शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मागणी १९४ कोटी; मिळाले फक्त ३ कोटी

By admin | Updated: June 21, 2016 01:19 IST

दुरुस्ती होणार कशी? : जिल्हा परिषद रस्त्यांची दयनीय अवस्था

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून १९४ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेकडून शासनाला सादर करण्यात आला होता. मात्र, त्यापैकी केवळ ३ कोटी २५ लाख रुपये जिल्हा परिषदेला शासनाकडून देण्यात आले आहेत. उर्वरीत निधी न मिळाल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याने यावरुन वाहतूक करणे त्रासदायक ठरत आहे. जिल्ह्याच्या शहरी भागातील रस्ते चकाचक दिसत असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती त्या उलट आहे. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता ग्रामीण भाग हा डोंगराळ व दुर्गम आहे. ग्रामीण भागातील रस्ते वाईट स्थितीत आहेत. मागील तीन वर्षांमध्ये पावसाळ्यामध्ये आलेल्या पुरामुळे रस्ते, साकव उखडले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दळणवळणाच्या दृष्टीने आजही ते त्रासदायक ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग येतात. केवळ महामार्गाकडे शासनाने लक्ष दिले. मात्र, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षितच राहिले. जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी व चिपळूण येथील बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांची पाहणी केली असता, ६७८७ किलोमीटरच्या रस्त्यांची चाळण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामध्ये चिपळूण विभागात ३३८६ किलोमीटर आणि रत्नागिरी विभागात ३४०१ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होऊनही त्याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाने दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यांची आणखी वर्षभर दुरुस्ती न झाल्यास या रस्त्यांवरुन चालणे मुश्किल होणार आहे. जिल्हा परिषदेने रस्ते विशेष दुरुस्ती योजनेंतर्गत या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे १९४ कोटींचा निधी मिळावा, असा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी केवळ ३ कोटी २५ लाख रुपये निधी शासनाकडून देण्यात आला. शासनाने जिल्हा परिषदेची एकप्रकारे ही थट्टाच केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेने पुन्हा शासनाकडे १९३ कोटी ४८ लाख रुपये निधीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यावर वर्ष उलटले तरीही अद्याप हा निधी शासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे या रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे. या पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते पूर्ण खराब झाल्याने सुमारे ८४ गावांमध्ये एस. टी.च्या गाड्या बंद करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील रस्त्यांची स्थिती फार दयनीय असूनही शासनाकडून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)राजकारण : दोन वर्षांपूर्वी साडेसतरा कोटीपूरग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेला १७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीवरुन जोरदार राजकारण जिल्हा परिषदेत सुरु होते. त्यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी अडचणीत आले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दोन वर्षांच्या कालावधीत मिळालेला नाही. त्यामुळे रस्ते दुरुस्ती रखडली आहे.