभीर रूग्णांचे प्रमाणही वाढले. लोक लक्षणे लपवू लागल्याने उशिरा उपचारासाठी दाखल होऊ लागले. त्यामुळे रूग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले.गंभीर रूग्ण वाढताच जिल्हा रूग्णालयाला रेमडेसिवर इंजेक्शनचा साठा मोठ्या प्रमाणावर ठेवावा लागत होता. सुरूवातीला जिल्हा रूग्णालयाला रेमडेसिवर इंजेक्शन ५६०० रूपयांना एक याप्रमाणे खरेदी करावे लागले. सप्टेंबरमध्ये रूग्णसंख्या वाढल्याने या इंजेक्शनचीही गरज वाढली. मात्र, आता दिवसाला १० पेक्षाही कमी झाली आहे.ॲंटिजेन टेस्ट, औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्धऑगस्ट महिन्यात महिला रूग्णालय, जिल्हा कोरोना रूग्णालय आणि इतर शासकीय रूग्णालयांमध्ये ५६२ रेमडेसिवर इंजेक्शन लागली. मात्र, सप्टेंबर महिन्यात भरमसाठ वाढलेल्या रूग्णांबरोबरच गंभीर रूग्ण वाढले. त्यामुळे ही संख्या १२२० इतकी झाली. वेळेवर निदान होऊ लागल्याने गंभीर रूग्णांची संख्याही घटली आहे. मात्र, रेमडेसिवर इंजेक्शनबरोबरच ॲटिजेन टेस्टसह इतर औषधसाठा जिल्हा रूग्णालयात पुरेशा प्रमाणात ठेवण्यात आला आहे.१० इंजेक्शनची गरजरेमडेसिवर इंजेक्शन कोरोनावर उपयोगी नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याचवेळी जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण घटल्याने जिल्हा रूग्णालयाने इंजेक्शनची खरेदी थांबविली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १२२० इंजेक्शने लागली. मात्र, आता दिवसाला १० पेक्षा कमी इंजेक्शने लागत आहेत.

कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरीही अजून कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यासाठी रेमडेसिवर इंजेक्शन तसेच सर्व चाचण्या, औषधसाठा मुबलक प्रमाणात ठेवलेला आहे. नागरिकांनीही कोरोना गेला असे न समजता अजूनही काही महिने मास्क आणि सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करावे.- डॉ. संघमित्रा फुले-गावडे,जिल्हा शल्य चिकीत्सक

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी