शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

चिपळूण तालुकाध्यक्ष हटवण्याची मागणी

By admin | Updated: September 11, 2014 00:09 IST

माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना दिले निवेदन

चिपळूण : येथील तालुकाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे अवघड झाल्याने त्यांना बदलावे, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे केली आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचा मनमानीपणा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे सर्वांनाच असह्य आहे. तालुकाध्यक्षपद मिळाल्यापासून पक्षाची व पदाची ध्येयधोरणे बाजूला सारुन निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांना आणि मतदारांना अडचणीचे ठरेल, अशाच प्रकारची आंदोलने करणे, निव्वळ राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याच कार्यकर्त्यांविरुद्ध बोलत राहाणे, शिवसेना व विरोधी पक्षाबाबत अवाक्षरही न काढणे, सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कामे देणे, काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध षडयंत्र रचणे, एकाधिकारशाही करणे, कमिटी बॅनरवर दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीचा फोटो लावून निव्वळ प्रगतीपुस्तक भरण्याचे काम करणे, सतत पक्षविरोधी कारवाया करणे, कामे देतो, सांगून पैसे उकळणे, कार्यकर्त्यांना धमकावणे, पक्षवाढीचा देखावा उभा करुन वाळू व्यावसायिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी यांच्याकडून रक्कम घेणे, स्वार्थ साधणे, राणे यांच्याबद्दल खोटेनाटे सांगून कार्यकर्त्यांना दूर ठेवणे, गैरसमज पसरवणे, खोटी आमिषे दखवून कार्यक्रमासाठी उपस्थिती वाढविणे, इतर पदाधिकाऱ्यांनी घेतलेले कार्यक्रम अयशस्वी होतील, अशा कारवाया करणे अशा अनेक गोष्टी काँग्रेस श्रेष्ठींनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये सावंत यांनी ठराविक गावे सोडता कुठेही बूथ लावले नाहीत. अनेक गावात पक्षाचे बूथ अध्यक्षच नाहीत, ते केवळ कागदावर आहेत. गावागावातील वाडीवस्तीवरील मतदारांपर्यंत ते पोहचले नाहीत. साधे प्रचारपत्रही पोहोचले नाही. कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतले नाही. अनेक ठिकाणी बूथच्या खर्चाची रक्कमही पोहचली नाही, अशा अनेक तक्रारी या निवेदनात आहेत. या पत्रावर लक्ष्मण खेतले, शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बुरटे, माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे, माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. जीवन रेळेकर, माजी उपनगराध्यक्ष गौरी रेळेकर, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, युवक अध्यक्ष वैभव वीरकर, तालुका सरचिटणीस राजेंद्र शिंदे, सचिव राजेश वाजे, पाणी सभापती कबीर काद्री आदी १६० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)पक्षवाढीसाठी कोणताही कार्यक्रम न करता केवळ पदाधिकाऱ्यांना दुखावण्याचे काम त्यांनी केले. अपमान सहन करुन केवळ आपल्याकडे पाहून आम्ही प्रामाणिकपणे काम करीत राहिलो. आपल्या पराभवाचे शल्य आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. याची अनेक कारणे असतील. मात्र, तालुकाध्यक्षांचा हेकेखोरपणा हेही मोठे कारण आहे. काँग्रेसचे अस्तित्त्व तालुक्यात नव्हते. त्या कठीण काळात आपण काँग्रेसरुपी आंब्याचे झाड लावले. आता हे झाड मोठे झाले आहे. त्यावर फळे लागल्याने दगड मारण्याचे काम सुरु झाले आहे. त्याला आपण फारशी किंमत देत नाही, असे प्रकार यापूर्वीही घडले असून, आपला पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे, असे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी सांगितले. माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना दिले निवेदन. तालुकाध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे असह्य. तालुकाध्यक्षांच्या धाकदपटशहाचा वाचला पाढा.