शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईंचा बटवा अन् काेराेनाला हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:30 IST

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेला आजीबाईचा बटवा व त्यातील औषधी वनस्पती व वस्तूंचे ...

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेला आजीबाईचा बटवा व त्यातील औषधी वनस्पती व वस्तूंचे महत्त्व पटले आहे. कोरोनाच्या काळात तर स्वत:ला निरोगी ठेवण्याबरोबर सर्दी, पडसे, कफापासून रक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे काढे तयार करून प्राशन केले जात आहेत. आयुर्वेदिक औषधांमुळे आजार बरे होत असून कोणतेही बाह्य आजार यामुळे संभवत नसल्यामुळे आयुर्वेदावर जुन्या पिढीचा विश्वास ठाम आहे. झटपट निकालाची अपेक्षा करणाऱ्या नवी पिढीलाही आयुर्वेदाचे महत्त्व उमगले आहे.

मानवी शरीर वात, कफ व पित्ताने युक्त आहे. पूर्वीपासून ज्या व्यक्तीचे पचन चांगले ती व्यक्ती निरोगी मानली जाते. मात्र प्रतिकारशक्ती एकाएकी वाढत नाही. त्यासाठी आयुर्वेदाचे नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोना हा कफप्रधान आजार असल्याने कफ होऊ नये किंवा कफ पडून जावा यासाठी आजीबाईच्या बटव्यात अनेक औषधे आहेत. प्रत्येक औषधी जडीबुटीचे महत्त्वही तितकेच वेगळे आहे. लहान बाळापासून मोठ्यांनाही विविध वनस्पती, मुळ्यांचे रस, काढे आजारात फायदेशीर ठरतात. त्यामुळेच थोडीशी सर्दी वाटली तरी आल्याचा, गवती चहा घालून काढा किंवा चहा तयार करून प्राशन केला जातो. हळद जंतुनाशक असल्यामुळे हळदीचे पाणी कोरोना विषाणूपासून रक्षण करण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळेच घरच्या काढ्यांकडे कल अधिक आहे.

ज्या व्यक्तींचे पचन निरोगी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली. आयुर्वेदामध्ये जठराग्नीला अधिक महत्त्व आहे. प्रत्येकाने आपला आहार तपासणे आवश्यक आहे. प्रत्येक आहार पचविणाऱ्यास समस्या नाही; परंतु जठाराग्नीवर अवास्तव व अतिताण येऊ देऊ नये. कोरोना असो वा अन्य विषाणू; तो रोग प्रतिकारक शक्तीच्या बळावर पळवून लावला जातो. मानवी शरीर कफ, वात व पित्तापासून बनलेले आहे. याचे असंतुलनामुळे त्रास होतो. स्वयंपाकघरातील छोट्या-छोट्या वस्तू आजारावर मात करण्यासाठी फायदेशीर ठरतात. विविध वस्तूंचे औषधी गुणधर्म महत्त्वपूर्ण असून त्याचे महत्त्व पटल्यामुळेच वापरही वाढला आहे.

- डाॅ. मंजिरी जोग

नवीन औषधांचे निकाल चांगले व झटपट आहेत. झटपट बरे होण्याची सवय लागल्यानेच काढे दुर्लक्षित झाले. पावसाळ्यात सर्दी होऊ नये यासाठी आले, गवती चहा घातलेला चहा प्राधान्याने प्राशन केला जात असे. कोरोनामुळे असा चहा आवर्जून घेतला जात आहे.

- श्यामला श्रीधर पोंक्षे, रत्नागिरी

जंक फूडच्या नादात पारंपरिक, स्वयंघरातील उपयुक्त वस्तू दुर्लक्षित झाल्या. सर्दी, पडसे असो वा अन्य आजारांत प्राथमिक उपचार पूर्वी घरीच केले जात असत. सर्दीसाठी वेखंड उगाळून लावणे, ओव्याचे तेल फायदेशीर ठरते. हळद घातलेले दूधही उपयुक्त ठरते.

- शिल्पा शरद तांबे, चिपळूण

गरम पाणी प्राथमिक परंतु उपयुक्त आहे. तुळस, धने, दालचिनी, आले, पारिजातकाची पाने, जेष्ठमध घातलेला काढा फायदेशीर आहे. लिंबू, आल्याच्या रसांतून विविध जीवनसत्त्वे प्राप्त होतात.

- उषा जोगळेकर, रत्नागिरी

गुणकारी गवती चहा

सर्दी, पडसे किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा; तसेच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा. पोट दुखत असल्यास किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा. थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यास गवती चहा उकळून प्यायल्यास आराम पडतो. शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाचे मालिश गुणकारी ठरते.

जंतुनाशक हळद

हळदीमध्ये लिपोपोलीसॅचिरिडचे घटक आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. सांधेदुखी, आर्थरायटिस यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. हळदीच्या पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्टेरॉलही कमी होते. हळद घालून गरम दूध प्राशनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

जीवनसत्त्वांनी युक्त ‘आले’

अ, क, ई जीवनसत्त्वांनी युक्त व ‘बी’ काॅम्प्लेक्सचा उत्तम स्रोत म्हणून ‘आले’ ओळखल जाते. त्यात मॅग्नेशिअम, फाॅस्फरस, आयर्न, कॅल्शिअम, झिंक मुबलक आहे. आल्यामध्ये ॲन्टीफंगल, ॲन्टीबॅक्टेरियल, ॲन्टीव्हायरल गुणधर्म आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबरोबर उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास आले सेवन फायदेशीर ठरो. ते अन्य आजारांपासून सुटका करते.